शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : राज्यात 15 दिवस कठोर निर्बंध! सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांवर बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2021 06:57 IST

मनाई असतानाही अशा कार्यक्रमांचे आयोजन केले तर संबंधित स्थळ तसेच मंगल कार्यालय केंद्र सरकारकडून कोरोना हा राष्ट्रीय आपत्ती म्हणून अधिसूचित असेपर्यंत बंद करण्यात येतील.

मुंबई: कोरोनाचा (CoronaVirus ) वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांवर आजपासून ३१ मार्चपर्यंत राज्यात बंदी असेल, असा आदेश राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी सोमवारी काढला. विवाह समारंभ केवळ ५० जणांच्या उपस्थितीतच करण्याचे बंधन टाकण्यात आले आहे. या निर्बंधाचे उल्लंघन केल्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.  (CoronaVirus 15 days strict restrictions in the state Ban on social, cultural, religious events)

मनाई असतानाही अशा कार्यक्रमांचे आयोजन केले तर संबंधित स्थळ तसेच मंगल कार्यालय केंद्र सरकारकडून कोरोना हा राष्ट्रीय आपत्ती म्हणून अधिसूचित असेपर्यंत बंद करण्यात येतील. तसेच त्यांचे व्यवस्थापन, मालक व आयोजकांवरही कारवाई केली जाईल. याशिवाय, आणखी काही कडक बंधने लावण्यात आली आहेत. त्यानुसार, अंत्यविधीला २० पेक्षा अधिक जणांना उपस्थित राहता येणार नाही. धार्मिक स्थळांमध्ये उपलब्ध जागा आणि सोशल डिस्टन्सिंगचा विचार करून भक्तांना प्रवेश द्यावा. दर्शनासाठी ऑनलाईन बुकिंगची सोय करून गर्दीचे नियोजन करावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरची व्यवस्था धार्मिक स्थळांमध्ये अनिवार्य असेल.

सर्व चित्रपटगृहे, हॉटेल्स, रेस्टॉरन्ट ५० टक्के उपस्थितीत आणि काही बंधंनाचे पालन करीतच चालवण्यास अनुमती असेल. त्या ठिकाणी मास्क घातल्याशिवाय प्रवेश नसेल. अंगात ताप असलेल्या व्यक्तीला त्या ठिकाणी प्रवेश मिळता कामा नये यासाठी आवश्यक ती तपासणी यंत्रणा असणे अनिवार्य राहील. सॅनिटायझेशनची पुरेशी व्यवस्था करावी लागेल. प्रत्येक जण मास्क घालून आलेला आहे की नाही आणि सोशल डिस्टन्सिंग पाळत आहे की नाही हे बघण्यासाठी आवश्यक तो कर्मचारी वर्ग तैनात करावा लागेल. या नियमांचे उल्लंघन करणारी चित्रपटगृहे, हॉटेल्स, रेस्टॉरन्ट ही केंद्र सरकार कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती म्हणून अधिसूचित असेपर्यंत बंद करण्यात येतील. मास्क, सॅनिटायझेशन, अंगातील ताप तपासणी यंत्रणा याबाबतचे नियम हे शॉपिंग मॉल्ससाठीही लागू राहतील आणि या नियमांचे उल्लंघन केल्यास केंद्र सरकारकडून कोरोना हा राष्ट्रीय आपत्ती म्हणून अधिसूचित असेपर्यंत बंद करण्यात येतील.

गृह विलगीकरणात असलेल्यांची माहिती स्थानिक प्रशासनाला दिली जावी. गृह विलगीकरण झालेल्या घराच्या दारावर १४ दिवस बोर्ड लावण्यात यावा जेणेकरून तेथे कोरोनाबाधित रुग्ण असल्याचे कळेल. कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाच्या हातावर गृह विलगीकरणाचा शिक्का असावा. अशा रुग्णाच्या कुटुंबियांनीही त्यांचा वावर मर्यादित ठेवावा, मास्कशिवाय बाहेर पडू नये. या नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित रुग्णास तत्काळ कोविड केअर सेंटरमध्ये हलविण्यात येणार आहे.

कार्यालयांत ५० टक्केच उपस्थितीआरोग्य आणि इतर अत्यावश्यक सेवा वगळता अन्य शासकीय व खासगी कार्यालयांमध्ये केवळ ५० टक्के कर्मचारी उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे. या नियमाचे उल्लंघन करणारे कार्यालय हे केंद्र सरकार कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती म्हणून अधिसूचित असेपर्यंत बंद करण्यात येईल. घरून काम करण्यास (वर्क फ्रॉम होम) असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

- चित्रपटगृहे, हॉटेल्स, रेस्टॉरंटमध्ये ५० टक्केच उपस्थिती - विवाह समारंभाला ५० जणांच्याच उपस्थितीचे बंधन - अंत्यविधीला २० पेक्षा अधिक जण नकाेत- कार्यालयांमध्ये केवळ ५० टक्के कर्मचारी उपस्थिती - गृह विलगीकरण झालेल्या घराच्या दारावर १४ दिवस बोर्ड लावावा 

संसर्गाचे प्रमाण वाढू नये म्हणून ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंट या त्रिसूत्रीनुसार काम केले जात आहे. राज्यात कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात येत आहे. नागरिकांनीही गर्दी होणार नाही याची खबरदारी घ्यावी. राज्यामध्ये लसीचा तुटवडा नसून खासगी व शासकीय रुग्णालयांत लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याकरिता प्रयत्न केले जात आहेत.     - राजेश टोपे, आरोग्यमंत्री  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबईCorona vaccineकोरोनाची लस