शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

नाराजी नाट्याला तिलांजली; कॉंग्रेसच्या नवसंकल्प शिबिराचा श्रीगणेशा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2022 14:05 IST

शिर्डी जवळील साईपालखी निवारा येथील शिबीरस्थळी महात्मा गांधीच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून प्रदेश कॉंग्रेसच्या नवसंकल्प शिबिराला सुरुवात करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्क

शिर्डी :शिर्डी जवळील साईपालखी निवारा येथील शिबीरस्थळी महात्मा गांधीच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून प्रदेश कॉंग्रेसच्या नवसंकल्प शिबिराला सुरुवात करण्यात आली.   यावेळी पादेशाध्यक्ष नाना पाटोले, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण , महसूल मंत्री बाळसाहेब थोरात, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, उर्जामंत्री नितीन राऊत माणिकराव ठाकरे, यांच्यासह राज्यातील कॉंग्रेसचे सर्व मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी मोठ्या संख्यने उपस्थित होते.     शिबीर सुरु होण्यापूर्वी सर्वच प्रमुख नेत्यांनी राज्यसभेबाबत कोणतीही नाराजी नसल्याचे स्पष्ट केले. राज्यसभेच्या जागेवरून नाराज असलेले अशिष देशमुख यांची मात्र, शिबिराला अनुपस्थिती आहे. शिर्डी,नगर- मनमाड महामार्ग व शिबीरस्थळ पूर्ण कॉंग्रेसमय झाले आहे.  

मला नाही वाटत कुणाची नाराजी आहे

हायकमांड निर्णय घेत असतात. मला नाही वाटत कुणाची नाराजी आहे. ही तात्पुरती असते सगळे शांत होईल. हायकमांडचा निर्णय आहे. त्यास कुणी आवाहन देऊ शकत नाही, असे माजी केंद्रीय मंत्री आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटले आहे.

बाकी काही नाही तुम्ही त्याला नाराजी म्हणतात

केंद्रीय नेतृत्वाला कामकाज चालविण्यासाठी आवश्यक वाटते ती माणसे घेतली जातात. अंतर्गत नाराजीचे चित्र फक्त मेडियात आहे प्रत्यक्षात नाही. फक्त मुकुल वासनिक यांना महाराष्ट्रातून उमदेवारी द्यावी एवढीच आमची मागणी होती. बाकी काही नाही तुम्ही त्याला नाराजी म्हणतात, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले.

प्रतापगढी हे उत्तरप्रदेशातील महत्वाचे नेते 

राज्यसभेसदंर्भात कोणतीही नाराजी नाही, प्रतापगढी हे उत्तरप्रदेशातील महत्वाचे नेते आहेत. देशभर पक्षाच्या प्रचार प्रसारासाठी त्यांचे महत्वपूर्ण योगदान असते. आपण जसे उत्तरप्रदेशच्या उमेदवारला मतदान करणार आहोत. तसेच मुकल वासनिक यांना राजस्थानात मतदान होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रला प्रतिनिधित्व मिळाले नाही असे म्हणता येणार नाही. आशिष देशमुख युवक नेतेत आहेत. त्यांचाशी बोलून त्यांची समजूत काढू, त्यांचे वडील मोठे नेतृत्व आहे, असे राज्याचे महसूलमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

हायकमांडचा निर्णय अंतिम असतो

मला वाटते या संदर्भात फक्त मीडियात नाराजी आहे. हायकमांडचा निर्णय अंतिम असतो. मतभेत असतात पण नाराजी नाही. थोडीफार असली तर आमचे आम्ही मिटवून घेऊ, अशीष देशमुख माझा भाऊ आहे,मित्र आहे, त्याच्याशी बोलू त्यांची नाराजी दूर करू त्यांच्या कुटुंबाचे पक्षासाठी मोठे योगदान आहे, असे  महिला बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे.

राज्यसभेच्या संदर्भात कुठलीही नाराजी नाही राज्यसभेच्या संदर्भात कुठलीही नाराजी नाही. विरोधक व मीडिया यांनी चालविलेली मोहीम आहे. एखाद्याने मत मांडले तर नाराजी होऊ शकत नाही. कॉंग्रेस मध्ये लोकशाही आहे. मत मांडायचा प्रत्येकाला अधिकार आहे. भाजपासारखी आमच्याकडे हुकुमशाही नाही. त्यांच्यात मोठी खदखद आहे. पण दिसत नाही, असे  प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी नमूद केले. 

टॅग्स :congressकाँग्रेसshirdiशिर्डी