शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

कोरोना, सारी साथीच्या संकटात राजकीय पातळीवर अनास्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 03:30 IST

औरंगाबादच्या पालकमंत्र्यांची अनुपस्थिती : उपाययोजनांमध्ये इतर मंत्रीही निवांत

औरंगाबाद : कोरोना विषाणूचे संकट थोपविण्यासाठी राज्य शासन निर्णय घेत असतानाच प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री बैठका घेऊन आदेश देत आहेत. मात्र औरंगाबादेत सारी आणि कोरोनाच्या विषाणूने थैमान घातले असताना पालकमंत्री सुभाष देसाई मुंबईत आहेत. त्याशिवाय जिल्ह्यातील दोन मंत्र्यांपैकी राज्यमंत्र्यांनी मागील आठवड्यात प्रशासनासोबत आढावा बैठक घेतली. इतर लोकप्रतिनिधी स्वत:च्या मतदारसंघात उपाययोजना आणि मदतीमध्ये गुंतले असून, जिल्हास्तरावर एकमुखी नेतृत्वाची अनास्था असल्याचे समोर आले. त्यामुळे तुटवडा असलेल्या वस्तू मिळविण्यासाठी राजकीय पाठबळाच्या अभावी संघर्ष करावा लागत आहे.

औरंगाबाद शहरात ‘कोरोना’चा एक मृत्यू आणि सारी आजाराने आतापर्यंत १५ जणांचा बळी गेला असताना या प्रश्नावर उपाययोजनेसंदर्भात पालकमंत्र्यांपासून इतर मंत्री आणि सत्तारूढ पक्षाच्या नेत्यांमध्ये अनास्थाच दिसत आहे. शहरात सारीची लागण झालेल्या संशयितांचा आकडा १६८ एवढा आहे. त्याचवेळी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २० वर पोहोचली. त्यातील एकाचा मृत्यूही झाला आहे. या संकटकाळात जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात उपाययोजना करण्यात येत आहेत. लॉकडाउनची अंमलबजावणी करताना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात एका टोळक्याने पोलिसांना मारहाण केली.याशिवाय घाटी रुग्णालयात पीपीई किट आणि एन-९५ मास्कचा तुटवडा असल्यामुळे निवासी डॉक्टरांनी आंदोलन केले. लॉकडाउनच्या काळात अनेक ठिकाणी लोक पोलिसांना जुमानत नसल्याचे दिसते. या सर्व प्रक्रियेमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून सुभाष देसाई यांना भूमिका बजावता आलेली नाही. मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक असल्याने ते तिकडे व्यस्त असल्याचे सांगितले जात असले तरी त्यांनी जिल्ह्याच्या परिस्थितीचा एकदाही आढावा घेतला नसल्याची माहिती आहे. पालकमंत्र्यांनी मागील महिनाभरात औरंगाबादचा दौरा केलेला नाही किंवा शासनाच्या वतीने अब्दुल सत्तार किंवा संदिपान भुमरे या दोन मंत्र्यांनाही त्यासंदर्भात आढावा घेण्याच्या सूचना नाहीत. त्यामुळे कॅबिनेट मंत्री असलेले संदीपान भुमरे हे त्यांच्या पैठण मतदारसंघातच अडकले आहेत.राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी औरंगाबाद जिल्हा परिषदेमध्ये बैठक घेऊन काही सूचना केल्या. शिवाय ते धुळ्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे त्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले. मात्र औरंगाबादच्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी राजकीय पातळीवर पावले उचलली गेली नसल्याचे स्पष्ट होत आहे.काही मंत्री सक्रियनांदेडमध्ये सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, बीडमध्ये सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, लातूरमध्ये वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख आदी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठका घेत परिस्थिती हाताळत आहेत. औरंगाबादेत सर्वाधिक रुग्ण असतानाही राज्य शासनाकडून पाहिजे तेवढी दखल घेण्यात येत नसल्याचेही समोर येत आहे. याविषयी सुभाष देसाई यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता, त्यांना मेसेज पाठविला असता प्रतिसाद मिळाला नाही.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSubhash Desaiसुभाष देसाईcorona virusकोरोना वायरस बातम्या