शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

काँग्रेस-राष्ट्रवादीचे ४० जागांवर एकमत, प्रफुल्ल पटेल यांची माहिती

By अतुल कुलकर्णी | Updated: January 5, 2019 01:42 IST

पुणे व रत्नागिरी-सिंधुदुर्ग या जागांबाबत अद्याप निर्णय झालेला नसून राष्टÑवादीकडून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये लोकसभेच्या जागावाटपाची चर्चा अनुकूल असून ज्या ४० जागांविषयी वाद नाही, त्या प्रत्येकी २० जागा असे वाटप झाले आहे. उर्वरित ८ जागांबाबत चर्चा सुरू असून त्यापैकी काही जागा मित्र पक्षांसाठी सोडायच्या आहेत, अशी माहिती राष्टÑवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खा. प्रफुल्ल पटेल यांनी दिली. पुणे व रत्नागिरी-सिंधुदुर्ग या जागांबाबत अद्याप निर्णय झालेला नसून राष्टÑवादीकडून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.लोकसभेचे जागावाटप आणि विधानसभेबाबत चाचपणीसाठी मुंबईत राष्टÑवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. पत्रकारांशी बोलताना खा. पटेल म्हणाले, येत्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि मित्र पक्षांच्या आघाडीला चांगले यश मिळेल. आज राफेलच्या मुद्द्यावर सरकार अडचणीत आले आहे. देशभर शेतकरी नाराज आहेत. प्रत्येक राज्यात वेगवेगळी परिस्थिती आहे, त्यानुसार स्थानिक आघाड्या होतील, असेही तेम्हणाले.महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दोन्ही काँग्रेसने वेगवेगळे लढायला हवे, असे वक्तव्य केले आहे. त्यावर, आम्हाला सल्ला देण्याऐवजी आधी तुमच्या मित्रपक्षाला नीट सांभाळा. शिवसेना तुम्हाला झिडकारत आहे आणि तुमचे नेते युतीसाठी सेनेच्या मागे धावत आहेत, असा टोलाही पटेल यांनीलगावला.नगरमध्ये जे घडले त्याबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट आहे. आमच्या १८ नगरसेवकांनी भाजपाला मदत केली म्हणून त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्या नगरसेवकांवर हकालपट्टीची कारवाई होऊ शकते, पण त्यासाठी पक्षाच्या घटनेनुसार प्रक्रिया पूर्ण व्हायला हवी, असेही त्यांनी या वेळी सांगितले.महाडिक-मुश्रीफ यांच्यातील वाद मिटलासूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धनंजय महाडिक यांना कोल्हापुरातून तर सुनील तटकरे यांना रायगडमधून उमेदवारी देण्याचे पक्षाने निश्चित केले आहे. महाडिक व हसन मुश्रीफ यांच्यातील वाद स्वत: शरद पवार यांनी बैठक घेऊन सोडवला आहे. रायगडमधून माजी मंत्री भास्कर जाधव इच्छुक होते; पण त्यांचे मन वळवण्यात आले असून तेथून तटकरे यांना उभे करण्याचे निश्चित झाले आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस