शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

"काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी आपल्या आमदारांना समज द्यावी"; आदित्य ठाकरे संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 14:33 IST

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादावरून काँग्रेसच्या आमदाराने मांडलेल्या भूमिकेवर शिवसेनेचे (युबीटी) आमदार आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. काँग्रेसने आमदारांना समज द्यावी, असे ठाकरे म्हणाले.

Maharashtra Latest News: महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील बेळगावसह इतर मराठी भाग केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी महाराष्ट्रातून करण्यात आल्यानंतर काँग्रेसच्या आमदाराने थेट मुंबईलाही केंद्रशासित प्रदेश जाहीर करावे, अशी विधान केले. कर्नाटक विधानसभेत केलेल्या विधानाचे महाराष्ट्रात पडसाद उमटले असून, शिवसेनेचे (युबीटी) आमदार आदित्य ठाकरे यांनी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठीलाच सुनावले आहे. 

काँग्रेसचे कर्नाटकातील अथनी विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण सवदी यांनी केलेल्या विधानाबद्दल आदित्य ठाकरेंनी संताप व्यक्त केला. 

आदित्य ठाकरे काँग्रेसच्या नेत्यांना काय म्हणाले?

आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत काँग्रेसने आमदारांना समज द्यावी, अशी मागणी केली आहे. 

आदित्य ठाकरे म्हणाले, "मुंबई केंद्रशसित करण्याची मागणी निषेधार्ह आहे. काँग्रेस असो वा भाजप... कोणताही पक्ष असो... मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची भाषा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अजिबात खपवून घेणार नाही."

"मुंबई ही आमची मायभूमी आहे. इथला प्रत्येक कण मराठी माणसानं आपलं रक्त सांडून मिळवला आहे. मुंबई आम्हाला कोणी आंदण दिलेली नाही. काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी आपल्या आमदारांना समज द्यावी", अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी काँग्रेस आमदारांच्या विधानावर म्हटले आहे. 

आमदार लक्ष्मण सवदींचे विधान काय?

कर्नाटक विधानसभेत बोलताना सवदी म्हणालेले की, "महाराष्ट्रातील एका नेत्याने बेळगावसह सीमाभाग केंद्रशासित करावा असे विधान केले. जर कर्नाटकचा अविभाज्य अंग असलेल्या बेळगाव सीमाभाग केंद्रशासित करायचा असेल, तर मुंबई देखील केंद्रशासित करा."

"आमचे पूर्वज देखील मुंबईमध्ये वास्तव्याला होते. त्यामुळे आमचा मुंबईवर अधिकार आहे. पूर्वी बेळगावसह अन्य सहा जिल्हे मुंबई प्रांताचा भाग असताना आमचे कर्नाटकातील लोक मुंबईला जात होते. आधी मुंबई केंद्रशासित केली जावी आणि तसा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवावा. महाराष्ट्राला बेळगाव हवे असेल, तर त्या बदल्यात आमच्या पूर्वजांनी राज्य केलेली मुंबई कर्नाटकला द्यावी. त्यामुळे मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवावा", असे विधान आमदार सवदी यांनी केले होते. 

टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेMahavikas Aghadiमहाविकास आघाडीShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस