शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

स्थानिक स्वराज्य संस्थांवरून शिवसेना-राष्ट्रवादीत जुगलबंदी; अनंत गीते यांचा हल्लाबोल, दिला स्वबळाचा नारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2021 06:58 IST

राज्यातील सत्ता सांभाळण्याचे काम आपले नेते करतील, तुम्हाला आणि मला आपले गाव सांभाळायचे आहे. त्यामुळे कामाला लागा, असे आदेशच त्यांनी कार्यकर्त्यांना दिले. श्रीवर्धन येथे पक्षप्रवेश कार्यक्रम साेमवारी पार पडला, त्याप्रसंगी ते बाेलत हाेते.

आविष्कार देसाई -

रायगड : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहूल लागताच जिल्ह्याच्या राजकारणात आता राजकीय धुरळा उडायला सुरुवात झाली आहे. श्रीवर्धन येथील कार्यक्रमात शिवसेना नेते माजी खासदार अनंत गीते यांनी मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर हल्लाबाेल करीत स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मित्रपक्षांमध्येच आरोप-प्रत्यारोपांची राजकीय जुगलबंदी रंगणार असल्याचे चित्र आहे.राज्यातील सत्ता सांभाळण्याचे काम आपले नेते करतील, तुम्हाला आणि मला आपले गाव सांभाळायचे आहे. त्यामुळे कामाला लागा, असे आदेशच त्यांनी कार्यकर्त्यांना दिले. श्रीवर्धन येथे पक्षप्रवेश कार्यक्रम साेमवारी पार पडला, त्याप्रसंगी ते बाेलत हाेते. दाेन्ही काँग्रेस एकमेकांचे ताेंड पाहत नव्हत्या. त्यांच्या विचारांची सांगड नाही. त्यांचे एकमेकांबराेबर जमतही नाही. दाेन्ही काँग्रेस एक विचारांची हाेऊ शकत नाही, तर शिवसेना काँग्रेसी विचारांची कशी हाेईल, असा परखड सवाल गीते यांनी करून, राज्यातील सत्तेत एकत्र असलेल्या मित्रपक्षांवर हल्लाबाेल केला. मुळात राष्ट्रवादीचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला आहे. राज्यात आघाडीचे सरकार असले तरी आम्ही आघाडीचे सैनिक नाही, तर आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहाेत, असे सांगत, आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काेणत्याही पक्षांशी युती - आघाडी करायची नाही, तर स्वबळावर लढवायच्या आहेत, असे गीते यांनी अधाेरेखित केल्याने आगामी निवडणुकांमध्येदेखील मविआतील घटकपक्षांमध्ये असलेला विसंवाद प्रखरतेने जाणवू लागला आहे.

ज्या दिवशी आघाडी तुटेल, त्यावेळी तुम्ही काय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्या घरी जाणार आहात का, असा सवाल त्यांनी कार्यकर्त्यांना केला. शेवटी तुम्हाला आपल्याच घरी यायचे आहे. यासाठी आपले घर टिकवायचे आहे, मजबूत करायचे आहे, सांभाळायचे आहे. यासाठी एकजुटीने एकत्र या.- अनंत गीते, माजी खासदार, शिवसेना

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांवरच निशाणाआमचे नेते शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच आहेत. आम्ही कोणालाही आमचा नेता मानत नाही. अन्य काेणाला जाणता राजा म्हणाे, परंतु ते आमचे गुरू नाहीत. आमचे गुरू बाळासाहेब ठाकरेच आहेत, असे सांगत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष्य केले. राज्यातील महाविकास आघाडी म्हणजे सत्तेची तडजाेड आहे. जाेपर्यंत टिकून आहे, ताेपर्यंत असल्याचा दावाही त्यांनी केला.

वातावरणनिर्मितीराज्यातील सत्तेमध्ये शिवसेना आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचा विश्वास वाढला आहे. शिवसेनेबाबत वातावरण सकारात्मक असल्याची धारणा शिवसेनेचे नेते, पदाधिकाऱ्यांची आहे. रायगड जिल्हा परिषदेची निवडणूक स्वबळावर लढवून जास्तीत जास्त जागा जिंकायच्या, असे मनसुबे शिवसेनेचे दिसत असून त्याचीच वातावरण निर्मिती गीते यांनी श्रीवर्धन येथून केल्याचे बाेलले जाते. 

 

टॅग्स :Anant Geeteअनंत गीतेShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण