शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

“पहिल्या टप्प्यातील मतदानावरुन भाजपाचे धाबे दणाणले, अघोषित आणीबाणी”: पृथ्वीराज चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2024 17:04 IST

Congress Prithviraj Chavan: भाजप सरकार बहुमताच्या आधारावर मुंबई प्रदेशाला केंद्रशासित प्रदेश करतील, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

Congress Prithviraj Chavan: ही लढाई देशात मोदींचे सरकार आणायचे की नाही, देशाच्या लोकशाहीला , संविधानाला काय धोका आहे. अशा स्वरूपाची लढाई झाली आहे. अघोषित आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. मोदींच्या कालखंडामध्ये देशाची अवस्था मंदावलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हट्टामुळे नोटबंदी आणली आणि त्याचे परिणाम लघु उद्योगावर झाले. देशाची अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे. देश चालवायला पैसे नाहीत, कर्ज काढूनही भागत नाही, असे आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

पत्रकार परिषदेत बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपा आणि केंद्रातील मोदी सरकावर तीव्र शब्दांत टीका केली. तसेच प्रणिती शिंदे यांनी प्रचारामध्ये मोठी आघाडी घेतलेली आहे. सोलापुरात विकास काम केलेली आहेत, असे नमूद केले. वंचितमुळे गेल्यावेळेस सोलापूरची जागा गेली. वंचितमुळे भाजप आणि मोदींना फायदा होत आहे. भाजप सरकार बहुमताच्या आधारावर मुंबई प्रदेशाला केंद्रशासित प्रदेश करतील, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. 

अनेक समस्यांसाठी या निवडणुकीत भाजप सरकारचा पराभव करा हे सांगतो

अनेक समस्यांसाठी या निवडणुकीत भाजप सरकारचा पराभव करा हे सांगतो. मोदींनी आणि कंपन्या विकण्याचा घाट घातला आहे. मोदी जाणूनबुजून शेतकऱ्यांच्या मालाच्या किमती पाडत आहेत. देशाच्या लोकशाहीला आणि संविधनाला धोका आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या टक्केवारीवरून भाजपाचे धाबे दणाणले आहे. काँग्रेसवर बोलताना मोदींची जीभ घसरत आहे वाटेल ते आरोप करत आहेत. त्यांच्याकडे विकासाचे मुद्दे नसल्यामुळे जुनी प्रकरणे उकरून काढत आहेत, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. 

दरम्यान, मोदींनी अनेक आश्वासन दिली. दोन कोटी पेक्षा २० कोटी लोकांना रोजगार दिला असता तर बेरोजगारी कमी झाली असती. पंधरा लाखाचे आम्ही काय गंभीर घेतले नाही मात्र लोकांनी गंभीर घेतले आणि त्यांना निवडून दिले. मनमोहन सिंग यांच्याबाबत जे वक्तव्य करतात ते मोदींना शोभत नाही. मोदी सांगतात पाचवी अर्थव्यवस्था ती अर्थव्यवस्था वंचितांनी गरिबांनी एकत्र येऊन तयार केली आहे. आपला देश मोठा झाला आहे. पण नागरिक श्रीमंत झालेला नाही. तुम्हाला जर समृद्ध राष्ट्र व्हायचे असेल तर साडेतेरा लाख दरडोई उत्पन्न झाले पाहिजे, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. 

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणcongressकाँग्रेसmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४