शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

राज्यातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण ७.४१ टक्के

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 02:04 IST

रुग्ण बरे होण्यात राज्य अव्वल : ‘पॉझिटिव्ह’ प्रमाण एक टक्क्याने घटले

मुंबई/औरंगाबाद : राज्यातील कोरोना रुग्णांचे प्रमाण आठवडाभरात १.४० टक्क्याने वाढून ७.४१ टक्क्यांवर पोहोचले आहे. त्या तुलनेत जागतिक व देशातील मृत्यूचे प्रमाणही ०.७१ टक्क्याने वाढले. जागतिक प्रमाणापेक्षा महाराष्ट्राचे मृत्यूचे प्रमाण अधिक आढळून आले. राज्यातील होत असलेल्या तपासण्यांतून पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण ५ वरून ४ टक्के झाले आहे.

महाराष्ट्रात सध्या देशातील कोरोना बाधितांची संख्या आणि कोरोना मृत्यूचा आकडा सर्वाधिक असताना रुग्ण बरे होण्याची संख्याही राज्यातच सर्वाधिक असल्याचे सोमवारी समोर आलेल्या राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या विश्लेषण अहवालात म्हटले आहे. या अहवालानुसार, गेल्या आठवड्यापर्यंत एकही मृत्यू नसलेल्या झारखंडमध्ये दोन मृत्यू होऊन मृत्यूचे प्रमाण १०.५३ टक्के होऊन अव्वल स्थानी आले. त्यानंतर महाराष्ट्र, पंजाब, मध्यप्रदेश, गुजरात आहे. राज्यात आढळून आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांत महिला ३९ तर पुरुष ६१ टक्के आहेत. त्यात महिलांतील मृत्यूचे प्रमाण ३३ तर पुरुषांतील ६७ टक्के आहे. शासकीय प्रयोगशाळांच्या २२ हजार ७०७ मधून १२३३ रुग्ण तर १७ हजार १८ स्वॅबमधून ५२८ रुग्ण खाजगी प्रयोगशाळांच्या तपासण्यांतून पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले. यापैकी २ टक्के रुग्ण क्रिटिकल असून १४ टक्के रुग्ण बरे झाले.शंभरीपारही एक कोरोनाबाधित१- १० वयोगटामध्ये ६६ रुग्ण असून, हे प्रमाण ३.७५ टक्के, ११-२० वयोगटामध्ये १२७ रुग्ण, २१-३० वयोगटामध्ये ३५१, ३१-४० वयोगटामध्ये ३२८, ४१-५० वयोगटामध्ये ३५२, ५१-६० वयोगटामध्ये २७५, ६१-७० वयोगटामध्ये १७०, ७१-८० वयोगटामध्ये ६७, ८१-९० वयोगटामध्ये २०, ९१-१०० वयोगटामध्ये ४, १०१-११० वयोगटामध्ये १ रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे अहवालात म्हटले आहे. यात प्रामुख्याने विशीत १९.३३ टक्के, तिशीत १८.६३, चाळिशीत १९.९९ तर पन्नाशीतील १५.६२ टक्के प्रमाण आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMumbaiमुंबईAurangabadऔरंगाबाद