शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

"राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी महाराष्ट्रातील महिला अत्याचारही बोलावं"; काँग्रेसने सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 19:01 IST

कोलकाता प्रकरणावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलेल्या विधानावरुन महाराष्ट्र काँग्रेसने त्यांच्यावर टीका केली आहे.

Congress On President Droupadi Murmu : कोलकाता येथील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणावररुन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बुधवारी संताप व्यक्त केला. या घटनेनंतर पश्चिम बंगालमध्ये सुरु असलेल्या गोंधळावरूनही राष्ट्रपती मुर्मू यांनी भाष्य केलं होतं. समाजाला प्रामाणिकपणे आत्मपरिक्षण करण्याची गरज असल्याचे राष्ट्रपती मुर्मू यांनी म्हटलं होतं. राष्ट्रपती मुर्मू यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यानंतर आता महाराष्ट्र काँग्रेसने पलवटवार केला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी महाराष्ट्रातील महिला अत्याचारही बोलायलं हवं असं परखड मत काँग्रेसने मांडलं आहे.

कोलकाता येथील आरजी कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. देशभरात या घटनेच्या निषेधार्थ डॉक्टर संघटना आणि नागरिकांकडून रोष व्यक्त करण्यात येत आहे. दुसरीकडे, देशाच्या राष्ट्रपती द्रौपद्री मूर्मू यांनी याप्रकरणी तीव्र शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. राष्ट्रपती मुर्मूंनी दिलेल्या निवेदनावरुन  काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी भाष्य केलं आहे. ते नागपुरात बोलत होते.

"केवळ कोलकाता नाही, तर राष्ट्रपतींनीही महाराष्ट्रातील परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली पाहिजे. बदलापूर येथे जे घडले त्यामुळे महाराष्ट्रातील जनता व्यथित झाली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्रातील महिलांवरील अत्याचाराचीही दखल घ्यायला हवी. त्या संपूर्ण राष्ट्राच्या राष्ट्रपती आहेत," असं रमेश चेन्नीथला यांनी म्हटलं आहे. 

काय म्हणाल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू?

"कोलकाता येथील घटना वेदनादायक आणि भयावह आहे. बस आता खूप झालं. ज्यावेळी कोलकाता येथे विद्यार्थी, डॉक्टर आणि नागरिक आंदोलन करत होते, तेव्हा या प्रकरणातील आरोपी खुलेआम फिरत होते. कोणताही सुसंस्कृत समाज मुलींवर अशाप्रकारे अत्याचार होऊ देऊ शकत नाही. समाजाला आता प्रामाणिकपणे आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. नागरिकांनी स्वत:ला कठीण प्रश्न विचारण्याची आवश्यकता आहे. समाजाची दयनीय मानसिकता महिलांना कमी लेखते. १२ वर्षांपूर्वी झालेल्या निर्भया प्रकरणानंतर अशा बऱ्याच घटना घडल्या आहेत. मात्र, समाजाने याकडे दुर्लक्ष केलं. आपल्या समाजाला सामूहिक स्मृतिभ्रंशाचा त्रास झाल्याचे दिसून येते, या संकटाचा आपण सर्वांनी मिळून सामना केला पाहिजे," असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या.

टॅग्स :Draupadi Murmuद्रौपदी मुर्मूcongressकाँग्रेसbadlapurबदलापूर