शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

राज्यातील सामुदायिक विवाह सोहळ्यांना ‘नाम’चा हातभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 04:58 IST

राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना, दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात देणारी नाम फाउंडेशन आता सामुदायिक विवाह सोहळ्यांसाठीही पुढाकार घेत आहे. मराठवाडा आणि विदर्भ या दुष्काळग्रस्त भागात प्रत्येक जिल्ह्याला सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी प्रत्येकी एक लाखाचा निधी देण्याचा निर्णय नाम फाउंडेशनने घेतला आहे.

- गौरीशंकर घाळेमुंबई  - राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना, दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात देणारी नाम फाउंडेशन आता सामुदायिक विवाह सोहळ्यांसाठीही पुढाकार घेत आहे. मराठवाडा आणि विदर्भ या दुष्काळग्रस्त भागात प्रत्येक जिल्ह्याला सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी प्रत्येकी एक लाखाचा निधी देण्याचा निर्णय नाम फाउंडेशनने घेतला आहे.आर्थिकदृष्टया हालाखीच्या परिस्थितीमुळे विवाहाची चिंता असणारा मोठा वर्ग आहे. पैशाअभावी शेतकरी, शेतमजूर कुटुंबातील मुलामलींची लग्ने राहिल्याची अनेक उदाहरणे आहेत. विशेषत: मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागात लग्नाच्या ओझ्यापायी मुलींनी आत्महत्या केल्याच्या घटनाही अनेकदा समोर आल्या आहेत. सामुदायिक विवाह सोहळ्यांच्या माध्यमातून या समस्येवर मात करण्याचा प्रयत्न राज्य धर्मादाय आयुक्तालयाने सुरू केला आहे. धार्मिंक संस्था, सामाजिक संस्थांच्या माध्यमातून जिल्हानिहाय समित्याही स्थापन करण्यात आल्या आहेत. या उपक्रमात नाम फाउंडेशनही सहभागी होईल. पहिल्या टप्प्यात विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांसाठी प्रत्येकी एक लाखाचा निधी दिला जाईल. आवश्यकता भासल्यास राज्यभरातील समित्यांबाबत असा निर्णय घेण्याचीही तयारी ‘नाम’ने दर्शविली आहे.आयोजनासाठी समित्यांची स्थापनाधार्मिक, शैक्षणिंक संस्थांच्या सहयोगाने सामुदायिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करण्यासाठी राज्यभर जिल्हनिहाय समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. आतापर्यंत नगर, दौंड, सोलापूर, शिर्डी, ठाणे आदी ठिकाणी या समित्यांच्या माध्यमातून सामुदायिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. १५ मेपर्यंत अन्य समित्यांच्या माध्यमातूनही अशा प्रकारचे सोहळे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी दिली. धार्मिक संस्थांकडे मोठ्या प्रमाणावर निधी जमा होतो. यातील काही निधी समाजातील वंचित घटकांसाठी वापरला जावा या हेतूने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचेही डिगे यांनी सांगितले.फुलांची अक्षता : विशेष बाब म्हणजे अन्नधान्याची नासाडी टाळावी, यासाठी सामुदायिक विवाह सोहळ्याप्रसंगी फक्त व्यासपीठावर, जोडप्यांजवळ असणा-या व-हाडींनाचअक्षता दिल्या जाणार आहेत. स्टेजपासून लांब असणा-यांना अक्षता म्हणून फुले देण्याचानिर्णय समित्यांनी घेतला आहे. त्यामुळे विवाहसोहळ्यातील अन्नधान्याची नासाडीही थांबणार आहे.

टॅग्स :social workerसमाजसेवकMaharashtraमहाराष्ट्र