शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
2
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
3
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
4
जीएसटीच्या पहिल्याच दिवशी मारुतीने २५,००० गाड्या विकल्या; ८० हजार लोकांची इन्क्वायरी...
5
Muhurat Trading 2025 Date and Time: वेळ लिहून ठेवा! या मुहूर्तावर शेअर बाजारात होणार धनवर्षा; १ तासासाठी उघडणार मार्केट
6
मुसळधार पावसाने कोलकात्याला झोडपले, अनेक भागात पाणी साचले, मेट्रो विस्कळीत, ५ जणांचा मृत्यू
7
निमिषा प्रियासारखंच प्रकरण; १९ वर्षांपासून सौदी अरेबियाच्या तुरुंगात असलेला अब्दुल रहीम सुटणार!
8
फक्त किराणाच नाही तर मॉलमध्ये शॉपिंगपासून ते सिनेमापर्यंत या गोष्टींवर भरघोस बचत; पाहा यादी
9
Video: "मी तुमचा मोठा चाहता...", रितेश देशमुखने प्रसाद ओकचं केलं कौतुक; गंमतीत म्हणाला...
10
"बिग बॉसचं मला काही विचारू नका", भाऊ अमालबद्दल विचारताच अरमान मलिक भडकला, व्हिडीओ व्हायरल
11
महिला पोलीस अधिकाऱ्याने वर्दीवरील बॅज फेकून मारला; Video व्हायरल, घटनेची दुसरी बाजू आली समोर
12
काय आहे विमानाच्या टायरजवळची 'ती' जीवघेणी जागाा, जिथे बसून १३ वर्षांचा मुलगा अफगाणिस्तानातून भारतात आला
13
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
14
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
15
GST कमी झाला आणि AC-TV च्या विक्रीत झाली जोरदार वाढ, किराणा दुकानदारांनाही 'अच्छे दिन'
16
Kuttu Atta: नवरात्री उपवासाचं कुट्टूचं पीठ ठरलं विषारी; १५० हून अधिक लोक आजारी, रुग्णालयाबाहेर रांगा!
17
Navratri 2025: नवरात्रीत मंगळवारी किंवा शुक्रवारी देवीला पारिजाताची फुलं वाहिल्याने होणारे लाभ 
18
ट्रम्प यांना आणखी एक धक्का! फ्रान्स पॅलेस्टिनी राष्ट्राला मान्यता देणार, मॅक्रॉन यांची मोठी घोषणा
19
₹५००० च्या SIP नं कसा बनेल ₹५ कोटींचा फंड? कमालीची आहे पद्धत, एकदा समजलात तर पैशांचं टेन्शन होईल दूर
20
१२८ किलोची वजनदार पत्नी अंगावर पडून पतीचा मृत्यू; सोशल मीडियावर पुन्हा घटना व्हायरल 

महाराष्ट्र निवडणुकीवर काँग्रेसने प्रश्नचिन्ह उपस्थित केले, निवडणूक आयोगाने ६६ पानांचे दिले उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 16:36 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील निकालावरुन काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार दिली होती. यावर आता निवडणूक आयोगाने प्रत्युत्तर दिले आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांनी निवडणुकीवर शंका व्यक्त केली होती. काँग्रेसने निवडणूक आयोगाला पत्र लिहून ५० जागांबाबत प्रश्न उपस्थित केले होते. या ठिकाणी जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत ५० हजार मतदार जोडल्याचा दावा त्यांनी केला होता. मात्र आता निवडणूक आयोगाने प्रत्येक जागेची चौकशी करून काँग्रेसला ६६ पानांचे सविस्तर उत्तर पाठवले असून सर्व दावे खोटे असल्याचे म्हटले आहे.

निवडणूक आयोगाने सांगितले की, ५० विधानसभेच्या जागांवर जुलै ते नोव्हेंबर ५० हजार मतदार जोडण्याचा काँग्रेसचा आरोप तथ्यात्मक स्वरुपात चुकीचा आहे. असं काहीही झालेले नाही. आम्ही प्रत्येक सीटचे तपशील तपासले आहेत. जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत ५० हजार मतदारांची भर पडली, मात्र ती केवळ ६ विधानसभा जागांवर जोडली गेली.

"एकतर आंबेडकर फेल झाले अथवा आंबेडकरवादी"; शंकराचार्यांनी आरक्षणावर उपस्थित केला सवाल!

मतदान कमी असूनही जास्त दाखवले जात असल्याचा दावा काँग्रेसने केला होता. मतदारांच्या संख्येत बदल होत आहेत, अचानक जास्त मतदान होताना दिसत आहे. याचा पुरावा देताना काँग्रेसने म्हटले होते की, संध्याकाळी ६ वाजता मतदान झाल्यानंतर मतदानाचे प्रमाण काही वेगळे असल्याचे सांगितले जाते आणि नंतर मतदान ४ ते ५ टक्क्यांनी वाढल्याचे दाखवले जाते. यावर निवडणूक आयोगानेही उत्तर दिले आहे. आयोगाने म्हटले की, मतदारांच्या संख्येत बदल होणे अशक्य आहे. कारण मतदानाच्या समाप्तीच्या वेळी मतदानाच्या टक्केवारीचा डेटा उमेदवाराच्या एजंटकडे फॉर्म 17C मध्ये नोंदवलेला असतो. काँग्रेसला हवे असल्यास ते पाहू शकते.

काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले

काँग्रेसने जुलै ते नोव्हेंबर दरम्यान ५० मतदारसंघात ५० हजार मतदार जोडले होते असा दावा केला होता.  त्यांचे म्हणणे असे होते की, या ५० जागांपैकी भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीने ४७ जागांवर निवडणूक जिंकली कारण मतदानाचा खेळ खेळला. मात्र आता निवडणूक आयोगाने प्रत्येक दाव्याला उत्तर दिले आहे.

यापूर्वी काँग्रेसनेही ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केले होते, या प्रश्वनांना निवडणूक आयोगाने उत्तर दिले होते. महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले होते की, राज्यातील सर्व २८८ विधानसभा जागांवर १४४० VVPAT स्लिपची मोजणी करण्यात आली आहे. ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी स्लिपच्या मोजणीत कोणतीही अनियमितता आढळली नाही. म्हणजे सर्व ईव्हीएम बरोबर होत्या.

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगElectionनिवडणूक 2024congressकाँग्रेस