शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

"मराठी माणसांविरोधात दिल्लीतील अदृश्य शक्ती..."; सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2023 10:30 IST

महाराष्ट्रात जी अस्वस्थता आहे त्यामुळे राज्यातील मायबाप जनतेचे नुकसान होतंय. २०० आमदारांचे सरकार आहे पण त्यात स्थिरपणा नाही असा आरोप सुप्रिया सुळेंनी केला.

कराड - महाराष्ट्रात प्रचंड अस्वस्थता आहे.सत्तेत असणारे, २०० आमदार असणारे सरकार जे दुर्दैवाने ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्सचा गैरवापर करून सत्तेत आले आहे. ते आज महाराष्ट्र अस्वस्थ करण्याचे पाप दिल्लीतील अदृश्य शक्ती करते. जी महाराष्ट्राच्या विरोधात आहे. दुसऱ्या कुठल्या राज्यात असे होत नाही. जातीजातीत तेढ निर्माण होतंय. राज्यातले उद्योग इतर राज्यात पळवले जातायेत. ते महाराष्ट्रातच होतंय. कारण केंद्रात एक अदृश्य शक्ती आहे ज्याला महाराष्ट्राचे महत्त्व कमी करायचे आहे. हे केवळ राष्ट्रवादी, शिवसेनापुरते मर्यादित नाही तर भाजपातील मराठी नेत्यांवरही ते घात करतायेत. मराठी माणसाच्या विरोधात मोठं षडयंत्र केंद्र सरकार, अदृश्य शक्ती रचतंय असा गंभीर आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. 

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, संस्कार, मराठी संस्कृती काय असते? राजकारणात ती कशी पाळली पाहिजे? त्याच्या मर्यादा काय आहेत या सगळ्याचा आदर्श यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राला दाखवून दिलंय. त्या आदर्शाने आपण चालत राहिलो तर सध्याच्या राजकीय गोष्टी निश्चित अस्वस्थ करणाऱ्या आहेत. महाराष्ट्रात जी अस्वस्थता आहे त्यामुळे राज्यातील मायबाप जनतेचे नुकसान होतंय. २०० आमदारांचे सरकार आहे पण त्यात स्थिरपणा नाही. त्यात महाराष्ट्राच्या विकासाचे नुकसान होतंय. आम्ही दिल्लीतून जेव्हा पाहतो, तेव्हा गेल्या एक दीड वर्षात महाराष्ट्राचा विकास मंदावल्याचे चिंताजनक चित्र दिसते. हा राजकीय नाही तर सामाजिक विषय आहे असा निशाणा त्यांनी साधला. 

गृहमंत्र्यांचा दर्जा घसरलामहाराष्ट्रात प्रचंड अस्वस्थता आहे. राज्यासमोर सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे दुष्काळ, पिण्याचे पाणी...आज शहरात गेले तर पाणीटंचाई आहे. गावाकडे शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी नाही. त्यामुळे दुष्काळ आणि पाण्याचे नियोजन याचे मोठं आव्हान राज्यासमोर आहे. गृहमंत्र्यांचे अपयश आहे. अनेक वर्ष जे यशस्वी गृहमंत्री राहिले पण या टर्ममध्ये असं काय झालं ज्यामुळे त्याच गृहमंत्र्यांचे काम त्या दर्जाचे दिसत नाही याचाही विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. मराठा, लिंगायत, धनगर, मुस्लीम समाज यांना आरक्षणाचे आश्वासन देण्यात आले. जेव्हा भाजपात अटलजी, सुष्माजी, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, अरुण जेटली पक्ष बघायचे तेव्हा तो भाजपा पक्ष होता. पण आज दुर्दैवाने या सगळ्यांनी जे योगदान दिले. कार्यकर्त्यांनी भाजपाला सत्तेत आणले. त्या कष्टकरी लढणाऱ्या कार्यकर्त्यांनी जे काही केले. परंतु आज खूप मोठा बदल या पक्षात झाला आहे. ते भ्रष्ट जुमला पार्टी झाले आहेत अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली. 

आरक्षणावर विशेष अधिवेशन बोलवाआरक्षणाचा मुद्दा अतिशय संवेदनशील आहे. त्यावर जबाबदारीने बोलले पाहिजे. महाराष्ट्र सरकारने यावर विशेष अधिवेशन बोलवून चर्चा करायला हवी. मराठा, लिंगायत, धनगर, मुस्लीम समाजाच्या आरक्षणावर चर्चा झाली पाहिजे. या चर्चेला आम्ही तयार आहोत आणि पूर्ण ताकदीने आमचा पाठिंबा आहे. महागाई, बेरोजगारी आणि दुष्काळ यावर सरकार बोलत नाही. राजस्थानमध्ये निवडणूक म्हणून ४५० रुपयाला सिलेंडर आणि महाराष्ट्रात निवडणूक नाही म्हणून १२०० रुपये सिलेंडर आहे. दुष्काळाची झळ सगळ्यांना बसतेय. अनेक शहरात पाणीटंचाई आहे. ट्रिपल इंजिन सरकार राज्यात विकासासाठी सत्तेत आले म्हणतात परंतु राज्यात विकास सोडून इतर सर्वकाही सुरू आहे असा आरोपही सुळेंनी केला. 

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेBJPभाजपाMaratha Reservationमराठा आरक्षणOBC Reservationओबीसी आरक्षण