शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

राज्याला महिला CM मिळेल? सुप्रिया सुळे-रश्मी ठाकरेंचे नाव चर्चेत? काँग्रेस खासदार म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2024 15:22 IST

Maharashtra Assembly Election 2024: मविआतील सर्व पक्षांकडे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सक्षमपणे सांभाळणाऱ्या महिला आहेत. भाजपात महिलांना मंत्रि‍पदेही दिली जात नाही, अशी टीका काँग्रेस खासदाराने केली.

Maharashtra Assembly Election 2024: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात अनेक दावे-प्रतिदावे केले जात असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहेत. मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून राज्यात अनेक चर्चा सुरू असल्याचे दिसत आहे. अनेक नेत्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनरही लागत आहेत. यातच आता राज्याला महिला मुख्यमंत्री मिळण्याची शक्यता वर्तवली जात असून, यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची नावे आघाडीवर असल्याचे म्हटले जात आहे. यासंदर्भात काँग्रेसच्या महिला खासदाराने केलेले वक्तव्य चर्चेत आले आहे. 

अद्यापपर्यंत महाराष्ट्रात एकही महिला मुख्यमंत्री झालेली नाही. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता महिला मुख्यमंत्री हा विषय चर्चेच्या केंद्रस्थानी आल्याचे दिसत आहे. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात महाराष्ट्रात निवडणूक होईल असे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत तर येत्या १०-१५ दिवसांत राज्यात निवडणुकीची आचारसंहिता लागेल, असे भाजपा नेते गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. यातच काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी महिला मुख्यमंत्री विषयावर स्पष्ट शब्दांत भाष्य केले आहे. 

मुख्यमंत्री महिला झाली तर फारच आनंद होईल

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळू शकते का? अशा आशयाच्या प्रश्नावर वर्षा गायकवाड यांनी थेट भाष्य केले. महाराष्ट्र पुरोगामी आणि प्रगत आहे. महाविकास आघाडीतील सर्व पक्षांकडे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सक्षमपणे सांभाळणाऱ्या महिला आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडे सुप्रिया सुळे आहेत, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेना गटाकडे रश्मी ठाकरे आहेत. आमच्या पक्षाकडेही महिला नेत्या आहेत. त्याबाबतचा निर्णय निवडून आलेले आमदार घेतात, असे वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, महाविकास आघाडीपैकी कुठल्याही पक्षाची महिला मुख्यमंत्री झाली तरीही आनंदच होईल. महिलांना खूप संघर्ष करावा लागतो. आमच्यासमोर इंदिरा गांधींचा आदर्श आहे. सोनिया गांधींना आम्ही संघर्ष करताना पाहिले आहे. भाजपाकडे बघा, भाजपमध्ये महिलांना मंत्रिपदही दिले  जात नाही. पक्षाचे अध्यक्षपद दिले जात नाही. महत्त्वाची बाब म्हणजे आता आपण ५० टक्के आरक्षणही लागू केले असून महाराष्ट्र त्यात आघाडीवर आहे, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या. एका वृत्तवाहिनीशी बोलताना वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात वक्तव्य केले आहे.

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Varsha Gaikwadवर्षा गायकवाडSupriya Suleसुप्रिया सुळेSupriya Suleसुप्रिया सुळेShiv SenaशिवसेनाMahavikas Aghadiमहाविकास आघाडीmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडी