शहरं
Join us  
Trending Stories
1
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
2
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
3
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
4
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
5
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
6
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
7
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
8
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
9
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
10
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
11
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
12
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
13
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
14
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
15
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
16
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
17
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
18
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
19
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
20
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?

"सांगलीतील १० टक्के ग्रामपंचायतही ठाकरेंकडे नाही; टोकाची भूमिका घ्यावी लागली तर.."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2024 14:23 IST

कार्यकर्त्यांची भावना जोपासण्याकरिता सांगलीची जागा काँग्रेसकडे राहील ही वरिष्ठांनीही मान्य केले असं विश्वजित कदम यांनी सांगितले. 

मुंबई -  Vishwajeet Kadam on Sangali ( Marathi Newsसांगली जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. त्यासाठी ठाकरेंनी हट्ट करू नये. सांगलीत आज ६०० गावे आहेत. शिवसेनेच्या नेतृत्वानं सांगावे, यातील १० टक्के ग्रामपंचायती तरी त्यांच्याकडे आहेत का?. कुठल्याही परिस्थितीत आम्ही सांगली मतदारसंघ सोडणार नाही.  टोकाची भूमिका घ्यायला लागली तरी घेऊ परंतु ही जागा काँग्रेसकडे राहिली पाहिजे हे आमचे ठाम मत आहेत असं विधान काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी केले आहे. 

विश्वजित कदम यांच्यासह सांगलीच्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांनीही आज बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. या भेटीनंतर विश्वजित कदम म्हणाले की, कुठल्या जागेबदली कोणती जागा द्यावी हा निर्णय महाविकास आघाडीच्या नेत्यांचा प्रश्न आहे. परंतु सांगलीची जागा आम्ही सोडणार नाही. चंद्रहार पाटील डबल महाराष्ट्र केसरी, पैलवान म्हणून प्रसिद्ध आहेत. परंतु राजकारण, समाजकारण करताना विचारधारेचे पाठबळ लागते आणि सातत्याने लोकांमध्ये जनसंपर्क ठेवून लोकांचे प्रश्न सोडवावे लागतात. सांगली जिल्ह्यातील अनेक प्रश्न आहेत. चंद्रहार पाटील यांनी ६-७ दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. ठाकरे गटाची मागणी चुकीची आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच देशाच्या स्वातंत्र्यापासून सांगली जिल्हा आणि लोकसभा मतदारसंघ  काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. सांगलीच्या भूमीने काँग्रेस पक्षाच्या विचाराचे नेते देशाला दिले. काँग्रेस पक्षाकडेच सांगली राहिली पाहिजे ही लोकांची आणि पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे. महाविकास आघाडी एकत्रित आली त्याचा आनंद आहे. परंतु सांगलीच्या जागेवर कुठल्याही घटकपक्षाने दावा करण्याचा अधिकार नाहीत. आम्ही एकदिलाने, एक विचाराने काँग्रेस पक्षाकडे सांगलीची जागा राहावी यासाठी ठाम आहोत. काँग्रेसचे आज जिल्हा परिषद, पंचायत समिती अनेक स्तरावर कार्यकर्ते आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ काँग्रेसकडेच राहायला पाहिजे ही आमची भूमिका आहे असं विश्वजित कदम यांनी म्हटलं. 

दरम्यान, संजय राऊत हे शिवसेनेचे नेते आहेत. महाविकास आघाडीबाबत ते व्यक्तिगत भूमिका सांगू शकत नाही. महाविकास आघाडीत शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यात अधिकृतपणे भाष्य झाले पाहिजे. सांगलीची जागा काँग्रेसकडे राहिली पाहिजे. ही जागा लढण्यास आणि जिंकण्यात काँग्रेस सक्षम आहे. सांगली मतदारसंघ काँग्रेसकडेच राहावा, ठाकरे गटाला तो सोडू नये यासाठी स्थानिक आमदारांसह पदाधिकारी आग्रही आहे. त्यासाठी माझ्यासह विशाल पाटील आणि इतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. आम्ही काँग्रेसच्या वरिष्ठांकडे मागणी केलेली आहे. कार्यकर्त्यांची भावना जोपासण्याकरिता सांगलीची जागा काँग्रेसकडे राहील ही वरिष्ठांनीही मान्य केले असं विश्वजित कदम यांनी सांगितले. 

टॅग्स :Vishwajeet Kadamविश्वजीत कदमcongressकाँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरेsangli-pcसांगली