शहरं
Join us  
Trending Stories
1
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
2
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
3
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
4
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
5
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा
6
'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण...
7
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
8
"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप
9
"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...
10
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
11
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
12
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
13
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
14
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
15
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
16
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
17
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
18
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
19
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
20
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश

Coronavirus: थाटामाटात लग्न लावले अन् वधूपित्यासह १७ जण कोरोनाबाधित आढळले; २०० पाहुण्यांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2020 11:52 IST

उस्मानाबाद जिल्ह्यातील राळेसांगवी येथे २९ जून रोजी एक विवाह सोहळा थाटामाटात पार पडला.  त्यास २०० वर वऱ्हाडींची उपस्थिती होती.

ठळक मुद्देराळेसांगवी येथे २९ जून रोजी एक विवाह सोहळा थाटामाटात पार पडलारुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून आतापर्यंत बाधितांची संख्या १७ वर पोहोचलीव्हिडिओ चित्रीकरणात दिसणाऱ्या सुमारे २०० व्यक्तींवर गुन्हे दाखल

उस्मानाबाद : राज्यात कोरोनाचं संक्रमण वाढत असताना काहीठिकाणी अद्यापही कोरोनाचं गांभीर्य राखलं जात नाही. उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यात अशाच प्रकारची घटना समोर येत आहे. राळेसांगवी येथे प्रशासनाचे नियम धुडकावून लावत जवळपास २०० वऱ्हाडींच्या उपस्थितीत काही दिवसांपूर्वी एक विवाह सोहळा पार पडला. दरम्यान, यातील वधूपिताच कोरोना बाधित आढळून आल्यानंतर उपस्थित पाहुण्यांमध्ये कोरोनाची धास्ती वाढली आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर भूम पोलिसांनी याप्रकरणी २०० जणांवर मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्यातील राळेसांगवी येथे २९ जून रोजी एक विवाह सोहळा थाटामाटात पार पडला.  त्यास २०० वर वऱ्हाडींची उपस्थिती होती. दरम्यान, त्यानंतर वधूपित्यालाच कोरोनाची लागण झाल्याचं ३ जुलै रोजी निष्पन्न झाले. तेथून सुरु झालेली बाधितांची साखळी अजूनही तुटलेली नाही. या गावातील रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून आतापर्यंत बाधितांची संख्या १७ वर पोहोचली आहे. अनेकांचे अहवाल अजून यायचे आहेत पण या आजारातून बरे झाल्यानंतर वधूपित्याने कोरोनाबाबत नागरिकांनी घाबरू नये, तसेच त्यास गांभीर्यानेही घेऊ नये, असा संदेश देणारा एक व्हिडीओ समाजमाध्यमात व्हायरल केला. ही माहिती समजताच जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी आदेशाचे उल्लंघन करुन विवाह सोहळा घडवून आणणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.

याअनुषंगाने मंगळवारी सकाळी भूमचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांनी कार्यवाही करीत ग्रामसेवकाची तक्रार घेऊन विवाह सोहळ्याचे आयोजक व व्हिडिओ चित्रीकरणात दिसणाऱ्या सुमारे २०० व्यक्तींवर गुन्हे दाखल केले आहेत.

बाधिताने खाऊ घातली अनेकांना साखर

कोरोना बाधित वधूपित्याने विवाह सोहळ्यास उपस्थित न राहू शकलेल्या अनेक आप्तस्वकियांना साखर खाऊ घातल्याचेही समोर आले आहे़ त्यामुळे संसर्ग प्रसाराचा धोका आणखी बळावल्याची माहिती पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांनी दिली़ केवळ वऱ्हाडीच नाही तर यात सहभागी असलेले भटजी, बँड पथक, घोडेवाले, मंडप व्यवसायिक यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आल्याचेही खनाळ यांनी सांगितले. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसOsmanabadउस्मानाबादmarriageलग्नPoliceपोलिस