शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

माझ्या रक्तातच काँग्रेस; 'या' महिला नेत्यांनी ठणकावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 16:24 IST

वर्षा गायकवाड यांचे वडिल एकनाथ गायकवाड यांना नुकतेच मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष म्हणून निवडण्यात आले आहे. काँग्रेसकडून देण्यात आल्यामुळे जबाबदारी यामुळे गायकवाड कुटुंबीय पक्षांतर करेल, याची शक्यता कमीच आहे.

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इतिहासात कधीही झालं नाही, असं पक्षांतर पाहायला मिळत आहे. एकट्या राष्ट्रवादीतून आतापर्यंत २० हून अधिक नेते सत्ताधारी पक्षात गेले असून आणखी काही नेते भाजपच्या वाटेवर आहेत. त्यातच अनेक नेत्यांच्या बाबतीत अफवाही पसरविली जात आहे. मात्र एका महिला काँग्रेस नेत्याने या आफवा पसरविणाऱ्यांना चांगलेच ठणकावले आहे.

माजीमंत्री आणि काँग्रेसनेत्यावर्षा गायकवाड या लवकरच पक्षांतर करणार असलेल्या चर्चा काही दिवसांपासून मुंबईत सुरू आहे. त्यांच्या धारावी मतदार संघातही अनेकजन चार दिवसांत वर्षा गायकवाड पक्षांतर करणार असून पक्ष माहित नसल्याचे ठामपणे सांगत होते. गायकवाड यांनी २०१४ च्या मोदी लाटेत देखील आपली आमदारकी शाबूत राखली होती. परंतु, त्याच आता पक्षांतर करणार यामुळे काँग्रेसची खात्रीलायक जागा जाणार अशी चर्चा सुरू होती.

दरम्यान इच्छुकांच्या मुलाखतीत, वर्षा गायकवाड उपस्थित राहू शकल्या नाही. त्यामुळे त्यांच्या पक्षांतराच्या चर्चांना पाठबळ मिळाले होते. मात्र यावर खुद्द वर्षा गायकवाड यांनीच प्रतिक्रिया दिली. आजारी असल्यामुळे आपण मुलाखतीला जावू शकलो नाही, असं त्यांनी सांगितले. तसेच काँग्रेस माझ्या रक्तातच आहे. माझ्या घरात काँग्रेसची परंपरा आहे. शेवटपर्यंत आपण काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे गायकवाड यांनी ठणकावले. तसेच आपल्या पक्षांतराच्या ज्या बातम्या पेरल्या जात आहेत, त्यात तथ्य नसल्याचे त्यांनी नमूद केले.

वर्षा गायकवाड यांचे वडिल एकनाथ गायकवाड यांना नुकतेच मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष म्हणून निवडण्यात आले आहे. काँग्रेसकडून देण्यात आल्यामुळे जबाबदारी यामुळे गायकवाड कुटुंबीय पक्षांतर करेल, याची शक्यता कमीच आहे.