शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
2
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
3
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
4
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
5
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
6
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
7
...ती पैशानंही 'गब्बर' झाली होती; टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचे शेवटचे ३ कॉल
8
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशकवाद्यांना कंठस्नान 
9
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
10
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
11
टॅक्स भरण्यासाठी आता सीएकडे जाण्याची गरज नाही; सरकारच्या ई-पे टॅक्स पोर्टलवरुन होईल काम
12
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
13
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
14
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."
15
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
16
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
17
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
18
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते
19
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
20
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका

"सांगलीतील १० टक्के ग्रामपंचायतही ठाकरेंकडे नाही; टोकाची भूमिका घ्यावी लागली तर.."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2024 14:23 IST

कार्यकर्त्यांची भावना जोपासण्याकरिता सांगलीची जागा काँग्रेसकडे राहील ही वरिष्ठांनीही मान्य केले असं विश्वजित कदम यांनी सांगितले. 

मुंबई -  Vishwajeet Kadam on Sangali ( Marathi Newsसांगली जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. त्यासाठी ठाकरेंनी हट्ट करू नये. सांगलीत आज ६०० गावे आहेत. शिवसेनेच्या नेतृत्वानं सांगावे, यातील १० टक्के ग्रामपंचायती तरी त्यांच्याकडे आहेत का?. कुठल्याही परिस्थितीत आम्ही सांगली मतदारसंघ सोडणार नाही.  टोकाची भूमिका घ्यायला लागली तरी घेऊ परंतु ही जागा काँग्रेसकडे राहिली पाहिजे हे आमचे ठाम मत आहेत असं विधान काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी केले आहे. 

विश्वजित कदम यांच्यासह सांगलीच्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांनीही आज बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. या भेटीनंतर विश्वजित कदम म्हणाले की, कुठल्या जागेबदली कोणती जागा द्यावी हा निर्णय महाविकास आघाडीच्या नेत्यांचा प्रश्न आहे. परंतु सांगलीची जागा आम्ही सोडणार नाही. चंद्रहार पाटील डबल महाराष्ट्र केसरी, पैलवान म्हणून प्रसिद्ध आहेत. परंतु राजकारण, समाजकारण करताना विचारधारेचे पाठबळ लागते आणि सातत्याने लोकांमध्ये जनसंपर्क ठेवून लोकांचे प्रश्न सोडवावे लागतात. सांगली जिल्ह्यातील अनेक प्रश्न आहेत. चंद्रहार पाटील यांनी ६-७ दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. ठाकरे गटाची मागणी चुकीची आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच देशाच्या स्वातंत्र्यापासून सांगली जिल्हा आणि लोकसभा मतदारसंघ  काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. सांगलीच्या भूमीने काँग्रेस पक्षाच्या विचाराचे नेते देशाला दिले. काँग्रेस पक्षाकडेच सांगली राहिली पाहिजे ही लोकांची आणि पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे. महाविकास आघाडी एकत्रित आली त्याचा आनंद आहे. परंतु सांगलीच्या जागेवर कुठल्याही घटकपक्षाने दावा करण्याचा अधिकार नाहीत. आम्ही एकदिलाने, एक विचाराने काँग्रेस पक्षाकडे सांगलीची जागा राहावी यासाठी ठाम आहोत. काँग्रेसचे आज जिल्हा परिषद, पंचायत समिती अनेक स्तरावर कार्यकर्ते आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ काँग्रेसकडेच राहायला पाहिजे ही आमची भूमिका आहे असं विश्वजित कदम यांनी म्हटलं. 

दरम्यान, संजय राऊत हे शिवसेनेचे नेते आहेत. महाविकास आघाडीबाबत ते व्यक्तिगत भूमिका सांगू शकत नाही. महाविकास आघाडीत शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यात अधिकृतपणे भाष्य झाले पाहिजे. सांगलीची जागा काँग्रेसकडे राहिली पाहिजे. ही जागा लढण्यास आणि जिंकण्यात काँग्रेस सक्षम आहे. सांगली मतदारसंघ काँग्रेसकडेच राहावा, ठाकरे गटाला तो सोडू नये यासाठी स्थानिक आमदारांसह पदाधिकारी आग्रही आहे. त्यासाठी माझ्यासह विशाल पाटील आणि इतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. आम्ही काँग्रेसच्या वरिष्ठांकडे मागणी केलेली आहे. कार्यकर्त्यांची भावना जोपासण्याकरिता सांगलीची जागा काँग्रेसकडे राहील ही वरिष्ठांनीही मान्य केले असं विश्वजित कदम यांनी सांगितले. 

टॅग्स :Vishwajeet Kadamविश्वजीत कदमcongressकाँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरेsangli-pcसांगली