शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
5
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
6
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
7
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
8
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
9
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
10
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
11
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
12
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
13
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
14
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
15
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
16
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
17
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
18
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
19
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
20
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...

"सांगलीतील १० टक्के ग्रामपंचायतही ठाकरेंकडे नाही; टोकाची भूमिका घ्यावी लागली तर.."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2024 14:23 IST

कार्यकर्त्यांची भावना जोपासण्याकरिता सांगलीची जागा काँग्रेसकडे राहील ही वरिष्ठांनीही मान्य केले असं विश्वजित कदम यांनी सांगितले. 

मुंबई -  Vishwajeet Kadam on Sangali ( Marathi Newsसांगली जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. त्यासाठी ठाकरेंनी हट्ट करू नये. सांगलीत आज ६०० गावे आहेत. शिवसेनेच्या नेतृत्वानं सांगावे, यातील १० टक्के ग्रामपंचायती तरी त्यांच्याकडे आहेत का?. कुठल्याही परिस्थितीत आम्ही सांगली मतदारसंघ सोडणार नाही.  टोकाची भूमिका घ्यायला लागली तरी घेऊ परंतु ही जागा काँग्रेसकडे राहिली पाहिजे हे आमचे ठाम मत आहेत असं विधान काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी केले आहे. 

विश्वजित कदम यांच्यासह सांगलीच्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांनीही आज बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. या भेटीनंतर विश्वजित कदम म्हणाले की, कुठल्या जागेबदली कोणती जागा द्यावी हा निर्णय महाविकास आघाडीच्या नेत्यांचा प्रश्न आहे. परंतु सांगलीची जागा आम्ही सोडणार नाही. चंद्रहार पाटील डबल महाराष्ट्र केसरी, पैलवान म्हणून प्रसिद्ध आहेत. परंतु राजकारण, समाजकारण करताना विचारधारेचे पाठबळ लागते आणि सातत्याने लोकांमध्ये जनसंपर्क ठेवून लोकांचे प्रश्न सोडवावे लागतात. सांगली जिल्ह्यातील अनेक प्रश्न आहेत. चंद्रहार पाटील यांनी ६-७ दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. ठाकरे गटाची मागणी चुकीची आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच देशाच्या स्वातंत्र्यापासून सांगली जिल्हा आणि लोकसभा मतदारसंघ  काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. सांगलीच्या भूमीने काँग्रेस पक्षाच्या विचाराचे नेते देशाला दिले. काँग्रेस पक्षाकडेच सांगली राहिली पाहिजे ही लोकांची आणि पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे. महाविकास आघाडी एकत्रित आली त्याचा आनंद आहे. परंतु सांगलीच्या जागेवर कुठल्याही घटकपक्षाने दावा करण्याचा अधिकार नाहीत. आम्ही एकदिलाने, एक विचाराने काँग्रेस पक्षाकडे सांगलीची जागा राहावी यासाठी ठाम आहोत. काँग्रेसचे आज जिल्हा परिषद, पंचायत समिती अनेक स्तरावर कार्यकर्ते आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ काँग्रेसकडेच राहायला पाहिजे ही आमची भूमिका आहे असं विश्वजित कदम यांनी म्हटलं. 

दरम्यान, संजय राऊत हे शिवसेनेचे नेते आहेत. महाविकास आघाडीबाबत ते व्यक्तिगत भूमिका सांगू शकत नाही. महाविकास आघाडीत शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यात अधिकृतपणे भाष्य झाले पाहिजे. सांगलीची जागा काँग्रेसकडे राहिली पाहिजे. ही जागा लढण्यास आणि जिंकण्यात काँग्रेस सक्षम आहे. सांगली मतदारसंघ काँग्रेसकडेच राहावा, ठाकरे गटाला तो सोडू नये यासाठी स्थानिक आमदारांसह पदाधिकारी आग्रही आहे. त्यासाठी माझ्यासह विशाल पाटील आणि इतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. आम्ही काँग्रेसच्या वरिष्ठांकडे मागणी केलेली आहे. कार्यकर्त्यांची भावना जोपासण्याकरिता सांगलीची जागा काँग्रेसकडे राहील ही वरिष्ठांनीही मान्य केले असं विश्वजित कदम यांनी सांगितले. 

टॅग्स :Vishwajeet Kadamविश्वजीत कदमcongressकाँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरेsangli-pcसांगली