शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

घटनात्मकदृष्ट्या मराठा आरक्षण देऊ शकत नाही, तरी...; जितेंद्र आव्हाडांचा थेट सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 09:08 IST

मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरावेळी सत्ता गेली तरी बेहत्तर शरद पवारांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दिले असं आव्हाडांनी म्हटलं.

शिर्डी - Jitendra Awhad on Reservation ( Marathi News ) घटनात्मकदृष्ट्या मराठा आरक्षण देऊ शकत नाही. हे मुख्यमंत्र्यांना माहिती नव्हतं?. त्यांचे कायदेशीर सल्लागार, महाधिवक्ते हे मुख्यमंत्र्यांना सल्ले द्यायला असतात. मग घटनेनुसार मराठा समाजाला आरक्षण देता येऊ शकत नाही हा सल्ला त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला नव्हता?. दुसरीकडे ओबीसी आरक्षण कापण्याचा प्रश्न येतोच कुठे? कारण ते घटनेने मंजूर केलेले आरक्षण आहे. मग भुजबळांना इतकं बोलायला कुणी लावलं?. छगन भुजबळ हे या त्रिकुट राजकारणाचे बळी पडलेत असं आज ओबीसी समाज बोलतोय. ओबीसींच्या मनात कधीही मराठ्यांबद्दल पाप नव्हते. हे पाप तुम्ही त्यांच्या मनात आणलं असा घणाघात करत जितेंद्र आव्हाड यांनी सरकारला थेट प्रश्न विचारले आहेत. 

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, महाराष्ट्रात ओबीसींच्या ३४७ जाती आहेत. त्यांना एकत्र करून तुम्ही महाराष्ट्राचं कुरुक्षेत्र करायचं ठरवलंय का? रक्ताचा सडा पाडायचा होता का? मग अचानक तुम्ही यू टर्न का घेतला?. तुम्ही कॅबिनेटमध्ये आहात. जे कॅबिनेटमध्ये बोलायचे ते तुम्ही रस्त्यावर बोलत होते. कॅबिनेट मंत्र्यांना अशी भाषा शोभत नाही. सर्व जातीधर्मांना सोबत एकत्र घेऊन चालणारा कॅबिनेट मंत्री असावा लागतो. परंतु कुणीतरी तुमच्या तोंडावाटे बोलत होते हे आता महाराष्ट्राला कळतंय. भुजबळांकडून ही अपेक्षा नव्हती. का लावायची ही भांडणे?. जानेवारी २०२४ पर्यंत आरक्षण देऊ शकत नाही हे मुख्यमंत्र्यांना माहिती नव्हते का?. मग कशाला पाया पडण्याची नाटकं करायची?. राजकारणात स्पष्टता असायलाच पाहिजे असं त्यांनी सांगितले. 

तसेच मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरावेळी सत्ता गेली तरी बेहत्तर शरद पवारांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दिले. ओबीसीला राजकीय मान्यता कुणी दिली तर शरद पवारांनी दिली. ओबीसीला महाराष्ट्रात न्याय देण्याचे काम आंबेडकरांनंतर कुणी केले असेल तर ते शरद पवारांनी केले आहे. ओबीसीला आरक्षण मिळाले पाहिजे हे आंबेडकरांनी घटनेत लिहून ठेवले. जो सर्वात मागासलेला आहे तो ओबीसी. त्यामुळे ओबीसींना आरक्षण मिळाले पाहिजे अशी स्पष्ट भूमिका आंबेडकरांनी घेतली. त्यासाठी प्रसंगी राजीनामा दिला. मंडल कमिशनला मान्यता दिली. त्यानंतर या मंडल कमिशनला मान्यता देशात सर्वात आधी महाराष्ट्राने केली. तेव्हा शरद पवार मुख्यमंत्री होते. भाजपा जातीयवादाच्या बाजूने असल्याने आरक्षण नको अशी त्यांची भूमिका आहे असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला.

दरम्यान, शिवाजी महाराजांना राज्याभिषेकापासून लांब ठेवण्याचं काम कुणी केले?, फुलेंना मारण्याचा कट कुणी केला?, फुले दाम्पत्यावर शेण, गोटे, दगडे मारण्याचे काम कुणी केले?, शाहू महाराजांची हत्या करण्याचा निर्णय कुणी घेतला? शाहू महाराजांना सर्वात जास्त त्रास कुणी दिला? आंबेडकरांना शाळेतही बसू दिले नाही हे कुणी केले? पण या सगळ्यांचा बाप असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानातून माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आपल्याला दिला. संविधान साधी गोष्ट नाही. केवळ पुस्तक म्हणून बघू नका. संविधान हे कुठल्याही धर्मग्रंथापेक्षा मोठे आहे असंही जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडMaratha Reservationमराठा आरक्षणOBCअन्य मागासवर्गीय जातीSharad Pawarशरद पवार