शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Coronavirus: थाटामाटात लग्न लावले अन् वधूपित्यासह १७ जण कोरोनाबाधित आढळले; २०० पाहुण्यांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2020 11:52 IST

उस्मानाबाद जिल्ह्यातील राळेसांगवी येथे २९ जून रोजी एक विवाह सोहळा थाटामाटात पार पडला.  त्यास २०० वर वऱ्हाडींची उपस्थिती होती.

ठळक मुद्देराळेसांगवी येथे २९ जून रोजी एक विवाह सोहळा थाटामाटात पार पडलारुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून आतापर्यंत बाधितांची संख्या १७ वर पोहोचलीव्हिडिओ चित्रीकरणात दिसणाऱ्या सुमारे २०० व्यक्तींवर गुन्हे दाखल

उस्मानाबाद : राज्यात कोरोनाचं संक्रमण वाढत असताना काहीठिकाणी अद्यापही कोरोनाचं गांभीर्य राखलं जात नाही. उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यात अशाच प्रकारची घटना समोर येत आहे. राळेसांगवी येथे प्रशासनाचे नियम धुडकावून लावत जवळपास २०० वऱ्हाडींच्या उपस्थितीत काही दिवसांपूर्वी एक विवाह सोहळा पार पडला. दरम्यान, यातील वधूपिताच कोरोना बाधित आढळून आल्यानंतर उपस्थित पाहुण्यांमध्ये कोरोनाची धास्ती वाढली आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर भूम पोलिसांनी याप्रकरणी २०० जणांवर मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्यातील राळेसांगवी येथे २९ जून रोजी एक विवाह सोहळा थाटामाटात पार पडला.  त्यास २०० वर वऱ्हाडींची उपस्थिती होती. दरम्यान, त्यानंतर वधूपित्यालाच कोरोनाची लागण झाल्याचं ३ जुलै रोजी निष्पन्न झाले. तेथून सुरु झालेली बाधितांची साखळी अजूनही तुटलेली नाही. या गावातील रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून आतापर्यंत बाधितांची संख्या १७ वर पोहोचली आहे. अनेकांचे अहवाल अजून यायचे आहेत पण या आजारातून बरे झाल्यानंतर वधूपित्याने कोरोनाबाबत नागरिकांनी घाबरू नये, तसेच त्यास गांभीर्यानेही घेऊ नये, असा संदेश देणारा एक व्हिडीओ समाजमाध्यमात व्हायरल केला. ही माहिती समजताच जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी आदेशाचे उल्लंघन करुन विवाह सोहळा घडवून आणणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.

याअनुषंगाने मंगळवारी सकाळी भूमचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांनी कार्यवाही करीत ग्रामसेवकाची तक्रार घेऊन विवाह सोहळ्याचे आयोजक व व्हिडिओ चित्रीकरणात दिसणाऱ्या सुमारे २०० व्यक्तींवर गुन्हे दाखल केले आहेत.

बाधिताने खाऊ घातली अनेकांना साखर

कोरोना बाधित वधूपित्याने विवाह सोहळ्यास उपस्थित न राहू शकलेल्या अनेक आप्तस्वकियांना साखर खाऊ घातल्याचेही समोर आले आहे़ त्यामुळे संसर्ग प्रसाराचा धोका आणखी बळावल्याची माहिती पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांनी दिली़ केवळ वऱ्हाडीच नाही तर यात सहभागी असलेले भटजी, बँड पथक, घोडेवाले, मंडप व्यवसायिक यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आल्याचेही खनाळ यांनी सांगितले. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसOsmanabadउस्मानाबादmarriageलग्नPoliceपोलिस