शहरं
Join us  
Trending Stories
1
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
2
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
3
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
4
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
5
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
6
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
7
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
8
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
9
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
10
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
11
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
12
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
13
आव्हाड घुसले पोलिस कारखाली, ओढून काढावे लागले बाहेर
14
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
15
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
16
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई
17
भारतीय महिला संघ लॉर्ड्स वनडे जिंकण्यास सज्ज; इंग्लंडविरुद्ध दुसरा सामना आज
18
मुंबईची सारा जामसुतकर ठरली ‘चॅम्पियन’
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

पुन्हा काँग्रेसचीच सत्ता

By admin | Updated: October 9, 2014 01:02 IST

महाराष्ट्र हा काँग्रेसचा गड राहिला आहे. महाराष्ट्रात येऊन नरेंद्र मोदी यांनी कितीही सभा घेतल्या तरी त्याचा परिणाम होणार नाही. कारण मोदी सरकारचा १०० दिवसाच्या कार्यकाळ महाराष्ट्राच्या

अशोक गहलोत यांचा दावा : बजेरियात सभानागपूर : महाराष्ट्र हा काँग्रेसचा गड राहिला आहे. महाराष्ट्रात येऊन नरेंद्र मोदी यांनी कितीही सभा घेतल्या तरी त्याचा परिणाम होणार नाही. कारण मोदी सरकारचा १०० दिवसाच्या कार्यकाळ महाराष्ट्राच्या जनतेने बघितला आहे. मोदी फक्त कामाचे मार्केटिंग करीत आहेत हे जनतेच्या लक्षात आले आहे. महाराष्ट्राच्या जनतेने नेहमीच काँग्रेसला साथ दिली आहे. यंदाही काँग्रेसलाच साथ देणार, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी केला. मध्य नागपूर मतदार संघाचे काँग्रेसचे उमेदवार अनिस अहमद यांच्या प्रचारार्थ बजेरिया येथे त्यांची सभा पार पडली. या सभेत त्यांनी मोदी सरकारचा चांगलाच समाचार घेतला तर काँग्रेसच्या ६५ वर्षाचा कामांचा आढावा जनतेपुढे मांडला. यावेळी काँग्रेस कमिटीचे सचिव बाला बच्चन, माजी खासदार विलास मुत्तेमवार, पीरिपाचे नेते जोगेंद्र कवाडे, मुन्ना ओझा, नगरसेवक दीपक पटेल, हर्षला साबळे, लक्ष्मीकांत दीक्षित, विशाल मुत्तेमवार, महासचिव अतुल कोटेचा, ताराचंद शर्मा, विश्वजित भगत उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना अनिस अहमद यांनी मध्य नागपुरात केलेल्या विकास कामांची जनतेला माहिती दिली. यावेळी आशिष दीक्षित, महेश श्रीवास, प्रज्ञा बडवाईक, डॉ. वामन कोंबाडे, दिनेश पारेक, सुनील , के. डी. गौर, संजय सागर, ममता वाजपेयी, कांता पराते, यशश्री नंदनवार, पुष्पा निमजे, जुल्फेकार भुट्टो, रितेश सोनी, गोपाल पट्टम, आतिक कुरेशी, लोकेश बडरीया अमित भय्या, सत्यपाल केवलरामानी, राजू महाजन, राजन नंदनकर, विवेक निकोसे, शांतीलाल गांधी, राजू चांदपूरकर, दिलशाद खान, इफ्तेकार अहमद आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)