शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

काँग्रेस-राष्ट्रवादी ही दिवाळखोरीत निघालेली बँक - मुख्यमंत्री

By admin | Updated: February 17, 2017 16:21 IST

आयुष्यभर जमा केलेली पुंजी सुरक्षीत ठेवण्यासाठी आपण चांगली बँक निवडतो. चांगला परतावा देणारी, सुरक्षीत बँक आपल्याला हवी असते. असाच प्रकार हा मतदानाचा आहे.

ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 17 -  आयुष्यभर जमा केलेली पुंजी सुरक्षीत ठेवण्यासाठी आपण चांगली बँक निवडतो. चांगला परतावा देणारी, सुरक्षीत बँक आपल्याला हवी असते. असाच प्रकार हा मतदानाचा आहे. ज्या मतामुळे तुमच्या शहराचा विकास होईल, तुम्ही व्यक्त केलेल्या अपेक्षांची पुर्ती होईल, अशाच बँकेत आपल्या मतांचे ‘डिपॉझिट’ आपण केले पाहिजे. सध्याच्या निवडणुकीत मतांचे ‘डिपॉझिट’ मागण्यासाठी आलेल्या पक्षांमध्ये शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस तर राहुल गांधी यांचा काँग्रेस या दोन्ही बँका कितीही चकचकीत दिसत असल्या तरी त्या दिवाळखोरीत निघालेल्या आहेत, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे केली.
अकोला क्रिकेट क्लबच्या मैदानावर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी मंचावर कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर, अकोल्याचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील, खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, आमदार हरिष पिंपळे, आमदार प्रकाश भारसाकळे, महापौर उज्ज्वला देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. 
मुख्यमंत्र्यांनी शरद पवार, अजित पवार व राहुल गांधी यांचे पक्ष दिवाळखोरीत निघाल्याचे सांगतानाच भाजपा हा एक सक्षम पर्याय असल्याचे स्पष्ट केले. या बँका परतावा तर देत नाहीच; मात्र मुद्दलही फस्त करतात, असा टोलाही त्यांनी लगावला. मतदान रुपी डिपॉझिट भाजपला दिले तर पाच वर्षांत पाच पट विकासाचे व्याज देऊन मुद्दलही परत करण्याची हमी मुख्यमंत्र्यांनी दिली. भाजपा सरकारने दमदार कामगिरी करीत शहराच्या विकासाचा आलेख उंचावला असल्याचे ते म्हणाले.
 
आता पाय मोकळा करून घेतला...
शिवसेनेसोबत युती तुटल्याचा संदर्भ देत मुख्यमंत्र्यांनी सूचक भाष्य केले. शिवसेनेचा उल्लेख टाळत मुख्यमंत्री म्हणाले, की भाजपा स्वतंत्रपणे निवडणुक रिंगणात आहे. विकासाचा मुद्दा घेऊन आपण लोकांमध्ये जात आहोत. त्यामुळे या निवडणुकी स्वबळावर सत्ता मिळेल यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे. आता पाय मोकळा करून घेतला आहे. तो पुन्हा अडकविण्याची वेळ येणार नाही याची काळजी घ्या. तुम्ही मला मनपा द्या, मी तुम्हाला विकास, परिवर्तनाचा शब्द देतो, असे आवाहन त्यांनी केले.
 
विदर्भातील मनपांना जादा निधी...
विदर्भातील महापालिकांपैकी नागपूरमध्ये विकासाची घोडदौड सुरु आहे. परंतु, अकोला, अमरावती व चंद्रपूर या महापालिकांना अजुनही विकासाची आस आहे. या विदर्भाचा भूमीपूत्र आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे. आतापर्यंत राज्याच्या एकाच भागाला निधी जात होता. आता तो अन्याय दूर करीत आहोत. राज्याच्या सर्वच भागांचा विकास झाला पाहिजे, यासाठी आपण कटीबद्ध आहोतच; परंतु आतापर्यंत ज्या भागाला विकास निधी देताना हात आखडता घेतल्या गेला, तेथे विकासाचा अधिक निधी जात असेल, तर कोणाच्या पोटात दुखता कामा नये, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला.