शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
5
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
6
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
7
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
8
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
9
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
10
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
11
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
12
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
13
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
14
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
15
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
16
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
17
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
18
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
19
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
20
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

महायुतीमध्ये समन्वय समिती, प्रसाद लाड समन्वयक; प्रत्येकी चार नेत्यांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 07:43 IST

राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार आल्यानंतर दोन पक्षांचे काही मंत्री महामंडळांवरील नियुक्त्यांचा विषय मार्गी लावण्यासाठी दोनवेळा एकत्र बसले होते; पण त्याला समितीचे स्वरूप नव्हते

मुंबई : सत्तारुढ भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यात समन्वयासाठी अखेर एक समिती नियुक्त करण्यात आली आहे. तिन्ही पक्षांचे प्रत्येकी चार नेते या समितीत असतील. भाजपचे विधान परिषद सदस्य प्रसाद लाड हे समितीचे समन्वयक असतील. तीन पक्षांमधील विसंवाद दूर करण्याचे काम ही समिती करेल. वादाचे विषय माध्यमांसमोर नेण्याऐवजी आधी या समितीत त्यांची चर्चा केली जाईल व नंतर तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांना त्याबाबतची माहिती दिली जाईल. 

राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार आल्यानंतर दोन पक्षांचे काही मंत्री महामंडळांवरील नियुक्त्यांचा विषय मार्गी लावण्यासाठी दोनवेळा एकत्र बसले होते; पण त्याला समितीचे स्वरूप नव्हते. मध्यंतरी एका जाहिरातीवरून भाजप-शिवसेनेत काहीसा तणाव निर्माण झाल्यानंतर समन्वय समिती स्थापन करण्याचे ठरले होते. शंभूराज देसाई यांनी तशी माहितीही माध्यमांना दिली होती. आता युतीमध्ये राष्ट्रवादी हा आणखी एक पक्ष सहभागी झाल्यानंतर तीन पक्षांची मिळून समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. 

समितीत यांचा समावेश समितीमध्ये भाजपतर्फे  प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आ. आशिष शेलार, शिवसेनेकडून उदय सामंत, शंभूराज देसाई, दादा भुसे आणि खा. राहुल शेवाळे तर राष्ट्रवादीतर्फे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, छगन भुजबळ,  दिलीप वळसे-पाटील व धनंजय मुंडे यांचा समावेश आहे.

समन्वय समितीच्या माध्यमातून राज्याच्या विकासकामांचा लेखाजोखा घेतला जाणार असून, तीनही पक्षांमध्ये निधी वाटपापासून ते महापालिका, विधानसभा, लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपात समन्वय समितीच्या माध्यमातून योग्य समन्वय साधला जाणार आहे. - आ. प्रसाद लाड, समितीचे समन्वयक 

टॅग्स :BJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाPrasad Ladप्रसाद लाड