शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

"पवार साहेबांचा पक्ष चोरून..."; पुण्यातल्या पुरावरुन मनसे-राष्ट्रवादीत जुंपली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 10:42 IST

Pune Flood : पुण्यातल्या पुरपरिस्थितीवरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला लगावला होता

Raj Thackeray : पुण्यात आलेल्या पुरामुळे एकीकडे लोकांचे प्रचंड नुकसान झालेलं असताना दुसरीकडे राजकारण सुरु झालं आहे. पुणे दौऱ्यावर असलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुराच्या घटनेवरुन प्रशासनावर निशाणा साधला. मुसळधार पावसानंतर पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आला होता. त्यामुळे  एकतानगरी, निंबजनगर, विठ्ठलवाडी हे भाग पाण्याखाली गेले होते. यावेळी राज ठाकरे यांनी पालकमंत्री अजित पवार यांच्यावरही निशाणा साधला. त्यावर राष्ट्रवादीने प्रत्युत्तर देताच मनसेने थेट अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

पुण्यातल्या पावसाच्या घटनेनंतर राज ठाकरे यांनी पुणेकरांशी संवाद साधत पत्रकार परिषद घेतली. "एवढं पाणी सोडतील याची लोकांना कल्पनाही नव्हती. घरांमध्ये अत्यंत वाईट परिस्थिती आहे. मला वाटत शासनाने या गोष्टींचा विचार करायला हवा. मुंबई बरबाद व्हायला वेळ लागला, पुण्याला वेळ लागणार नाही. प्रशासनाचे नियोजन दिसून येत नाही. पुणे हे एक शहर नाही, पाच पाच शहरं झाली आहेत. राज्यामधली लोक भिका मागतात आणि बाहेरचे येऊन राहतात याला काही सरकार चालवणं म्हणतात का?," असा सवाल राज ठाकरे यांनी केला होता. यासह अजित पवारांचे नाव न घेता उपमुख्यमंत्री पुण्यात नसतानाही धरण वाहिलं, इतकं पाणी पडलं, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला होता.

राज ठाकरेंच्या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी माध्यमांशी बोलताना मनसे अध्यक्षांवर शा‍ब्दिक हल्ला केला. दिलेला शब्द पाळणाऱ्या अजित पवारांबद्दल सुपारीबहाद्दरांनी बोलू नये. कारण या सुपारीबहाद्दरांचं टोलनाक्याचं, भोंग्याचं किंवा इतर कोणतंही आंदोलन यशस्वी झालं नाही. आतापर्यंत सर्वात अयशस्वी ठरलेल्या व्यक्तीने अजित पवारांच्या कार्यकर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं म्हणजे हे सूर्याला वाकुल्या दाखवण्यासारखं आहे, अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली.

मिटकरींच्या या टीकेला मनसे नेते गजानन काळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. गजानन काळे यांनी एक्स सोशल मिडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट करत भाष्य केलं आहे. "७० हजार कोटींचा घोटाळा करून नुसते पान सुपारी नाही तर महाराष्ट्राला चुना लावला अजित दादांनी (हे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.) तरी घासलेट चोर वर तोंड करून आम्हाला सुपारीबाज बोलतोय. अजितदादांच्या घरातल्या सदस्यांना एकदा नव्हे तर दोनदा निवडणुकीत पराभूत व्हावे लागले आणि कसल्या राज ठाकरे यांच्या यश अपयशाच्या बाता मारतो रे घासलेट चोर? हिम्मत असेल तर स्वतःचा पक्ष काढून २ आमदार निवडून आणावेत तुमच्या दादांनी, मग जाहीर मिशी कापून तुझ्या हातात देवू," असं गजानन काळे यांनी म्हटलं आहे. तसेच उगाच पवार साहेबांचा पक्ष चोरून रेघोट्या मारू नका. पक्ष चोरून पण १ खासदार निवडून आणताना दमछाक झाली तुमच्या दादांची. ते सुनील तटकरे पण स्वतःच्या हिम्मतीवर आले, असंही काळेंनी म्हटलं.

काय म्हणाले होते राज ठाकरे?

"पाऊस पडणं आपल्या हातात नाही पण असा पाऊस  पडल्यानतंर दरवाजे उघडले जातील त्याचा लोकांना त्रास होणार नाही याचं कोणतं प्लॅनिग केलं आहे. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आहेत. एक तर पुण्याचे आहेत. ते नसतानाही धरण वाहिलं, इतकं पाणी पडलं. त्यांनी यात लक्ष घालायला नको का?" असा टोला राज ठाकरेंनी लगावला होता. 

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारRaj Thackerayराज ठाकरेAmol Mitkariअमोल मिटकरी