शहरं
Join us  
Trending Stories
1
National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना मोठा दिलासा
2
भविष्यवाणी खरी ठरणार? जगन्नाथ मंदिराच्या कळसावर पक्ष्यांचे थवे, 'भविष्य मालिका' ग्रंथात उल्लेख...
3
भल्या भल्यांना नाही जमले ते आज एलन मस्कनी करून दाखविले; ६०० अब्ज डॉलर संपत्ती असलेले जगातील पहिले व्यक्ती बनले
4
"१०० वेळा विचार करेल, आत्मा थरथरेल..."; पहलगाम हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची मागणी
5
व्होडाफोनने सर्वांवर कडी केली! फोन हरवला, चोरी झाला... रिचार्जसोबतच २५००० चा विमा, ते ही ६१ रुपयांत...
6
ट्रम्प टॅरिफची हवा निघाली, भारताकडून अमेरिकेची जोरदार खरेदी; चीनही टॉप ३ मध्ये, पाहा अधिक माहिती
7
२०२६ मध्ये भारतीय बाजारात 'धमाका' करण्याच्या तयारीत किआ! घेऊन येतेय ३ ढासू मॉडेल, EV चाही समावेश
8
'धुरंधर'मधला 'तो' सीन अन् सौम्या टंडनने अक्षय खन्नाच्या तब्बल ७ वेळा कानाखाली मारली, म्हणाली- "खूप वाईट..."
9
२५ जणांच्या राखरांगोळीस जबाबदार असणारे लुथरा बंधू भारताच्या ताब्यात; थायलंडहून आज दुपारी आणले जाणार
10
१० वर्षांची प्रतीक्षा संपली, नेपाळला जाणाऱ्यांसाठी खूशखबर; आता बिनधास्त घेऊन जा २००, ५०० ची नोट
11
“पृथ्वीराज चव्हाण हे जगातील सर्वांत मोठे भविष्यवेत्ते आहेत”; भाजपा नेत्यांचा पलटवार
12
शेअर बाजारात कंपनी आधीच बॅन, आता चर्चेतील 'या' फिनफ्ल्युएन्सरवर SEBI ची मोठी कारवाई; प्रकरण काय?
13
Leopard Pune: 'बिबट्या दिसला तर पळू नका', पुण्यातील आयटी पार्कही दहशतीत! cognizant कंपनीने कर्मचाऱ्यांना काय सांगितलं?
14
"मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई, मुंबई वाचवायला..."; संजय राऊतांचा भाजपा-शिंदेसेनेवर निशाणा
15
भाजपासोबत युती तुटताच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग; बैठका सुरू
16
Latur Crime: लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं कारमध्ये बसवलं, दारू पाजली, निर्जनस्थळी नेऊन जिवंत जाळलं! 
17
"मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या...", BMC ची निवडणूक जाहीर होताच ठाकरे बंधुविरोधात झळकले बॅनर्स
18
विश्वचषक विजेत्या श्रीलंकन कर्णधाराला अटक होणार; अर्जुन रणतुंगा पेट्रोलियम घोटाळ्याप्रकरणी अडचणीत
19
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८३,६५२ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
20
Yamuna Expressway Accident: ७ बस, ३ कारचा थरकाप उडवणारा अपघात! चार प्रवाशांचा जळून मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

“तीन पक्षाची आघाडी करावी लागली, सांगलीचा तिढा सुटला नाही”; पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2024 18:22 IST

Congress Prithviraj Chavan News: मोदींचा पराभव करून राज्यात मविआ व दिल्लीत इंडिया आघाडीचे सरकार येईल, असा विश्वास पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.

Congress Prithviraj Chavan News: २०१९ मध्ये निकाल वेगळा लागला असता, तर आघाडी करायची वेळ आली नसती. भाजपाला पुन्हा पाच वर्षे सत्तेत येऊ द्यायचे नाही, या विचारानेच आघाडीत सहभागी व्हावे लागले. आधी केवळ राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची आघाडी होती. मात्र, २०१९ रोजी परिस्थिती अशी आली की, आघाडी करावी लागली. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांचे आमदार जास्त होते. आपण तिसऱ्या क्रमांकावर होतो. मनावर दगड ठेवून निर्णय घ्यावा लागला, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

सांगलीत काँग्रेसचा मेळावा घेण्यात आला. यावेळी बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगलीच्या जागेच्या वादावरही स्पष्ट शब्दांत भाष्य केले. सांगलीतून लोकसभा उमेदवारीसाठी एकच नाव समोर आले होते. अगदी मुंबईपासून दिल्लीपर्यंत या नावाबाबत कोणाचेही दुमत नव्हते. काँग्रेसच्या केंद्रीय निवड समितीचेही नव्हते. महाविकास आघाडीत चर्चा करण्यासाठी नेमलेल्या काँग्रेस समितीचेही नव्हते. पण, नंतर बरेच राजकारण झाले. यात आपण जाणार नाही. सांगलीची जागा परंपरागत आहे. काही अपवाद झाले. मागच्या वेळी असेच राजकारण झाले. उमेदवारी मिळाली पण चिन्ह मिळाले नाही. सांगलीबाबत काँग्रेस पक्षात कोणाचा वाद नव्हता, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले.

राजकारण खूप मोठे आहे, हळूहळू ते पुढे येईल

सांगलीचा तिढा सुटला नाही. याचे राजकारण खूप मोठे आहे. हळूहळू ते पुढे येईल. जो वाटा दोन पक्षाच्या आघाडीत मिळणार होता. तो तीन पक्षात मिळणार नव्हता. ज्या जागा निवडून येतील अशा जागा घ्या, असे यावर आम्ही ठाम होतो. त्यात एक नंबर सांगलीची जागा होती, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. सांगलीबाबतचा निर्णय सूर्यप्रकाशा इतका स्वच्छ होता. पण निर्णय सर्वोच्च पातळीवर घडला आहे, असे चव्हाण यांनी सांगितले.

काहीही झाले तरी राज्यात मविआ व देशात इंडिया आघाडीचा विजय झालाच पाहिजे

भाजपाच्या हाती सत्ता जाऊ नये म्हणून २०१९ साली तीन पक्षांचे आघाडी सरकार स्थापन करण्यात आले. सरकार चांगेल काम करत होते नंतर शिवसेना पक्ष फोडला, आमदार खरेदी केले, पदांचे आमिष दाखवले, साम, दाम, दंड, भेद नितीचा वापर सर्वोच्च पातळीवरून झाला. महाराष्ट्रातील या तोडफोडीला नरेंद्र मोदी यांचा राजश्रय होता, त्यांच्या संमतीनुसार हे घडले, हा सर्वात मोठा राजकीय भ्रष्टाचार आहे. निवडणुकीत विरोधकांची फाटाफूट झाली की भाजपाचे फावते म्हणून विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. काहीही झाले तरी राज्यात मविआ व देशात इंडिया आघाडीचा विजय झालाच पाहिजे, नाहीतर पुढच्या पिढीचा शाप लागेल. राज्यात मविआ व दिल्लीत मोदींचा पराभव करुन इंडिया आघाडीचे सरकार येईल. सांगली जिल्ह्यातील काँग्रेस एकसंध व ताकदवर राहिली पाहिजे व मोदींचा पराभव झाला पाहिजे हे दुहेरी आव्हान पेलावे लागणार आहे व आपण हे इंद्रधनुष्य पेलाल असा विश्वास पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला. 

दरम्यान, मविआ म्हणून तीन पक्षाची आघाडी करावी लागली आणि त्याची चूक सांगलीच्या जागेबाबत भोगावी लागते. मित्र पक्ष शिवसेनेने सांगलीबाबत हट्ट सोडला नाही. शेवटच्या क्षणापर्यंत सांगलीचा प्रश्न सुटला नाही. पर्याय दिला गेला, तोही पर्याय मान्य झाला नाही. शेवटी शेवटी काही तरी चुकले आहे हे मित्र पक्षाला समजले आणि मग एक एक विधानपरिषद घ्या, आमच्या कोट्यातील घ्या अशा ऑफर येऊ लागल्या, असा मोठा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

 

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणsangli-pcसांगलीcongressकाँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडीmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४