शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

मुंंबई, पुण्यात लॉकडाउन वाढणार; जिल्हाबंदी मात्र कायम राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2020 06:25 IST

कोरोनाबाधित कमी असलेल्या ठिकाणी व्यवहार पूर्वपदावर येणार

अतुल कुलकर्णी ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई, पुण्यासह काही शहरांमधील कोरोना बाधितांची संख्या कमी होताना दिसत नाही. धारावी झोपडपट्टी, वरळी या दाट लोकवस्ती असलेल्या भागातही रुग्ण सतत आढळत आहेत, त्यामुळे एमएमआरडीएसह ठाणे, नवी मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, अहमदनगर, नागपूर या भागातील लॉकडाऊन काही काळ वाढवला जाईल, अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी लोकमतला दिली.या सर्व जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत. मात्र रुग्णांची संख्या जोपर्यंत पूर्णपणे थांबत नाही तोपर्यंत लॉकडाऊन काढणे अडचणीचे होऊ शकते. हा आजार कसा आणि कुठे पसरत आहे हे ज्याच्यापासून लागण झाली आहे, त्याच्या मुळाशी जाईपर्यंत आणि ती व्यक्ती कितीजणांना त्या काळात भेटली हे कळेपर्यंत काही जणांना लागण झालेली असू शकते. त्यामुळे लगेचच काही निर्णय घेणे व लॉकडाऊन काढणे घाईचे ठरेल त्यामुळे असा निर्णय घेत असल्याचे थोरात म्हणाले. राज्यात जवळपास १० ते ११ असे जिल्हे आहेत त्या ठिकाणी सुदैवाने एकही रुग्ण आढळलेला नाही. ही आपल्यासाठी समाधानाची गोष्ट आहे. त्यामुळे १४ तारखेनंतर असे जिल्हे अंतर्गत व्यवहारासाठी खुले करण्याचा निर्णय घेतला जाईल. मात्र त्या जिल्ह्यांना जिल्हाबंदी लागू असेल, त्यांना अन्य जिल्ह्यात जाता येणार नाही असेही महसूलमंत्री थोरात यांनी स्पष्ट केले.मुख्यमंत्री ठाकरे अनुकूलमंत्रिमंडळाच्या मंगळवारच्या बैठकीतही बहुतेक सर्व मंत्र्यांनी लॉकडाऊन वाढविण्याची भूमिका मांडली, असे सूत्रांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही त्यास अनुकूलता दर्शवली; मात्र केंद्र सरकारशी सल्लामसलत करून लॉक डाऊन वाढवण्याबाबत योग्य वेळी निर्णय घेण्यात येईल येईल असे त्यांनी बैठकीत सांगितले.लॉकडाउन वाढविण्याचाकेंद्र सरकारचाही विचारनवी दिल्ली : देशव्यापी ‘लॉकडाऊन’ची मुदत १४ एप्रिल रोजी मध्यरात्री संपल्यानंतरही तो पूर्णपणे उठवू नये, अशी मागणी अनेक राज्यांनी व तज्ज्ञांनी केल्याने यावर केंद्र सरकारने गांभीर्याने विचार सुरु केला असल्याचे, सरकारी सूत्रांनी सांगितले. महाराष्ट्राखेरीज राजस्थान, उत्तर प्रदेश आसाम, छत्तीसगढ व झारखंड अशा किमान सहा राज्यांनी ‘लॉकडाऊन’ पूर्णपणे उठवू नये, असे सुचविले आहे.देशव्यापी नव्हे तरी जेथे करोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत अशा राज्यांपुरता ‘लॉकडाऊन’ सुरु ठेवणे व आंतरराज्य सीमांची बंदीही सुरुच ठेवणे या पर्यायावरही विचार होऊ शकतो.अर्थव्यवस्थेपेक्षा आरोग्य महत्त्वाचे : अर्थव्यवस्थेच्या चिंतेपक्षा माणसांचे आरोग्य महत्वाचे आहे. त्यामुळे ‘लॉकडाऊन’ कसा व केव्हा उठविताना याचा विचार प्रामुख्याने केला जायला हवा, असे मत उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसUddhav Thackerayउद्धव ठाकरे