शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

महाजनादेश विरुद्ध पोलखोल; मुख्यमंत्र्यांच्या यात्रेला काँग्रेस यात्रेतूनच देणार प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2019 14:45 IST

२० ऑगस्टपासून काँग्रेसच्या यात्रेला सुरुवात होणार

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला आता काँग्रेसकडून प्रत्युत्तर देण्यात येणार आहे. महाजनादेश यात्रेदरम्यान मुख्यमंत्री करत असलेले दावे खोडून काढण्यासाठी काँग्रेसकडून पोलखोल यात्रेला सुरुवात करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री त्यांच्या यात्रेदरम्यान अवास्तव आकडेवारीसह खोटे दावे करत असल्याचा आरोप काँग्रेस नेते नाना पटोलेंनी केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या दाव्यांना काँग्रेस २० ऑगस्टपासून पोलखोल यात्रेतून प्रत्युत्तर देईल, असं पटोले म्हणाले. १ ऑगस्टपासून मुख्यमंत्र्यांनी अमरावतीच्या मोझरीमधून महाजनादेश यात्रेला सुरुवात केली. गेल्या पाच वर्षांत झालेल्या कामांची माहिती जनतेला देण्यासाठी भाजपाकडून ही यात्रा काढण्यात आली. मात्र महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून मुख्यमंत्री करत असलेले दावे खोटे असल्याचा आरोप नाना पटोलेंनी केला. विरोधकांनी विकासकामांवरुन आपल्यासोबत उघड चर्चा करावी, असं आव्हान फडणवीसांनी दिलं. आम्ही त्यांनी वेळ आणि ठिकाण दिलं. मात्र त्यांनी प्रतिसादच दिला नाही, असा दावा पटोलेंनी केला. २० ऑगस्टला राजीव गांधींची जयंती आहे. तेव्हापासून काँग्रेसच्या पोलखोल यात्रेला सुरुवात होईल. मुख्यमंत्री फडणवीस यांची यात्रा ज्या मार्गावरुन गेली, त्याच मार्गावरुन काँग्रेसची यात्रा जाईल. फडणवीसांनी केलेल्या दाव्यांची पोलखोल यात्रेतून करण्यात येईल, अशी माहिती पटोलेंनी दिली. 'गेल्या पाच वर्षांत राज्याचा दुप्पट विकास केल्याचा फडणवीसांचा दावा आहे. तब्बल ८ लाख कोटींची परकीय गुंतवणूक आणल्याचं ते सांगतात. त्यांच्या या दाव्यांमधील फोलपणा आम्ही जनतेसमोर आणू,' असं पटोले म्हणाले.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेस