शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

“सध्याची परिस्थिती चांगली नाही, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी”; काँग्रेसची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 14:19 IST

Congress Nana Patole Demands President Rule Maharashtra: सरकार तुपाशी आणि जनता उपाशी अशी परिस्थिती आहे. राज्यात कायदा-सुव्यवस्था राहिलेली नाही, अशी टीका करण्यात आली आहे.

Congress Nana Patole Demands President Rule Maharashtra: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी अचानकपणे बंडखोरी केली. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपावरून शिंदे-फडणवीस-पवार यांच्यात मतभेद असून, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या आमदार, समर्थकांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, यातच आता सध्याची परिस्थिती चांगली नाही. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी. राज्यपाल आणि राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. 

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, भाजपने महाराष्ट्राचा चेहरा विद्रुप केला आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार न करणे. ईडीची भिती दाखवून विरोधकांवर दबाव निर्माण करण्यात येत आहे. मलाईदार खात्यांसाठी खातेवाटप रखडला, असा दावा नाना पटोले यांनी केला. महाराष्ट्र सरकारने सुलतानी जी आर काढला. राज्यात रिक्त असलेल्या ठिकाणी निवृत्त झालेल्या शिक्षकांच्या करार करुन नियुक्ती करावी, तरुणांच्या ही कुऱ्हाड आहे. तरुणांवर आघात करणारे हे सरकार आहे, अशी घणाघाती टीका नाना पटोले यांनी केली. 

१०५ आमदारांना निवडून दिल्याची चूक जनतेच्या लक्षात आली आहे

महाराष्ट्रातील सरकारला जनतेच्या प्रश्नाशी काही देणे-घेणे नाही. जनतेला मोठी आश्वासने देऊन भाजपवाले सत्तेत आले. १०५ आमदारांना निवडून दिल्याची चूक महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात आले आहे. ज्याप्रमाने अलीबाबा ४० चोरांची टीम होती. ते जनतेला लुटायचे, आज सरकारची तीच अवस्था आहे, असे टीकास्त्र नाना पटोले यांनी सोडले. 

दरम्यान, सरकार तुपाशी आणि जनता उपाशी अशी परिस्थिती आहे. राज्यात कायदा-सुव्यवस्था राहिलेली नाही. ईडीए सरकारचा काँग्रेस निषेध करते, जनता निषेध करत आहे. म्हणून आम्ही राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केलेली आहे, असे नाना पटोले म्हणाले.

 

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेPresident Ruleराष्ट्रपती राजवटEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवार