शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

खदखद पदावर बसून नव्हे तर...; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी अजित पवारांना सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2023 16:33 IST

राजकारणातील कोणीही मुख्यमंत्री व्हायची इच्छा बाळगली तर त्यात वावगे काहीच नाही असंही नाना पटोलेंनी सांगितले.

मुंबई - राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना नाईलाजाने काम करावं लागले असं विधान एका मुलाखतीत केले. त्यावर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या विधानाचा समाचार घेतला आहे. नाईलाज हा शब्द वापरण्यापेक्षा तुम्ही शपथच घ्यायला नको होती. पदावर बसून खदखद व्यक्त करण्यापेक्षा पदाच्या बाहेर राहून खदखद व्यक्त करायला हवी होती असं नाना पटोलेंनीअजित पवारांना सुनावले आहे. 

नाना पटोले म्हणाले की, २००४ साली काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये अजित पवार होते. त्यांचा नाईलाज होता तर त्यांनी मंत्रीपदाची शपथ कशासाठी घेतली? मंत्रीपदाची शपथ घ्यायला नको होती. पृथ्वीराज चव्हाण आमचे नेते आहेत, त्यांच्याबद्दल अजित पवारांनी असे बोलावं ही अपेक्षा नाही. खदखद वाटत होती तर त्यावेळीच सोडून जायला हवे होते असं त्यांनी अजित पवारांना सुनावले.  

तसेच राजकारणातील कोणीही मुख्यमंत्री व्हायची इच्छा बाळगली तर त्यात वावगे काहीच नाही, अजित पवार यांच्याकडे १४५ चा बहुमताचा आकडा असेल तर त्यांनी जरूर मुख्यमंत्री व्हावे. मी बनतो असं म्हणण्याचं कारण नाही. अजित पवारांचे व्यक्तिगत काय असेल त्यावर काही बोलणार नाही. राज्यात आज अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. खारघर दुर्घटनेमुळे राज्याला काळिमा लागला आहे. बेरोजगारांचे प्रश्न आहेत. महागाई वाढली आहे या मुद्द्यांवर चर्चा होणे गरजेचे आहे. परंतु राजकीय चर्चा, स्फोट होणार वैगेरे बोलले जाते. मग लोकशाहीचा स्फोट झाला तर कोण वाचवणार आहे? या प्रश्नांकडे लक्ष द्यायला हवं असंही नाना पटोले म्हणाले. 

दरम्यान, २ दिवसांपूर्वी मी राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे अजित पवार म्हणाले. तिसऱ्यादिवशी पुन्हा ते पक्ष सोडणार अशी चर्चा झाली. माध्यमांना काय माहिती, किती माहिती, काय सांगावे हा माध्यमांचा अधिकार आहे. सध्या कोण कोणाला भेटते, व्यक्तिगत भेटते या सर्व बाबींकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत असा सूचक इशाराही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला. 

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेAjit Pawarअजित पवारPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाण