शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

"काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी आपल्या आमदारांना समज द्यावी"; आदित्य ठाकरे संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 14:33 IST

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादावरून काँग्रेसच्या आमदाराने मांडलेल्या भूमिकेवर शिवसेनेचे (युबीटी) आमदार आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. काँग्रेसने आमदारांना समज द्यावी, असे ठाकरे म्हणाले.

Maharashtra Latest News: महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील बेळगावसह इतर मराठी भाग केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी महाराष्ट्रातून करण्यात आल्यानंतर काँग्रेसच्या आमदाराने थेट मुंबईलाही केंद्रशासित प्रदेश जाहीर करावे, अशी विधान केले. कर्नाटक विधानसभेत केलेल्या विधानाचे महाराष्ट्रात पडसाद उमटले असून, शिवसेनेचे (युबीटी) आमदार आदित्य ठाकरे यांनी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठीलाच सुनावले आहे. 

काँग्रेसचे कर्नाटकातील अथनी विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण सवदी यांनी केलेल्या विधानाबद्दल आदित्य ठाकरेंनी संताप व्यक्त केला. 

आदित्य ठाकरे काँग्रेसच्या नेत्यांना काय म्हणाले?

आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत काँग्रेसने आमदारांना समज द्यावी, अशी मागणी केली आहे. 

आदित्य ठाकरे म्हणाले, "मुंबई केंद्रशसित करण्याची मागणी निषेधार्ह आहे. काँग्रेस असो वा भाजप... कोणताही पक्ष असो... मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची भाषा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अजिबात खपवून घेणार नाही."

"मुंबई ही आमची मायभूमी आहे. इथला प्रत्येक कण मराठी माणसानं आपलं रक्त सांडून मिळवला आहे. मुंबई आम्हाला कोणी आंदण दिलेली नाही. काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी आपल्या आमदारांना समज द्यावी", अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी काँग्रेस आमदारांच्या विधानावर म्हटले आहे. 

आमदार लक्ष्मण सवदींचे विधान काय?

कर्नाटक विधानसभेत बोलताना सवदी म्हणालेले की, "महाराष्ट्रातील एका नेत्याने बेळगावसह सीमाभाग केंद्रशासित करावा असे विधान केले. जर कर्नाटकचा अविभाज्य अंग असलेल्या बेळगाव सीमाभाग केंद्रशासित करायचा असेल, तर मुंबई देखील केंद्रशासित करा."

"आमचे पूर्वज देखील मुंबईमध्ये वास्तव्याला होते. त्यामुळे आमचा मुंबईवर अधिकार आहे. पूर्वी बेळगावसह अन्य सहा जिल्हे मुंबई प्रांताचा भाग असताना आमचे कर्नाटकातील लोक मुंबईला जात होते. आधी मुंबई केंद्रशासित केली जावी आणि तसा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवावा. महाराष्ट्राला बेळगाव हवे असेल, तर त्या बदल्यात आमच्या पूर्वजांनी राज्य केलेली मुंबई कर्नाटकला द्यावी. त्यामुळे मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवावा", असे विधान आमदार सवदी यांनी केले होते. 

टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेMahavikas Aghadiमहाविकास आघाडीShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस