शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
4
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
5
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
6
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
7
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
8
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
9
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
10
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
11
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
12
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
13
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
14
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
15
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
16
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
17
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
18
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
19
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
20
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय

'काँग्रेसच्या लोकशाही धोरणामुळेच चहावाला पंतप्रधान'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2018 20:18 IST

७० वर्षांत काँग्रेसने काय केलं? असे मोदी विचारतात आम्ही काही केलं नसतं तर मोदी आज त्या खुर्चीवर बसले असते का?

मुंबई  - काँग्रेसने 70 वर्षात देशातील लोकशाही टिकवली म्हणूनच एक चहावाला देशाचा पंतप्रधान होऊ शकला अशी घणाघाती टीका अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी 70 वर्षात काँग्रेसने काहीच केले नाही म्हणणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे.

मल्लिकार्जुन खर्गे यांच्या महाराष्ट्र प्रभारीपदी निवड झाल्यानंतर खर्गे आज पासून दोन दिवसांच्या मुंबई दौ-यावर आले आहे. आज सकाळी टिळक भवन दादर येथे ते काँग्रेसचे प्रदेश पदाधिकरी व जिल्हाध्यक्ष यांच्या बैठकीला उपस्थित होते. त्यानंतर दुपारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला उपस्थित राहून त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या संकल्पनेतून कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणयासाठी सुरु केलेल्या प्रोजेक्ट शक्तीचा शुभारंभ केला.  देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, खा. कुमार केतकर, माजी मंत्री आ. नसीम खान, माजी मंत्री वसंत पुरके यांनीही या मेळाव्याला मार्गदर्शन केले. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी सूत्रसंचालन केले.  

शक्तीमुळे काँग्रेस कार्यकर्ते आणि नेते यांच्यात थेट संवाद सुरु होणार आहे. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांना मार्गर्शन करताना खर्गे यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, ७० वर्षांत काँग्रेसने काय केलं? असे मोदी विचारतात आम्ही काही केलं नसतं तर मोदी आज त्या खुर्चीवर बसले असते का? आम्ही लोकशाही टिकवली म्हणून एक चहावाला पंतप्रधान झाला. मोदी फक्त मोठ्या मोठ्या घोषणा करतात पण प्रत्यक्ष अंमलबजावणी मात्र दिसत नाही.  रोज एक ब्रिज कोसळतोय आधी ते थांबवा, रेल्वे ट्रॅक सुधारा. मग बुलेट ट्रेनच्या गप्पा मारा. देशात गोरक्षणाच्या नावाखाली लोक मारले जात आहेत.

दलित, अल्पसंख्यांक, आदिवासींवर अत्याचार वाढले आहेत. देशात भीतीचे वातावरण आहे. संविधान टिकले तर हा देश टिकेल.  राजकारणात सत्ता येते जाते पण विचारधारा टिकली पाहिजे. देशाचे संविधान टिकवण्यासाठी मतभेद विसरून एकत्र या आणि काँग्रेसची सत्ता आणा असे आवाहन त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केले.

भाजप विरोधात एकजुटीने लढू आणि जिंकू - अशोक चव्हाण

या मेळाव्याला मार्गदर्शन करताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंन्द फडणवीस यांचा जोरदार समाचार घेतला ते म्हणाले की, आणीबाणी नंतरही काँग्रेसचं सरकार देशात होतं. पण भाजप आणि मोदींकडून इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांची बदनामी करण्याचे काम जाणिवपूर्क सुरु आहे. मोदी ४३ वर्षापूर्वीच्या आणीबाणीबद्दल बोलतात मात्र देशात गेल्या चार वर्षापासून अघोषीत आणीबाणी आहे. देशात तणाव निर्माण करुन मतं कशी वाढतील यासाठी भाजप प्रयत्न करत आहे. देशात फक्त मी आणि मी पणा सुरु आहे. केंद्रीय मंत्रीमंडळातील मंत्र्यांना अधिकार नाहीत. राज्यातले सरकार बोलण्यात ऑनलाईन कामात ऑफलाईन आहे. कर्जमाफीची  घोषणा फसवी आहे.  

टॅग्स :congressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी