शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
3
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
4
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
5
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
6
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
7
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
8
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
9
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
10
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
11
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
12
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
13
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
14
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
15
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
16
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
17
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
18
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
19
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
20
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं

“उद्धव ठाकरेंना समजू शकला नाही, तर तुम्ही कसले शिवसैनिक”; काँग्रेसची बंडखोरांवर बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 18:03 IST

आम्ही महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी उद्धव ठाकरेंना समजून घेतले, असे सांगत काँग्रेसने बंडखोर आमदारांवर टीका केली.

मुंबई: शिवसेनेचे बडे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह पक्षाच्या ३५ हून अधिक आमदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकारणात अगदी वेगवान घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. यातच शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट यांच्यातील संघर्षही आणखी तीव्र होताना दिसत आहेत. यातच आता शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पुन्हा एकदा बंडखोर आमदारांना परत येण्याचे आवाहन केले आहे. यानंतर काँग्रेसने आता बंडखोरांवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. उद्धव ठाकरे यांना समजू शकला नाहीत, तर तुम्ही कसले शिवसैनिक आहात, या शब्दांत हल्लाबोल केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात मंत्रिमंडळाची एक बैठक पार पडली. या बैठकीला महाविकास आघाडीतील मंत्र्यांची उपस्थिती होती. महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार पडणार की तरणार याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. यातच उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना लिहिलेल्या पत्राबाबत काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांना विचारण्यात आले. यावर प्रतिक्रिया देताना यशोमती ठाकूर यांनी बंडखोर आमदारांवर टीका केली.

तुम्ही उद्धव ठाकरे यांचा समजू शकलेला नाहीत

राजकारणात अशक्य असे काहीच नसते. उद्धव ठाकरे कुटुंब प्रमुख आहेत. बंडखोरांना भावनिक साद घालणे साहजिकच आहे. मात्र, आम्ही शिवसेनेत नसतानाही उद्धव ठाकरे यांना समजून घेऊ शकलो. उद्धव ठाकरे यांची तब्येत बरी नाही. त्यांचे मोठे ऑपरेशन झाले आहेत. तर मग ज्यांनी तुम्हा राजकारणात जन्माला घातले, पुढे आणले, त्यांना कसे तुम्ही समजू शकला नाहीत आणि असे असेल तर तुम्ही शिवसैनिक कसले शिवसैनिक, अशी विचारणा यशोमती ठाकूर यांनी केले आहे. 

दरम्यान, आपण गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटी येथे अडकून पडलेले आहात. आपल्या बाबत रोज नवीन माहिती समोर येत आहे , आपल्यातील बरेच संपर्कातही आहेत आपण आजही मनाने शिवसेनेत आहात. आपल्यापैकी काही आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील संपर्क साधून आपल्या मनातील भावना मला कळवल्या आहेत. आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो. कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही. माझं आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे, आपण या माझ्या समोर बसा. शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा. यातून निश्चित मार्ग निघेल. आपण एकत्र बसून यातून मार्ग काढू. कोणाच्याही कोणत्याही भूल थापांना बळी पडू नका. शिवसेनेने जो मान सन्मान तुम्हाला दिला तो कुठेही मिळू शकत नाही. समोर आलात बोललात तर मार्ग निघेल. शिवसेना पक्ष प्रमुख आणि कुटुंब प्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटत आहे. समोर येऊन बोला आपण मार्ग काढू, असे एक पत्र उद्धव ठाकरे यांनी लिहिले आहे. 

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेYashomati Thakurयशोमती ठाकूर