शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

“पहिल्या टप्प्यातील मतदानावरुन भाजपाचे धाबे दणाणले, अघोषित आणीबाणी”: पृथ्वीराज चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2024 17:04 IST

Congress Prithviraj Chavan: भाजप सरकार बहुमताच्या आधारावर मुंबई प्रदेशाला केंद्रशासित प्रदेश करतील, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

Congress Prithviraj Chavan: ही लढाई देशात मोदींचे सरकार आणायचे की नाही, देशाच्या लोकशाहीला , संविधानाला काय धोका आहे. अशा स्वरूपाची लढाई झाली आहे. अघोषित आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. मोदींच्या कालखंडामध्ये देशाची अवस्था मंदावलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हट्टामुळे नोटबंदी आणली आणि त्याचे परिणाम लघु उद्योगावर झाले. देशाची अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे. देश चालवायला पैसे नाहीत, कर्ज काढूनही भागत नाही, असे आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

पत्रकार परिषदेत बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपा आणि केंद्रातील मोदी सरकावर तीव्र शब्दांत टीका केली. तसेच प्रणिती शिंदे यांनी प्रचारामध्ये मोठी आघाडी घेतलेली आहे. सोलापुरात विकास काम केलेली आहेत, असे नमूद केले. वंचितमुळे गेल्यावेळेस सोलापूरची जागा गेली. वंचितमुळे भाजप आणि मोदींना फायदा होत आहे. भाजप सरकार बहुमताच्या आधारावर मुंबई प्रदेशाला केंद्रशासित प्रदेश करतील, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. 

अनेक समस्यांसाठी या निवडणुकीत भाजप सरकारचा पराभव करा हे सांगतो

अनेक समस्यांसाठी या निवडणुकीत भाजप सरकारचा पराभव करा हे सांगतो. मोदींनी आणि कंपन्या विकण्याचा घाट घातला आहे. मोदी जाणूनबुजून शेतकऱ्यांच्या मालाच्या किमती पाडत आहेत. देशाच्या लोकशाहीला आणि संविधनाला धोका आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या टक्केवारीवरून भाजपाचे धाबे दणाणले आहे. काँग्रेसवर बोलताना मोदींची जीभ घसरत आहे वाटेल ते आरोप करत आहेत. त्यांच्याकडे विकासाचे मुद्दे नसल्यामुळे जुनी प्रकरणे उकरून काढत आहेत, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. 

दरम्यान, मोदींनी अनेक आश्वासन दिली. दोन कोटी पेक्षा २० कोटी लोकांना रोजगार दिला असता तर बेरोजगारी कमी झाली असती. पंधरा लाखाचे आम्ही काय गंभीर घेतले नाही मात्र लोकांनी गंभीर घेतले आणि त्यांना निवडून दिले. मनमोहन सिंग यांच्याबाबत जे वक्तव्य करतात ते मोदींना शोभत नाही. मोदी सांगतात पाचवी अर्थव्यवस्था ती अर्थव्यवस्था वंचितांनी गरिबांनी एकत्र येऊन तयार केली आहे. आपला देश मोठा झाला आहे. पण नागरिक श्रीमंत झालेला नाही. तुम्हाला जर समृद्ध राष्ट्र व्हायचे असेल तर साडेतेरा लाख दरडोई उत्पन्न झाले पाहिजे, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. 

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणcongressकाँग्रेसmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४