शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
3
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
4
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
5
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
6
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
7
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
8
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
9
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
10
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
11
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
12
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
13
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
14
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
15
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
16
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
17
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
18
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
19
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

कोरोना, सारी साथीच्या संकटात राजकीय पातळीवर अनास्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 03:30 IST

औरंगाबादच्या पालकमंत्र्यांची अनुपस्थिती : उपाययोजनांमध्ये इतर मंत्रीही निवांत

औरंगाबाद : कोरोना विषाणूचे संकट थोपविण्यासाठी राज्य शासन निर्णय घेत असतानाच प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री बैठका घेऊन आदेश देत आहेत. मात्र औरंगाबादेत सारी आणि कोरोनाच्या विषाणूने थैमान घातले असताना पालकमंत्री सुभाष देसाई मुंबईत आहेत. त्याशिवाय जिल्ह्यातील दोन मंत्र्यांपैकी राज्यमंत्र्यांनी मागील आठवड्यात प्रशासनासोबत आढावा बैठक घेतली. इतर लोकप्रतिनिधी स्वत:च्या मतदारसंघात उपाययोजना आणि मदतीमध्ये गुंतले असून, जिल्हास्तरावर एकमुखी नेतृत्वाची अनास्था असल्याचे समोर आले. त्यामुळे तुटवडा असलेल्या वस्तू मिळविण्यासाठी राजकीय पाठबळाच्या अभावी संघर्ष करावा लागत आहे.

औरंगाबाद शहरात ‘कोरोना’चा एक मृत्यू आणि सारी आजाराने आतापर्यंत १५ जणांचा बळी गेला असताना या प्रश्नावर उपाययोजनेसंदर्भात पालकमंत्र्यांपासून इतर मंत्री आणि सत्तारूढ पक्षाच्या नेत्यांमध्ये अनास्थाच दिसत आहे. शहरात सारीची लागण झालेल्या संशयितांचा आकडा १६८ एवढा आहे. त्याचवेळी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २० वर पोहोचली. त्यातील एकाचा मृत्यूही झाला आहे. या संकटकाळात जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात उपाययोजना करण्यात येत आहेत. लॉकडाउनची अंमलबजावणी करताना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात एका टोळक्याने पोलिसांना मारहाण केली.याशिवाय घाटी रुग्णालयात पीपीई किट आणि एन-९५ मास्कचा तुटवडा असल्यामुळे निवासी डॉक्टरांनी आंदोलन केले. लॉकडाउनच्या काळात अनेक ठिकाणी लोक पोलिसांना जुमानत नसल्याचे दिसते. या सर्व प्रक्रियेमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून सुभाष देसाई यांना भूमिका बजावता आलेली नाही. मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक असल्याने ते तिकडे व्यस्त असल्याचे सांगितले जात असले तरी त्यांनी जिल्ह्याच्या परिस्थितीचा एकदाही आढावा घेतला नसल्याची माहिती आहे. पालकमंत्र्यांनी मागील महिनाभरात औरंगाबादचा दौरा केलेला नाही किंवा शासनाच्या वतीने अब्दुल सत्तार किंवा संदिपान भुमरे या दोन मंत्र्यांनाही त्यासंदर्भात आढावा घेण्याच्या सूचना नाहीत. त्यामुळे कॅबिनेट मंत्री असलेले संदीपान भुमरे हे त्यांच्या पैठण मतदारसंघातच अडकले आहेत.राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी औरंगाबाद जिल्हा परिषदेमध्ये बैठक घेऊन काही सूचना केल्या. शिवाय ते धुळ्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे त्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले. मात्र औरंगाबादच्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी राजकीय पातळीवर पावले उचलली गेली नसल्याचे स्पष्ट होत आहे.काही मंत्री सक्रियनांदेडमध्ये सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, बीडमध्ये सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, लातूरमध्ये वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख आदी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठका घेत परिस्थिती हाताळत आहेत. औरंगाबादेत सर्वाधिक रुग्ण असतानाही राज्य शासनाकडून पाहिजे तेवढी दखल घेण्यात येत नसल्याचेही समोर येत आहे. याविषयी सुभाष देसाई यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता, त्यांना मेसेज पाठविला असता प्रतिसाद मिळाला नाही.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSubhash Desaiसुभाष देसाईcorona virusकोरोना वायरस बातम्या