शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

“तोडाफोडीचे राजकारण देवेंद्र फडणवीसांनी थांबवावे”; नाना पटोलेंचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2023 12:13 IST

Nana Patole Replied Devendra Fadnavis: केंद्रात आणि राज्यात ‘डबल इंजिन’चे सरकार असून, शेतकरी आत्महत्या का करतोय? हे सुद्धा सांगावे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

Nana Patole Replied Devendra Fadnavis: महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा नागपुरात होत आहे. यावरून महाविकास आघाडीचे नेते आणि भाजप तसेच शिंदे गटात आरोप प्रत्यारोप सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका विधानाला आता काँग्रेस नेते नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिले असून, तोडाफोडीचे राजकारण देवेंद्र फडणवीसांनी थांबवावे, असे म्हटले आहे. 

महाविकास आघाडीच्या वज्रमुठीचे छायाचित्र बघितले असून त्याला भेगा पडलेल्या दिसत आहेत. अशी भेगा पडलेली वज्रमुठ आमचा मुकाबला करू शकत नाही. महाविकास आघाडीची अवस्था सध्या फारच वाईट आहे. पहिला भोंगा सकाळी ९ वाजतो. त्याविरोधात दुसरा भोंगा दुपारी १२ आणि सायंकाळी तिसरा भोंगा पहिल्या दोघांनाही खोडून काढतो. या भोंग्यामुळे महाविकास आघाडीमध्ये एकमत नसल्याचे फडणवीस म्हणाले. तसेच काँग्रेसमध्ये कोणी राहण्यास तयार नाही. अख्खा काँग्रेस पक्ष हळूहळू आपल्या पाठिशी येतोय. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही. आमची वज्रमूठ ही विकासाची असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

तोडाफोडीचे राजकारण देवेंद्र फडणवीसांनी थांबवावे

केंद्रात आणि राज्यात भाजपाची सत्ता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘डबल इंजिन’चे सरकार असल्याचे सांगतात. मग, राज्यातील शेतकरी आत्महत्या का करतोय? हे सुद्धा सांगावे. गेल्या एक महिन्यांपासून शेतकऱ्यांना मदत देण्याचे आश्वासन दिले जाते. पण, फक्त घोषणांचा पाऊस पाडण्यात येत आहे. नैसर्गिक आपत्तीचे संकट शेतकऱ्यांवर आले आहे. मात्र, शेतकऱ्यांचा कापूस अद्यापही खरेदी करण्यात आला नाही. हरभरा, मका, तूर शेतकऱ्यांच्या घरात पडलेले आहेत. बेरोजगार आणि गरिबांचे बेहाल सुरू असून, महागाई वाढली आहे. अशा परिस्थितीत फोडाफोडीचे राजकारण करण्यापेक्षा सत्तेचा लोकांना फायदा मिळवून द्या. फोडाफोडीच्या राजकारणात त्यांना काहीच मिळणार नाही. देवेंद्र फडणवीसांना विरोधकांवर टीका करण्याचा अधिकार आहे. पण, त्यांच्या हातातील सत्तेचा उपयोग स्वत:साठी चाललेला आहे. मंत्रालयात तिजोरी लुटली जात आहे, हे फडणवीसांनी पाहावे. तसेच, तोडाफोडीचे राजकारण देवेंद्र फडणवीसांनी थांबवावे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, महाविकास आघाडीच्या ‘वज्रमुठे’ला कुठेही भेगा पडलेल्या नाहीत. त्यांच्या बोलण्याकडे कोणीही लक्ष देऊ नये. देशातील लोकशाही आणि संविधान टिकावे, हाच आमचा उद्देश आहे आणि त्यासाठी आमचा लढा सुरू आहे, असे सांगत ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावर पलटवार केला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस