शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
2
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
3
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
4
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
5
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
6
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
7
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
8
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
9
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
10
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
11
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
12
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
13
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
14
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
15
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
16
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
17
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
18
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
19
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
20
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?

Corona Virus: हृदयद्रावक! जीवंत पत्नीसाठी पतीनं केलीय अंत्यसंस्काराची तयारी, मुंबईतील दाम्पत्याची करुण कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2020 16:22 IST

अतुल यांनी  पत्नीच्या उपचारासाठी गेल्या वर्षभरात सुमारे 10 लाख रुपये खर्च केले आहेत. तरीही अतुल यांच्या हाती यश आलेले नाही.

कोरोना महामाराशी सामना करण्यासाठी लॉकडाउन गरजेचा आहे, पण यामुळे अनेकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. कोणाला वेळेवर अन्न मिळत नाहीये, तर कोणी आपल्या कुटुंबापासून दूर अडकून पडला आहे. मात्र त्यांची व्यथा ऐकणारा कोणीच नाही. मुंबईतही अशीच एक घटना घडली आहे. कपडे व्यापारी अतुल श्रीवास्तव बिहारमधून आपल्या पत्नीवर उपचार करण्यासाठी ९ मार्चला मुंबईत आले, दरम्यान, लॉकडाउनमुळे आता ते इथेच अडकून आहेत. इतकेच नाही तर अतुल यांनी जीवंत पत्नीच्या अंत्यसंस्काराची देखील तयारी करून ठेवली आहे. पत्नी वंदना आणि लहान बहिणीसह अतुल मुंबईच्या परळमध्ये राहत आहेत.

अतुल यांच्या पत्नीची अंतिम इच्छा आहे की तिला एकदा आपल्या मुलांना भेटायचे आहे, त्यांना डोळे भरून पहायचे आहे. परंतु रुग्णवाहिकेतून पत्नीला बिहारला नेण्यासाठी अतुल यांच्याकडे पुरेसे पैसेही नाहीत. मुंबईतून बिहारला घेऊन जाण्यासाठी ७० हजार रुपये खर्च लागणार आहे. आणि आता अतुलकडे फक्त तीन हजार रूपये बाकी आहेत. वंदना गेल्याकाही दिवसांपासून आजारी आहे. मूत्रपिंडाचा कर्करोगाने वंदना पिडीत आहे. दिवसेंदिवस वंदनाची तब्येत आणखी खालावत आहे. तिच्या उपचारासाठी अतुल यांनी पत्नीला केईएम रूग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला होतो. उपचार सुरू असल्यामुळे रूग्णालया जवळच अतुल यांनी एक खोली भाड्याने घेतली. 

बायकोवर उपचार सुरू असताना कोरोना विषाणूने त्यांच्यात आणखीन विघ्न टाकले आहे. लॉकडाऊन देशभरात घोषित केल्यामुळे अतुल पत्नीला घेवून घरी बिहारमध्येही जाऊ शकत नाही. अतुल यांनी  पत्नीच्या उपचारासाठी गेल्या वर्षभरात सुमारे 10 लाख रुपये खर्च केले आहेत. तरीही अतुल यांच्या हाती यश आलेले नाही. कधीही त्यांची पत्नी त्यांना सोडून जाऊ शकते. याची मनाची तयारी आता अतुल यांनी देखील केली असावी. म्हणून पत्नीसह अतुल यांनी स्वतःला एका खोलीत बंद करून घेतले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस