शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Politics: “विजयासाठी काँग्रेसचे संघटन मजबूत हवे; यात्रा काढून निवडणुकीत यश मिळेल का, याविषयी शंका”

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2023 10:54 IST

Maharashtra News: भारत जोडो यात्रा काढून काँग्रेसला निवडणुकीत यश मिळेल का, याबाबत शंका असल्याचे सांगत पृथ्वीराज चव्हाण यांनी पक्षाला घरचा आहेर दिला.

Maharashtra Politics: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भारत यात्रा एक एक राज्य ओलांडत आता पंजाबात पोहोचली आहे. दक्षिण भारतातून सुरू झालेली ही यात्रा आता हजारो किलोमीटरचा प्रवास करत पंजाबमध्ये दाखल झाली आहे. ज्या ज्या ठिकाणी ही यात्रा गेली होती, त्या त्या ठिकाणी प्रचंड मोठा प्रतिसाद या यात्रेला मिळाल्याचे सांगितले जात आहे. भारत जोडो यात्रेविषयी राजकीय वर्तुळात अनेकविध चर्चा होत असल्याचे दिसत आहे. यातच आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पक्षाला घरचा आहेर देत, यात्रा काढून निवडणुकीत यश मिळेल का, याविषयी शंका आहे, असे परखड मत व्यक्त केले आहे. 

केवळ यात्रा काढून निवडणुकीत यश मिळेल का, याविषयी मला शंका आहे. विजयासाठी काँग्रेसचे संघटन मजबूत झाले पाहिजे. आणि हे करण्यासाठी पक्षांतर्गत निवडणुका झाल्या पाहिजेत, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टपणे सांगितले. तसेच नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजित तांबे यांनी पक्ष निर्णयाच्या विरोधात जात अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. सत्यजित तांबे यांचे वडील सुधीर तांबे यांची या जागेसाठी उमेदवारी जाहीर झाली होती. मात्र, ऐनवेळी वडिलांनी माघार घेत मुलाला अर्ज करण्याची संधी दिली. यावर पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली. 

सर्व माहिती घेतल्याशिवाय त्यावर भाष्य करणार नाही

सत्यजित तांबे यांच्यावर काँग्रेस पक्ष कारवाई करणार का, यावर बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, घडले ते चुकीचे झालेले आहे. सर्व माहिती घेतल्याशिवाय त्यावर भाष्य करणार नाही. अधिकृत अथवा पक्षाध्यक्षांच्या पातळीवर काय घडलेय, याची माहिती नाही. मात्र, या घडामोडीत नाशिकला काँग्रेसला उमेदवारच नसेल, ही गंभीर बाब आहे. सत्यजित तांबे यांच्यावर कारवाई करायची की नाही, हा पक्षश्रेष्ठींचा निर्णय आहे. काय घडलेय, काय अहवाल जाईल, याची माहिती देण्यात येईल, असे चव्हाण म्हणाले. 

दरम्यान, मोदी सरकारच्या ८ वर्षांच्या कार्यकाळात पेट्रोल, डिझेलवर २८ लाख कोटी रुपये कर रुपाने गोळा करण्यात आले. याशिवाय सरकारी, निमसरकारी व सार्वजनिक उपक्रमांची विक्री केली गेली. खासगीकरणाच्या माध्यमातून ठराविक उद्योगपतींना ते विकण्यात आले. नुसते रस्ते, दळणवळणाची इतर साधने उपलब्ध करून देताना उच्च शिक्षण, आरोग्य यासह इतर मुलभुत सुविधांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस