शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

मतभेद टाळण्यासाठी महाविकास आघाडीची समन्वय समिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 13:54 IST

समिती केंद्रीय असल्यामुळे राज्यातील प्रश्न चर्चेतून सोडविण्यात येतील. त्यामुळे राज्यातील स्थानिक नेत्यांच्या वादग्रस्त विधानांवर बंधन येणार आहेत.  यातून मतभेद होण्याची शक्यता कमी होईल, अशी आशा महाविकास आघाडीला आहे.

मुंबई - राज्यात प्रथमच काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस या तीन प्रमुख पक्षांनी मिळून भाजपला दूर ठेवण्यासाठी सरकार स्थापन केले आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून तिन्ही पक्ष एकत्र आले आहेत. मात्र एकमेकांविषयी नको ते खुलासे करत नेत्यांकडून मित्र पक्षांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. याला चाप लावण्यासाठी महाविकास आघाडीने समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. या समितीत केंद्रीय पातळीवरच्या नेत्यांना सामील करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.  

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांची धर्मनिरपेक्ष विचारधारा आहे. तर शिवसेना हिंदुत्ववादी विचारांनी चालणारा पक्ष आहे. मात्र सत्ता स्थापन करताना तिन्ही पक्षांनी काही बाबतीत मवाळ भूमिका घेतली आहे. तरी विचारधारेत अचानक बदल होणे तितकेसे सोपे नाही. त्यातच काँग्रेस-शिवसेना एकत्र येत असताना सर्वप्रथम सावरकरांचा मुद्दा समोर आला होता. त्यामुळे सेना काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

मध्यंतरी शिवसेना नेते संजय राऊत यांनी सावरकरांविषयी आपली भूमिका स्पष्ट केली होती. तसेच इंदिरा गांधी अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला याला भेटल्या होत्या, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला. त्यामुळे काँग्रेसमधून संताप व्यक्त करण्यात आला. त्यानंतर संजय राऊत यांनी आपले शब्द मागे घेतले. तर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले होते की, सत्तास्थापनेसाठी शिवसेनेने 2014 मध्ये देखील काँग्रेसचे दार ठोठावले होते. यामुळे विरोधकांनी शिवसेनेला लक्ष्य केले आहे. मात्र यामुळे महाविकास आघाडीत मतभेदाची ठिणगी पडली की काय अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. 

दरम्यान महाविकास आघाडीत समन्वय राहून पाच वर्षे सरकार टीकण्यासाठी केंद्रीय नेत्यांनी पुढाकार घेतला आहे. यामुळे समन्वय समिती स्थापन करण्यात येत असून यामध्ये काँग्रेसचे अहमद पटेल, मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, प्रफुल्ल पटेल, शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि खासदार अनिल देसाई असण्याची शक्यता आहे. समिती केंद्रीय असल्यामुळे राज्यातील प्रश्न चर्चेतून सोडविण्यात येतील. त्यामुळे राज्यातील स्थानिक नेत्यांच्या वादग्रस्त विधानांवर बंधन येणार आहेत.  यातून मतभेद होण्याची शक्यता कमी होईल, अशी आशा महाविकास आघाडीला आहे.