शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

मुंंबई, पुण्यात लॉकडाउन वाढणार; जिल्हाबंदी मात्र कायम राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2020 06:25 IST

कोरोनाबाधित कमी असलेल्या ठिकाणी व्यवहार पूर्वपदावर येणार

अतुल कुलकर्णी ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई, पुण्यासह काही शहरांमधील कोरोना बाधितांची संख्या कमी होताना दिसत नाही. धारावी झोपडपट्टी, वरळी या दाट लोकवस्ती असलेल्या भागातही रुग्ण सतत आढळत आहेत, त्यामुळे एमएमआरडीएसह ठाणे, नवी मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, अहमदनगर, नागपूर या भागातील लॉकडाऊन काही काळ वाढवला जाईल, अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी लोकमतला दिली.या सर्व जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत. मात्र रुग्णांची संख्या जोपर्यंत पूर्णपणे थांबत नाही तोपर्यंत लॉकडाऊन काढणे अडचणीचे होऊ शकते. हा आजार कसा आणि कुठे पसरत आहे हे ज्याच्यापासून लागण झाली आहे, त्याच्या मुळाशी जाईपर्यंत आणि ती व्यक्ती कितीजणांना त्या काळात भेटली हे कळेपर्यंत काही जणांना लागण झालेली असू शकते. त्यामुळे लगेचच काही निर्णय घेणे व लॉकडाऊन काढणे घाईचे ठरेल त्यामुळे असा निर्णय घेत असल्याचे थोरात म्हणाले. राज्यात जवळपास १० ते ११ असे जिल्हे आहेत त्या ठिकाणी सुदैवाने एकही रुग्ण आढळलेला नाही. ही आपल्यासाठी समाधानाची गोष्ट आहे. त्यामुळे १४ तारखेनंतर असे जिल्हे अंतर्गत व्यवहारासाठी खुले करण्याचा निर्णय घेतला जाईल. मात्र त्या जिल्ह्यांना जिल्हाबंदी लागू असेल, त्यांना अन्य जिल्ह्यात जाता येणार नाही असेही महसूलमंत्री थोरात यांनी स्पष्ट केले.मुख्यमंत्री ठाकरे अनुकूलमंत्रिमंडळाच्या मंगळवारच्या बैठकीतही बहुतेक सर्व मंत्र्यांनी लॉकडाऊन वाढविण्याची भूमिका मांडली, असे सूत्रांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही त्यास अनुकूलता दर्शवली; मात्र केंद्र सरकारशी सल्लामसलत करून लॉक डाऊन वाढवण्याबाबत योग्य वेळी निर्णय घेण्यात येईल येईल असे त्यांनी बैठकीत सांगितले.लॉकडाउन वाढविण्याचाकेंद्र सरकारचाही विचारनवी दिल्ली : देशव्यापी ‘लॉकडाऊन’ची मुदत १४ एप्रिल रोजी मध्यरात्री संपल्यानंतरही तो पूर्णपणे उठवू नये, अशी मागणी अनेक राज्यांनी व तज्ज्ञांनी केल्याने यावर केंद्र सरकारने गांभीर्याने विचार सुरु केला असल्याचे, सरकारी सूत्रांनी सांगितले. महाराष्ट्राखेरीज राजस्थान, उत्तर प्रदेश आसाम, छत्तीसगढ व झारखंड अशा किमान सहा राज्यांनी ‘लॉकडाऊन’ पूर्णपणे उठवू नये, असे सुचविले आहे.देशव्यापी नव्हे तरी जेथे करोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत अशा राज्यांपुरता ‘लॉकडाऊन’ सुरु ठेवणे व आंतरराज्य सीमांची बंदीही सुरुच ठेवणे या पर्यायावरही विचार होऊ शकतो.अर्थव्यवस्थेपेक्षा आरोग्य महत्त्वाचे : अर्थव्यवस्थेच्या चिंतेपक्षा माणसांचे आरोग्य महत्वाचे आहे. त्यामुळे ‘लॉकडाऊन’ कसा व केव्हा उठविताना याचा विचार प्रामुख्याने केला जायला हवा, असे मत उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसUddhav Thackerayउद्धव ठाकरे