शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
2
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
3
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
4
₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
5
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
6
Budh Gochar 2025: वक्री गेलेला बुध मार्गी लागला; पुढील दोन वर्षात कोणकोणते लाभ देणार? वाचा!
7
"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजन सिंगचा संताप
8
कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, रद्द केला जामीन, कारण काय?
9
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
10
इतका कसला राग? सासूला मारलं अन् १९ तुकडे १९ ठिकाणी फेकले; जावई इतका निर्दयी का झाला?
11
मतचोरीविरोधात वाराणसीत अजब आंदोलन; पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या नावाने जल्लोष
12
पाकविरुद्ध १२ वर्षांपूर्वी धडाडली होती स्टेन'गन'! Jayden Seales नं वनडेतील तो वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
13
"बँकर नाही, तुम्ही DJ बना," गोल्डमॅन सॅक्सच्या सीईओंवर डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप; म्हणाले, "तुमचे अंदाज..."
14
Lunchbox Recipe: ढोबळी मिरचीची 'अशी' करा पीठ पेरून भाजी; कोरडी नाही लागणार, डब्यातही नेता येणार 
15
म्युच्युअल फंड-स्टॉक नाही! 'या' ठिकाणी पैसे गुंतवण्यासाठी लोकांचा कल वाढला, पाहा तुमच्याकडे संधी आहे का?
16
६ शिफ्टमध्ये २८ मंत्र्यांची ड्युटी...यूपी विधानसभेत २४ तासांचं ऐतिहासिक कामकाज, कारण काय?
17
Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’ योजनेकडे महिलांची पाठ? ५ महिन्यांत एकही नवा अर्ज नाही! क्रेझ ओसरल्याची चर्चा
18
ट्रम्पमुळे ज्यांचे रक्त खवळतेय त्या सामान्यांना काहीच नाही; तेल कंपन्यांना २५ टक्के नफा, सरकार घेतेय ४५ टक्के टॅक्स...
19
जगाच्या नकाशावरचा 'हा' देश बनलाय भूकंपाचं केंद्र; दर तासाला जाणवतात १८ भूकंपाचे झटके!
20
३ वर्षांपूर्वी बिझनेसला सुरुवात! आता थेट गुगलला क्रोम ब्राउझर खरेदी करण्याची ऑफर; कोण आहे अरविंद श्रीनिवास?

Praniti Shinde On BJP: “योगी, महाराजांची जागा मठात, राजकारणात आले की देशाचं वाटोळं होतं”: प्रणिती शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 09:59 IST

Praniti Shinde On BJP: एक दोन पराभव झाले म्हणून काय झाले, हा ईव्हीएम घोटाळा असल्याचा दावा प्रणिती शिंदे यांनी केला.

सोलापूर: देशातील पाच राज्यांमध्ये झालेल्या निवडणूक निकालात काँग्रेसचा दारुण पराभव झाल्याचे पाहायला मिळाले. यानंतर भाजप नेत्यांनी काँग्रेसवर टीका केली. राज्यातील भाजप नेत्यांनीही महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधल्याचे पाहायला मिळाले. एकूण राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. योगी, महाराज यांची जागा मठात आहे. ते राजकारणात आले की, देशाचे वाटोळे होते, अशी टीका प्रणिती शिंदे यांनी केली आहे. 

सोलापूर येथील एका सभेत बोलताना प्रणिती शिंदे यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि भाजप सरकारचा समाचार घेत कृषी कायद्यासह अन्य मुद्द्यांवरून टीकास्त्र सोडले. उत्तर प्रदेशची निवडणूक आल्यामुळेच तीन काळे कृषी कायदे रद्द करण्यात आले, याचा पुनरुच्चार करत, वर्षभर शेतकऱ्यांनी लढा दिला, ७०० शेतकऱ्यांचा बळी तुम्ही घेतला आणि मग कायदे रद्द केले, याबद्दल लाज वाटायला हवी, अशी टीका प्रणिती शिंदे यांनी केली. 

योगी, महाराजांची जागा मठात, राजकारणात आले की देशाचे वाटोळे होते

योगी आणि महाराजांबद्दल आम्हाला मान आहे. परंतु, त्यांचे स्थान मंदिर आणि मठात आहे, राजकारणात नाही. ज्या ज्या वेळेस योगी आणि महाराज राजकारणात आले, तेव्हा देशाचे वाटोळे सुरू होते, असा घणाघात प्रणिती शिंदे यांनी केला. जे काम करतात, त्यांच्या पाठिशी उभे राहण्याचे महत्त्वाचे आहे. लोकशाही जिवंत ठेवायची असेल, तर कामाला महत्त्व द्या. संविधान जिवंत ठेवायचे असेल, तर कामाला महत्त्व दिले पाहिजे, असे सांगत काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी कधीही जात-पात केली नाही. तुम्ही त्यांना निवडून दिले. कारण ते कामाला प्राधान्य द्यायचे, असे प्रणिती शिंदे यांनी म्हटले आहे. 

काम केलीयत, आपण का घाबरतो

आपण अजिबात घाबरता कामा नये, आपण कामे केली आहेत. या देशाला बलिदान कुणी दिले असेल तर ते काँग्रेसने दिले आहे. देशात कसोटीच्या पातळीवर उतरुन काँग्रेसनी कामे केली आहेत, तरीही काँग्रेसचा कार्यकर्ता धडाडीने लढताना दिसत नाही, त्यामुळे इथून पुढे आपण कामाच्या पातळीवर राजकीय लढा द्यायचा आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी खचून न जाता कोणत्याही निवडणुकीत पूर्ण ताकदीने लढण्याची गरज असल्याचे प्रणिती शिंदे यांनी सांगितले. एक दोन पराभव झाले म्हणून काय झाले, यामध्ये ईव्हीएम घोटाळा असू शकतो. मात्र, एक गठ्ठा मतदान केले, तर ईव्हीएम खराब होत नाही, हे मला महिती आहे, असा दावा प्रणिती शिंदे यांनी केला.  

टॅग्स :Praniti Shindeप्रणिती शिंदेcongressकाँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारण