शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
3
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
4
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
5
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
6
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
7
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
8
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
10
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
11
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
12
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
13
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
14
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
15
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
16
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
17
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
18
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
19
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
20
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली

“राहुल गांधी देशाचे पंतप्रधान झाले तर भ्रष्ट भाजप नेत्यांना तुरुंगात टाकू”; काँग्रेसचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2023 09:27 IST

भाजपला त्यांची योग्य जागा दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असा निर्धार व्यक्त करण्यात आला.

Nana Patole News: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. भाजपविरोधी पक्षांची एक महत्त्वाची बैठक पाटणा येथे होणार आहे. देशभरातील विरोधी पक्षांचे नेते या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे. भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधकांनी कंबर कसली असली तरी भाजपने विरोधकांवर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणात काम सुरू केल्याचे सांगितले जात आहे. अशातच आता राहुल गांधी देशाचे पंतप्रधान झाले तर भ्रष्ट भाजप नेत्यांना तुरुंगात टाकू, असा इशारा देण्यात आला आहे. 

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यासंदर्भात भाष्य केले आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे देशाचे पंतप्रधान झाले तर भ्रष्ट भाजप नेत्यांना तुरुंगात टाकू, असा इशारा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला. जशा निवडणुका जवळ येतील तसे विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जाईल. हे आम्हाला नवीन नाही. ही संभाव्य भीती आम्हा सगळ्यांच्या लक्षात आली असून भाजपला आम्ही योग्य उत्तर देऊ, असेही पटोले यांनी ठणकावून सांगितले.

भाजपला त्यांची योग्य जागा दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पटोले यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली. या देशातील भ्रष्टाचार मुक्त करायचा असेल तर एक सोपे काम नरेंद्र मोदी यांच्या सरकारने करून ठेवले आहे. जे काही भ्रष्टाचारी लोक आहेत त्या सर्वांना ईडी व सीबीआयचा धाक दाखवून भाजपमध्ये एकत्र आणले आहे. त्यामुळे राहुल गांधी पंतप्रधान झाले तर या सगळ्यांना तुरुंगात टाकायला सोपे जाईल. काँग्रेससह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट व राष्ट्रवादी यांची महाविकास आघाडी भक्कम असून भाजपला त्यांची योग्य जागा दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असेही प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, आदिवासी आश्रम शाळेतील वर्ग ३ व ४ च्या रोजंदारी व तासिका तत्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचे सरकारी पत्रक अन्यायकारी आहे. हे कर्माचारी अत्यंत अल्प मानधनावर दुर्गम भागात काम करत आहेत. शासनाने याचा सहानुभीपूर्वक विचार करुन कामावरून काढून टाकण्याचे शासन पत्रक रद्द करावे, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.

 

टॅग्स :congressकाँग्रेसNana Patoleनाना पटोलेNana Patoleनाना पटोले