शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

पुन्हा काँग्रेसचीच सत्ता

By admin | Updated: October 9, 2014 01:02 IST

महाराष्ट्र हा काँग्रेसचा गड राहिला आहे. महाराष्ट्रात येऊन नरेंद्र मोदी यांनी कितीही सभा घेतल्या तरी त्याचा परिणाम होणार नाही. कारण मोदी सरकारचा १०० दिवसाच्या कार्यकाळ महाराष्ट्राच्या

अशोक गहलोत यांचा दावा : बजेरियात सभानागपूर : महाराष्ट्र हा काँग्रेसचा गड राहिला आहे. महाराष्ट्रात येऊन नरेंद्र मोदी यांनी कितीही सभा घेतल्या तरी त्याचा परिणाम होणार नाही. कारण मोदी सरकारचा १०० दिवसाच्या कार्यकाळ महाराष्ट्राच्या जनतेने बघितला आहे. मोदी फक्त कामाचे मार्केटिंग करीत आहेत हे जनतेच्या लक्षात आले आहे. महाराष्ट्राच्या जनतेने नेहमीच काँग्रेसला साथ दिली आहे. यंदाही काँग्रेसलाच साथ देणार, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी केला. मध्य नागपूर मतदार संघाचे काँग्रेसचे उमेदवार अनिस अहमद यांच्या प्रचारार्थ बजेरिया येथे त्यांची सभा पार पडली. या सभेत त्यांनी मोदी सरकारचा चांगलाच समाचार घेतला तर काँग्रेसच्या ६५ वर्षाचा कामांचा आढावा जनतेपुढे मांडला. यावेळी काँग्रेस कमिटीचे सचिव बाला बच्चन, माजी खासदार विलास मुत्तेमवार, पीरिपाचे नेते जोगेंद्र कवाडे, मुन्ना ओझा, नगरसेवक दीपक पटेल, हर्षला साबळे, लक्ष्मीकांत दीक्षित, विशाल मुत्तेमवार, महासचिव अतुल कोटेचा, ताराचंद शर्मा, विश्वजित भगत उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना अनिस अहमद यांनी मध्य नागपुरात केलेल्या विकास कामांची जनतेला माहिती दिली. यावेळी आशिष दीक्षित, महेश श्रीवास, प्रज्ञा बडवाईक, डॉ. वामन कोंबाडे, दिनेश पारेक, सुनील , के. डी. गौर, संजय सागर, ममता वाजपेयी, कांता पराते, यशश्री नंदनवार, पुष्पा निमजे, जुल्फेकार भुट्टो, रितेश सोनी, गोपाल पट्टम, आतिक कुरेशी, लोकेश बडरीया अमित भय्या, सत्यपाल केवलरामानी, राजू महाजन, राजन नंदनकर, विवेक निकोसे, शांतीलाल गांधी, राजू चांदपूरकर, दिलशाद खान, इफ्तेकार अहमद आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)