शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
4
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
5
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
6
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
7
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
8
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
9
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
10
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
11
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
12
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
13
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
14
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
15
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
16
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
17
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
18
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
19
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
20
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...

“उद्धव ठाकरेंना समजू शकला नाही, तर तुम्ही कसले शिवसैनिक”; काँग्रेसची बंडखोरांवर बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 18:03 IST

आम्ही महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी उद्धव ठाकरेंना समजून घेतले, असे सांगत काँग्रेसने बंडखोर आमदारांवर टीका केली.

मुंबई: शिवसेनेचे बडे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह पक्षाच्या ३५ हून अधिक आमदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकारणात अगदी वेगवान घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. यातच शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट यांच्यातील संघर्षही आणखी तीव्र होताना दिसत आहेत. यातच आता शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पुन्हा एकदा बंडखोर आमदारांना परत येण्याचे आवाहन केले आहे. यानंतर काँग्रेसने आता बंडखोरांवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. उद्धव ठाकरे यांना समजू शकला नाहीत, तर तुम्ही कसले शिवसैनिक आहात, या शब्दांत हल्लाबोल केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात मंत्रिमंडळाची एक बैठक पार पडली. या बैठकीला महाविकास आघाडीतील मंत्र्यांची उपस्थिती होती. महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार पडणार की तरणार याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. यातच उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना लिहिलेल्या पत्राबाबत काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांना विचारण्यात आले. यावर प्रतिक्रिया देताना यशोमती ठाकूर यांनी बंडखोर आमदारांवर टीका केली.

तुम्ही उद्धव ठाकरे यांचा समजू शकलेला नाहीत

राजकारणात अशक्य असे काहीच नसते. उद्धव ठाकरे कुटुंब प्रमुख आहेत. बंडखोरांना भावनिक साद घालणे साहजिकच आहे. मात्र, आम्ही शिवसेनेत नसतानाही उद्धव ठाकरे यांना समजून घेऊ शकलो. उद्धव ठाकरे यांची तब्येत बरी नाही. त्यांचे मोठे ऑपरेशन झाले आहेत. तर मग ज्यांनी तुम्हा राजकारणात जन्माला घातले, पुढे आणले, त्यांना कसे तुम्ही समजू शकला नाहीत आणि असे असेल तर तुम्ही शिवसैनिक कसले शिवसैनिक, अशी विचारणा यशोमती ठाकूर यांनी केले आहे. 

दरम्यान, आपण गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटी येथे अडकून पडलेले आहात. आपल्या बाबत रोज नवीन माहिती समोर येत आहे , आपल्यातील बरेच संपर्कातही आहेत आपण आजही मनाने शिवसेनेत आहात. आपल्यापैकी काही आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील संपर्क साधून आपल्या मनातील भावना मला कळवल्या आहेत. आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो. कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही. माझं आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे, आपण या माझ्या समोर बसा. शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा. यातून निश्चित मार्ग निघेल. आपण एकत्र बसून यातून मार्ग काढू. कोणाच्याही कोणत्याही भूल थापांना बळी पडू नका. शिवसेनेने जो मान सन्मान तुम्हाला दिला तो कुठेही मिळू शकत नाही. समोर आलात बोललात तर मार्ग निघेल. शिवसेना पक्ष प्रमुख आणि कुटुंब प्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटत आहे. समोर येऊन बोला आपण मार्ग काढू, असे एक पत्र उद्धव ठाकरे यांनी लिहिले आहे. 

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेYashomati Thakurयशोमती ठाकूर