शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

Maha Vikas Aghadi: ‘मविआ’तील घटक पक्षात धुसफूस; काँग्रेस आमदारांना हवीय सोनिया गांधींची भेट, तक्रार करणार थेट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 14:36 IST

Maha Vikas Aghadi: शिवसेना आमदारांची खदखद समोर आल्यानंतर आता काँग्रेसमधील २५ आमदार नाराज असल्याचे सांगितले जात आहे.

मुंबई: महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi) बेबनाव, नाराजी आता मोठ्या प्रमाणात चव्हाट्यावर येत आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात राष्ट्रवादी काँग्रेसला अधिकच्या निधीवाटपानंतर शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांमधील नाराजी आता उघडपणे समोर येऊ लागली आहे. शिवसेना नेते तानाजी सावंत यांनी एका सभेला संबोधित करताना शिवसेनेला दुय्यम वागणूक मिळत असल्याची खदखद बोलून दाखवली होती. शिवसेनेनंतर आता काँग्रेस आमदार आपल्याच मंत्र्यांवर नाराज असल्याचे सांगितले जात आहे. नाराज असलेल्यांची संख्या २५ च्या जवळपास असून, काँग्रेस प्रमुख सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या भेटीची वेळ मागितली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. 

राज्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सत्तेची फळे चाखता येत आहेत. पण शिवसेनेलाच लाचारासारखी वागणूक मिळत आहे. गेल्या अडीच वर्षात केवळ अपमानच होत असेल, तर साहेब विचार करायला हवा, अशी खदखद शिवसेना आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांनी अलीकडेच व्यक्त केली. यानंतर आता शिवसेना सत्तेचा मोह सोडून महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का, याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. तानाजी सावंत यांनी बोलून दाखवलेल्या नाराजीला अवघे काही दिवस उलटले असताना आता काँग्रेसमध्येही धुसपूस असल्याचे समोर आले आहे. 

नाराज आमदार सोनिया गांधींची घेणार भेट

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेनंतर आता काँग्रेस पक्षामधून नाराजीचा सूर उमटू लागला आहे. काँग्रेसचे काही आमदार नाराज असल्याचे बोललं जात असून यासंदर्भात थेट सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचीच भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे सांगितले जात आहे. यासाठी सोनिया गांधी यांच्याकडे भेटीची वेळही मागितली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसचे मंत्री असूनही त्यांच्याकडून कामे लवकर होत नसल्याबाबत आमदारांमध्ये नाराजी असल्याची माहिती समोर आली आहे. पुढील महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात ही आमदार मंडळी दिल्लीला एका प्रशिक्षणासाठी जाणार असून तेव्हाच सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेणार असल्याचे म्हटले जात आहे. 

दरम्यान, सत्ता स्थापन झाल्यानंतर काही महिन्यांतच बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांमध्ये बोलताना ही नाराजी बोलून दाखवली होती. यानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आतातरी महाविकास आघाडीचा किमान समान कार्यक्रम राबवावा, अशी मागणी केल्याची माहिती मिळाली आहे. यासंदर्भात नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिल्याची माहिती मिळाली आहे.  

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीcongressकाँग्रेस