शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

'यामुळे' सातारा लोकसभा लढविण्यास पृथ्वीराज चव्हाणांना हायकमांडचे आदेश ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2019 13:05 IST

पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छूक नसल्याचे सांगितले आहे. परंतु, काँग्रेस हायकमांडकडून त्यांना सातारा लोकसभा निवडणूक लढविण्याचे आदेश मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे साताऱ्यात राजे आणि चव्हाण यांच्यात लढत रंगण्याची शक्यता आहे.

- रवींद्र देशमुख

मुंबई - लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाने साडेतीनशे हून अधिक जागा जिंकल्या. सलग दुसऱ्यांदा आलेल्या मोदी लोटेत काँग्रेसला पुन्हा एकदा विरोधीपक्ष नेतेपदही मिळवता आलेले नाही. काँग्रेसला केवळ 52 जागांवर विजय मिळवता आला. तर विरोधीपक्षनेते पदासाठी 55 जागांवर विजय मिळविणे आवश्यक आहे. आता काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपद मिळविण्यासाठी मास्ट्रर प्लॅन केल्याची शक्यता आहे.   

सातारा मतदारसंघाचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे या मतदार संघात पोट निवडणूक होणार आहे. साताऱ्याची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसकडे होती. त्यामुळे या जागेवर पुन्हा राष्ट्रवादीकडूनच कोणीतरी राहिल, अशी शक्यता होती. तसेच साताऱ्यातून शरद पवार यांचे मित्र श्रीनिवास पाटील यांची चर्चा जोरात सुरू होती. पण ऐनवेळी आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव समोर येत आहे.

दुसरीकडे पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छूक नसल्याचे सांगितले आहे. परंतु, काँग्रेस हायकमांडकडून त्यांना सातारा लोकसभा निवडणूक लढविण्याचे आदेश मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे साताऱ्यात राजे आणि चव्हाण यांच्यात लढत रंगण्याची शक्यता आहे.

काँग्रेसला लोकसभेत विरोधीपक्षनेता पद मिळविण्यासाठी 55 चा आकडा गाठणे आवश्यक आहे. त्यामुळे देशात जिथे-जिथे पोट निवडणूक होईल, त्या जागा जिंकण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट आहे. सातारा जिंकल्यास, काँग्रेसचे लोकसभेतील संख्याबळ 53 होणार असून आणखी दोन जागा जिंकल्यास, काँग्रेसला विरोधीपक्ष नेतेपद मिळू शकते. याआधी विरोधीपक्षनेते पदासाठी राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्यात येणार असल्याचे वृत्त माध्यमांमध्ये आले होत्या. मात्र त्यात तथ्य निघाले नाही. परंतु, आता राष्ट्रवादी साताऱ्याची जागा काँग्रेसला देऊन विरोधीपक्ष नेतेपदासाठी काँग्रेसला हातभार लावू शकते.