शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

“महाराष्ट्रात जातनिहाय जनगणनेचा निर्णय भाजपप्रणित सरकारने घ्यावा”; काँग्रेसची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2023 19:35 IST

Congress Nana Patole News: ओबीसी, धनगर माजाच्या मागण्या रास्त आहेत, त्या पूर्ण करायच्या असतील तर जातनिहाय जनगणना हाच एकमेव मार्ग आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे.

Congress Nana Patole News: काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत जातनिहाय जनगणना करावी तसेच आरक्षणावरील ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी असे दोन महत्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले आहेत. या दोन्ही ठरावाचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी स्वागत करत आहे. बिहार सरकारने नुकतीच जातनिहाय जनगणना करुन देशात एक आदर्श घालून दिलेला आहे. काँग्रेसशासित राज्यातही जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय राज्य सरकारने केला आहे. आता भाजपाशासित राज्ये तसचे महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, ‘ज्या समाजाची जेवढी लोकसंख्या तेवढा त्यांचा हक्क’ ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. प्रत्येक समाजाला त्यांचा हक्क मिळण्यासाठी जातनिहाय जनगणना होणे सर्वात महत्वाचे आहे. महाराष्ट्रात मराठा आरक्षणाची मागणी होत आहे, पण जोपर्यंत आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवली जात नाही तोपर्यंत आरक्षणाचा मार्ग सुकर होणार नाही. काँग्रेस पक्षाने सातत्याने ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला पण केंद्रातील भाजपा सरकार त्यावर निर्णय घेत नाही. भाजपाचा जातनिहाय जनगणना करण्यास विरोध आहे, विरोधासाठी दिली जात असलेली कारणेही हास्यास्पद आहेत, अशी टीका नाना पटोले यांनी केली. 

राज्यात ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न अद्याप प्रलंबित

विधानसभेचा अध्यक्ष असताना मी जातनिहाय जनगणना करावी या आशयाचा ठराव विधानसभेत मांडून तो मंजूर करुन घेतला होता. महाराष्ट्रानंतर देशातील इतर राज्यातील विधानसभांनीही तसा ठराव केला पण केंद्रातील भाजपा सरकारने जातनिहाय जनगणना केली नाही. राज्यात ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटलेला नाही, धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्नही कायम आहे, या समाजाच्या मागण्या रास्त आहेत, त्या पूर्ण करायच्या असतील तर जातनिहाय जनगणना हाच एकमेव मार्ग आहे असेही नाना पटोले म्हणाले. 

टॅग्स :congressकाँग्रेसNana Patoleनाना पटोलेNana Patoleनाना पटोले