शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिगोची कार्यसंस्कृती अशी आहे...? माजी कर्मचाऱ्याचे ओपन लेटर व्हायरल; '₹18,000 पगारात 3 लोकांचे काम'
2
विरोधी पक्षनेतेपदावरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप; अधिवेशन काळात रिक्त राहणार पद?
3
२४ रुपयांच्या वांग्यांच्या नादात लागला ₹८७,००० चा चुना, एका चुकीच्या कॉलनं 'गेम'च झाला
4
Russia Ukraine War: 52 लाखांच्या मोहात फसला, रशियात गेलेला हरयाणाचा २१ वर्षीय अनुज थेट युद्धभूमीवर अडकला
5
पोलीस निरीक्षकाचा संशयास्पद मृत्यू; खोलीतून किंचाळत बाहेर पडलेल्या महिला कॉन्स्टेबलला अटक
6
मुलींना येतात 'दाढी-मिशा'; फक्त हार्मोन्समुळे नाही तर 'ही' आहेत कारण, WHO चे डॉक्टर म्हणतात...
7
'या' स्टार क्रिकेटपटूचा टेस्ट आणि टी-२० मधून निवृत्ती मागे घेण्याचा निर्णय, चाहते झाले खूश!
8
आयएसआय आणि 'तामिळनाडू'चा उल्लेख! बिहारच्या राजगीर आयुध कारखान्याला बॉम्बने उडवण्याची धमकी
9
पाकिस्तानच्या तुरुंगातील महिलेवर फिदा झाला अन् थेट सीमा पार करायला निघाला भारताचा बीटेक ग्रॅजुएट!
10
Aadhaar News: आधार फोटोकॉपीवर बंदी... लवकरच येणार कडक नियम, नक्की काय आहे सरकारचा प्लॅन?
11
धर्मेंद्र यांच्या निधनानंतर सनी देओलची पहिली पोस्ट, शेअर केला 'तो' व्हिडीओ म्हणाला- "माझ्या वडिलांचा..."
12
मूल होऊ न देण्याच्या निर्णयावर आजही ठाम, गीतांजली कुलकर्णींनी सांगितलं कारण; तर पर्ण म्हणाली...
13
Vastu Shastra: 'या' सात वस्तू प्रत्येक श्रीमंत घरात हमखास सापडणारच; तुम्हीही घरी आणा!
14
Psycho Killer Poonam : "माझ्या मुलीसारखं पूनमलाही तडफडून-तडफडून मारा"; जियाच्या आईचा सायको किलरबद्दल मोठा खुलासा
15
महिलेबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट लिहिणे हा विनयभंगाचा गुन्हा : उच्च न्यायालय
16
इलेक्ट्रिक फटाक्यांनी लावली नाईट क्लबला आग; मालकांसह ४ कर्मचाऱ्यांवर अटकेची तलवार, गोवा पोलीस दिल्लीत दाखल!
17
इंडिगोचे विमान संकट! दिल्ली, बेंगळुरू, चेन्नईत शेकडो फ्लाईट्स रद्द; वाचा, प्रवाशांना कधी मिळणार दिलासा?
18
घर घेताना 'हा' खर्च कायम विसरून जातात लोक; नंतर होते मोठी डोकेदुखी, जाणून घ्या महत्त्वाची माहिती
19
ईव्हीएमच्या स्ट्राँगरूमवर कार्यकर्त्यांचाही वॉच; राष्ट्रवादी काँग्रेसने बसवले जिंतूरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे
20
मोदी अन् नितीश सरकारमधील मंत्री पगारासोबत पेन्शनही घेतात; RTI मधून खुलासा, ८ जणांची डबल कमाई
Daily Top 2Weekly Top 5

“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 20:24 IST

Shaktipeeth Mahamarg: RSS आणि भाजपाचे एकच लक्ष आहे. एक भाषा, एक निवडणूक, एक देश, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

Shaktipeeth Mahamarg: नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी ९२ गावांची संयुक्त मोजणी पूर्ण झाली आहे. येत्या दीड ते दोन महिन्यांत उर्वरित गावांची मोजणी करून भूसंपादनाचे काम सुरू केले जाणार आहे. त्यादृष्टीने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. यातच आता कोल्हापूरसह अनेक ठिकाणी या शक्तिपीठ महामार्गाला विरोध केला जात आहे. शेतकरी आक्रमक झाले आहेत. विरोधी पक्षातील नेतेही याला तीव्रपणे विरोध दर्शवत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी शक्तिपीठ महामार्गांत मोठा भ्रष्टाचार असल्याचा दावा केला आहे. 

पत्रकारांशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, शक्तिपीठ साठी २० लाख कोटींचा कर्ज डोक्यावर घेत आहेत, हे कशासाठी? तर कमिशन काढण्यासाठी. वित्त विभाग असेल किंवा वित्तमंत्री काही असेल, तरी हा प्रोजेक्ट रेटून केला जाईल. समृद्धी महामार्गाचे झाले, तेच इथे करायचे आहे. हा सर्व विषय कमिशनखोरी साठी आहे, समृद्धी महामार्ग होत असताना देखील झाला. यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे, आता तसाच भ्रष्टाचार शक्तिपीठ महामार्गावरून करायचा आहे, असा मोठा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

मोर्चात सहभागी व्हायचे का नाही हे आमचे प्रदेशाध्यक्ष ठरवतील

हिंदी भाषेच्या मोर्चात सहभागी व्हायचे का नाही, हे आमचे प्रदेशाध्यक्ष ठरवतील. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने शैक्षणिक धोरणावर निधी कमी केला असल्याने शिकवायला साधनसामग्री नाही. शिक्षकही नाहीत. इतके दुर्दशा झालेली असताना आपण भाषा वाढवत आहोत. या निरर्थकवादापेक्षा मूलभूत शैक्षणिक गरजेवर खर्च व्हायला हवा. मराठी ही मातृभाषा आहे, तर हिंदी राज्यभाषा आहे, आणि इंग्रजी ज्ञान भाषा आहे. एक राष्ट्र, एक भाषा करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारचा आहे. त्यामुळे हा गोंधळ सुरू आहे. काही काळानंतर हिंदी ही एकच भाषा देशात ठेवण्याचा घाट केंद्र सरकारचा आहे. भारत संशोधनामध्ये मागे पडलेला आहे, हे दिसत आहे. जर संशोधन आणि शिक्षणावर पैसे खर्च नाही केले तर, एक महाशक्ती होण्याचे जे आपले स्वप्न आहे, ते केवळ एक स्वप्न राहील. RSS आणि भाजपाचे एकच लक्ष आहे, एक भाषा, एक निवडणूक, एक देश, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

दरम्यान, आपल्या देशात विविधता आहे, आणि ती जपायला हवी. ठाकरे बंधू मोर्चामुळे एकत्र येत आहेत, असे नाही, गेल्या अनेक दिवसांपासून या चर्चा सुरू आहे. घरातला वाद आहे, ते एकत्र आले तर चांगलीच गोष्ट आहे. महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे हे घटक आहेत, कोणाबरोबर युती करायची त्यांचा प्रश्न आहे, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. 

 

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणShaktipeeth Mahamargशक्तिपीठ महामार्गhindiहिंदीmarathiमराठीcongressकाँग्रेस