शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
3
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
4
Yavatmal Accident: गाडी शिकताना नियंत्रण सुटलं अन्...; एकाच कुटुंबातील ४ जण ठार
5
बॉयफ्रेंडसोबत मिळून केली आईची हत्या, मग रचलं जीवन संपवल्याचं नाटक, मुलीचं भयानक कृत्य  
6
उल्हासनगरमध्ये भाजपला मोठे खिंडार! उद्धवसेनेच्या नेत्याच्या प्रवेशावरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर
7
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
8
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
9
Suzuki ने लॉन्च केले Access चे CNG व्हेरिएंट; जाणून घ्या मायलेज अन् किंमत...
10
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
11
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
12
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
13
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
14
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
15
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
16
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
17
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
18
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
19
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
20
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?

राज्यातील सामुदायिक विवाह सोहळ्यांना ‘नाम’चा हातभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 04:58 IST

राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना, दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात देणारी नाम फाउंडेशन आता सामुदायिक विवाह सोहळ्यांसाठीही पुढाकार घेत आहे. मराठवाडा आणि विदर्भ या दुष्काळग्रस्त भागात प्रत्येक जिल्ह्याला सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी प्रत्येकी एक लाखाचा निधी देण्याचा निर्णय नाम फाउंडेशनने घेतला आहे.

- गौरीशंकर घाळेमुंबई  - राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना, दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात देणारी नाम फाउंडेशन आता सामुदायिक विवाह सोहळ्यांसाठीही पुढाकार घेत आहे. मराठवाडा आणि विदर्भ या दुष्काळग्रस्त भागात प्रत्येक जिल्ह्याला सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी प्रत्येकी एक लाखाचा निधी देण्याचा निर्णय नाम फाउंडेशनने घेतला आहे.आर्थिकदृष्टया हालाखीच्या परिस्थितीमुळे विवाहाची चिंता असणारा मोठा वर्ग आहे. पैशाअभावी शेतकरी, शेतमजूर कुटुंबातील मुलामलींची लग्ने राहिल्याची अनेक उदाहरणे आहेत. विशेषत: मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागात लग्नाच्या ओझ्यापायी मुलींनी आत्महत्या केल्याच्या घटनाही अनेकदा समोर आल्या आहेत. सामुदायिक विवाह सोहळ्यांच्या माध्यमातून या समस्येवर मात करण्याचा प्रयत्न राज्य धर्मादाय आयुक्तालयाने सुरू केला आहे. धार्मिंक संस्था, सामाजिक संस्थांच्या माध्यमातून जिल्हानिहाय समित्याही स्थापन करण्यात आल्या आहेत. या उपक्रमात नाम फाउंडेशनही सहभागी होईल. पहिल्या टप्प्यात विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांसाठी प्रत्येकी एक लाखाचा निधी दिला जाईल. आवश्यकता भासल्यास राज्यभरातील समित्यांबाबत असा निर्णय घेण्याचीही तयारी ‘नाम’ने दर्शविली आहे.आयोजनासाठी समित्यांची स्थापनाधार्मिक, शैक्षणिंक संस्थांच्या सहयोगाने सामुदायिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करण्यासाठी राज्यभर जिल्हनिहाय समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. आतापर्यंत नगर, दौंड, सोलापूर, शिर्डी, ठाणे आदी ठिकाणी या समित्यांच्या माध्यमातून सामुदायिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. १५ मेपर्यंत अन्य समित्यांच्या माध्यमातूनही अशा प्रकारचे सोहळे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी दिली. धार्मिक संस्थांकडे मोठ्या प्रमाणावर निधी जमा होतो. यातील काही निधी समाजातील वंचित घटकांसाठी वापरला जावा या हेतूने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचेही डिगे यांनी सांगितले.फुलांची अक्षता : विशेष बाब म्हणजे अन्नधान्याची नासाडी टाळावी, यासाठी सामुदायिक विवाह सोहळ्याप्रसंगी फक्त व्यासपीठावर, जोडप्यांजवळ असणा-या व-हाडींनाचअक्षता दिल्या जाणार आहेत. स्टेजपासून लांब असणा-यांना अक्षता म्हणून फुले देण्याचानिर्णय समित्यांनी घेतला आहे. त्यामुळे विवाहसोहळ्यातील अन्नधान्याची नासाडीही थांबणार आहे.

टॅग्स :social workerसमाजसेवकMaharashtraमहाराष्ट्र