शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

CoronaVirus : राज्यात 15 दिवस कठोर निर्बंध! सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांवर बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2021 06:57 IST

मनाई असतानाही अशा कार्यक्रमांचे आयोजन केले तर संबंधित स्थळ तसेच मंगल कार्यालय केंद्र सरकारकडून कोरोना हा राष्ट्रीय आपत्ती म्हणून अधिसूचित असेपर्यंत बंद करण्यात येतील.

मुंबई: कोरोनाचा (CoronaVirus ) वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांवर आजपासून ३१ मार्चपर्यंत राज्यात बंदी असेल, असा आदेश राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी सोमवारी काढला. विवाह समारंभ केवळ ५० जणांच्या उपस्थितीतच करण्याचे बंधन टाकण्यात आले आहे. या निर्बंधाचे उल्लंघन केल्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.  (CoronaVirus 15 days strict restrictions in the state Ban on social, cultural, religious events)

मनाई असतानाही अशा कार्यक्रमांचे आयोजन केले तर संबंधित स्थळ तसेच मंगल कार्यालय केंद्र सरकारकडून कोरोना हा राष्ट्रीय आपत्ती म्हणून अधिसूचित असेपर्यंत बंद करण्यात येतील. तसेच त्यांचे व्यवस्थापन, मालक व आयोजकांवरही कारवाई केली जाईल. याशिवाय, आणखी काही कडक बंधने लावण्यात आली आहेत. त्यानुसार, अंत्यविधीला २० पेक्षा अधिक जणांना उपस्थित राहता येणार नाही. धार्मिक स्थळांमध्ये उपलब्ध जागा आणि सोशल डिस्टन्सिंगचा विचार करून भक्तांना प्रवेश द्यावा. दर्शनासाठी ऑनलाईन बुकिंगची सोय करून गर्दीचे नियोजन करावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरची व्यवस्था धार्मिक स्थळांमध्ये अनिवार्य असेल.

सर्व चित्रपटगृहे, हॉटेल्स, रेस्टॉरन्ट ५० टक्के उपस्थितीत आणि काही बंधंनाचे पालन करीतच चालवण्यास अनुमती असेल. त्या ठिकाणी मास्क घातल्याशिवाय प्रवेश नसेल. अंगात ताप असलेल्या व्यक्तीला त्या ठिकाणी प्रवेश मिळता कामा नये यासाठी आवश्यक ती तपासणी यंत्रणा असणे अनिवार्य राहील. सॅनिटायझेशनची पुरेशी व्यवस्था करावी लागेल. प्रत्येक जण मास्क घालून आलेला आहे की नाही आणि सोशल डिस्टन्सिंग पाळत आहे की नाही हे बघण्यासाठी आवश्यक तो कर्मचारी वर्ग तैनात करावा लागेल. या नियमांचे उल्लंघन करणारी चित्रपटगृहे, हॉटेल्स, रेस्टॉरन्ट ही केंद्र सरकार कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती म्हणून अधिसूचित असेपर्यंत बंद करण्यात येतील. मास्क, सॅनिटायझेशन, अंगातील ताप तपासणी यंत्रणा याबाबतचे नियम हे शॉपिंग मॉल्ससाठीही लागू राहतील आणि या नियमांचे उल्लंघन केल्यास केंद्र सरकारकडून कोरोना हा राष्ट्रीय आपत्ती म्हणून अधिसूचित असेपर्यंत बंद करण्यात येतील.

गृह विलगीकरणात असलेल्यांची माहिती स्थानिक प्रशासनाला दिली जावी. गृह विलगीकरण झालेल्या घराच्या दारावर १४ दिवस बोर्ड लावण्यात यावा जेणेकरून तेथे कोरोनाबाधित रुग्ण असल्याचे कळेल. कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाच्या हातावर गृह विलगीकरणाचा शिक्का असावा. अशा रुग्णाच्या कुटुंबियांनीही त्यांचा वावर मर्यादित ठेवावा, मास्कशिवाय बाहेर पडू नये. या नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित रुग्णास तत्काळ कोविड केअर सेंटरमध्ये हलविण्यात येणार आहे.

कार्यालयांत ५० टक्केच उपस्थितीआरोग्य आणि इतर अत्यावश्यक सेवा वगळता अन्य शासकीय व खासगी कार्यालयांमध्ये केवळ ५० टक्के कर्मचारी उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे. या नियमाचे उल्लंघन करणारे कार्यालय हे केंद्र सरकार कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती म्हणून अधिसूचित असेपर्यंत बंद करण्यात येईल. घरून काम करण्यास (वर्क फ्रॉम होम) असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

- चित्रपटगृहे, हॉटेल्स, रेस्टॉरंटमध्ये ५० टक्केच उपस्थिती - विवाह समारंभाला ५० जणांच्याच उपस्थितीचे बंधन - अंत्यविधीला २० पेक्षा अधिक जण नकाेत- कार्यालयांमध्ये केवळ ५० टक्के कर्मचारी उपस्थिती - गृह विलगीकरण झालेल्या घराच्या दारावर १४ दिवस बोर्ड लावावा 

संसर्गाचे प्रमाण वाढू नये म्हणून ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंट या त्रिसूत्रीनुसार काम केले जात आहे. राज्यात कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात येत आहे. नागरिकांनीही गर्दी होणार नाही याची खबरदारी घ्यावी. राज्यामध्ये लसीचा तुटवडा नसून खासगी व शासकीय रुग्णालयांत लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याकरिता प्रयत्न केले जात आहेत.     - राजेश टोपे, आरोग्यमंत्री  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबईCorona vaccineकोरोनाची लस