शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

CoronaVirus : राज्यात 15 दिवस कठोर निर्बंध! सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांवर बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2021 06:57 IST

मनाई असतानाही अशा कार्यक्रमांचे आयोजन केले तर संबंधित स्थळ तसेच मंगल कार्यालय केंद्र सरकारकडून कोरोना हा राष्ट्रीय आपत्ती म्हणून अधिसूचित असेपर्यंत बंद करण्यात येतील.

मुंबई: कोरोनाचा (CoronaVirus ) वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांवर आजपासून ३१ मार्चपर्यंत राज्यात बंदी असेल, असा आदेश राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी सोमवारी काढला. विवाह समारंभ केवळ ५० जणांच्या उपस्थितीतच करण्याचे बंधन टाकण्यात आले आहे. या निर्बंधाचे उल्लंघन केल्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.  (CoronaVirus 15 days strict restrictions in the state Ban on social, cultural, religious events)

मनाई असतानाही अशा कार्यक्रमांचे आयोजन केले तर संबंधित स्थळ तसेच मंगल कार्यालय केंद्र सरकारकडून कोरोना हा राष्ट्रीय आपत्ती म्हणून अधिसूचित असेपर्यंत बंद करण्यात येतील. तसेच त्यांचे व्यवस्थापन, मालक व आयोजकांवरही कारवाई केली जाईल. याशिवाय, आणखी काही कडक बंधने लावण्यात आली आहेत. त्यानुसार, अंत्यविधीला २० पेक्षा अधिक जणांना उपस्थित राहता येणार नाही. धार्मिक स्थळांमध्ये उपलब्ध जागा आणि सोशल डिस्टन्सिंगचा विचार करून भक्तांना प्रवेश द्यावा. दर्शनासाठी ऑनलाईन बुकिंगची सोय करून गर्दीचे नियोजन करावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरची व्यवस्था धार्मिक स्थळांमध्ये अनिवार्य असेल.

सर्व चित्रपटगृहे, हॉटेल्स, रेस्टॉरन्ट ५० टक्के उपस्थितीत आणि काही बंधंनाचे पालन करीतच चालवण्यास अनुमती असेल. त्या ठिकाणी मास्क घातल्याशिवाय प्रवेश नसेल. अंगात ताप असलेल्या व्यक्तीला त्या ठिकाणी प्रवेश मिळता कामा नये यासाठी आवश्यक ती तपासणी यंत्रणा असणे अनिवार्य राहील. सॅनिटायझेशनची पुरेशी व्यवस्था करावी लागेल. प्रत्येक जण मास्क घालून आलेला आहे की नाही आणि सोशल डिस्टन्सिंग पाळत आहे की नाही हे बघण्यासाठी आवश्यक तो कर्मचारी वर्ग तैनात करावा लागेल. या नियमांचे उल्लंघन करणारी चित्रपटगृहे, हॉटेल्स, रेस्टॉरन्ट ही केंद्र सरकार कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती म्हणून अधिसूचित असेपर्यंत बंद करण्यात येतील. मास्क, सॅनिटायझेशन, अंगातील ताप तपासणी यंत्रणा याबाबतचे नियम हे शॉपिंग मॉल्ससाठीही लागू राहतील आणि या नियमांचे उल्लंघन केल्यास केंद्र सरकारकडून कोरोना हा राष्ट्रीय आपत्ती म्हणून अधिसूचित असेपर्यंत बंद करण्यात येतील.

गृह विलगीकरणात असलेल्यांची माहिती स्थानिक प्रशासनाला दिली जावी. गृह विलगीकरण झालेल्या घराच्या दारावर १४ दिवस बोर्ड लावण्यात यावा जेणेकरून तेथे कोरोनाबाधित रुग्ण असल्याचे कळेल. कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाच्या हातावर गृह विलगीकरणाचा शिक्का असावा. अशा रुग्णाच्या कुटुंबियांनीही त्यांचा वावर मर्यादित ठेवावा, मास्कशिवाय बाहेर पडू नये. या नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित रुग्णास तत्काळ कोविड केअर सेंटरमध्ये हलविण्यात येणार आहे.

कार्यालयांत ५० टक्केच उपस्थितीआरोग्य आणि इतर अत्यावश्यक सेवा वगळता अन्य शासकीय व खासगी कार्यालयांमध्ये केवळ ५० टक्के कर्मचारी उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे. या नियमाचे उल्लंघन करणारे कार्यालय हे केंद्र सरकार कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती म्हणून अधिसूचित असेपर्यंत बंद करण्यात येईल. घरून काम करण्यास (वर्क फ्रॉम होम) असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

- चित्रपटगृहे, हॉटेल्स, रेस्टॉरंटमध्ये ५० टक्केच उपस्थिती - विवाह समारंभाला ५० जणांच्याच उपस्थितीचे बंधन - अंत्यविधीला २० पेक्षा अधिक जण नकाेत- कार्यालयांमध्ये केवळ ५० टक्के कर्मचारी उपस्थिती - गृह विलगीकरण झालेल्या घराच्या दारावर १४ दिवस बोर्ड लावावा 

संसर्गाचे प्रमाण वाढू नये म्हणून ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंट या त्रिसूत्रीनुसार काम केले जात आहे. राज्यात कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात येत आहे. नागरिकांनीही गर्दी होणार नाही याची खबरदारी घ्यावी. राज्यामध्ये लसीचा तुटवडा नसून खासगी व शासकीय रुग्णालयांत लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याकरिता प्रयत्न केले जात आहेत.     - राजेश टोपे, आरोग्यमंत्री  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबईCorona vaccineकोरोनाची लस