शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

Maha Vikas Aghadi: ‘मविआ’तील घटक पक्षात धुसफूस; काँग्रेस आमदारांना हवीय सोनिया गांधींची भेट, तक्रार करणार थेट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 14:36 IST

Maha Vikas Aghadi: शिवसेना आमदारांची खदखद समोर आल्यानंतर आता काँग्रेसमधील २५ आमदार नाराज असल्याचे सांगितले जात आहे.

मुंबई: महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi) बेबनाव, नाराजी आता मोठ्या प्रमाणात चव्हाट्यावर येत आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात राष्ट्रवादी काँग्रेसला अधिकच्या निधीवाटपानंतर शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांमधील नाराजी आता उघडपणे समोर येऊ लागली आहे. शिवसेना नेते तानाजी सावंत यांनी एका सभेला संबोधित करताना शिवसेनेला दुय्यम वागणूक मिळत असल्याची खदखद बोलून दाखवली होती. शिवसेनेनंतर आता काँग्रेस आमदार आपल्याच मंत्र्यांवर नाराज असल्याचे सांगितले जात आहे. नाराज असलेल्यांची संख्या २५ च्या जवळपास असून, काँग्रेस प्रमुख सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या भेटीची वेळ मागितली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. 

राज्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सत्तेची फळे चाखता येत आहेत. पण शिवसेनेलाच लाचारासारखी वागणूक मिळत आहे. गेल्या अडीच वर्षात केवळ अपमानच होत असेल, तर साहेब विचार करायला हवा, अशी खदखद शिवसेना आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांनी अलीकडेच व्यक्त केली. यानंतर आता शिवसेना सत्तेचा मोह सोडून महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का, याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. तानाजी सावंत यांनी बोलून दाखवलेल्या नाराजीला अवघे काही दिवस उलटले असताना आता काँग्रेसमध्येही धुसपूस असल्याचे समोर आले आहे. 

नाराज आमदार सोनिया गांधींची घेणार भेट

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेनंतर आता काँग्रेस पक्षामधून नाराजीचा सूर उमटू लागला आहे. काँग्रेसचे काही आमदार नाराज असल्याचे बोललं जात असून यासंदर्भात थेट सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचीच भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे सांगितले जात आहे. यासाठी सोनिया गांधी यांच्याकडे भेटीची वेळही मागितली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसचे मंत्री असूनही त्यांच्याकडून कामे लवकर होत नसल्याबाबत आमदारांमध्ये नाराजी असल्याची माहिती समोर आली आहे. पुढील महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात ही आमदार मंडळी दिल्लीला एका प्रशिक्षणासाठी जाणार असून तेव्हाच सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेणार असल्याचे म्हटले जात आहे. 

दरम्यान, सत्ता स्थापन झाल्यानंतर काही महिन्यांतच बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांमध्ये बोलताना ही नाराजी बोलून दाखवली होती. यानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आतातरी महाविकास आघाडीचा किमान समान कार्यक्रम राबवावा, अशी मागणी केल्याची माहिती मिळाली आहे. यासंदर्भात नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिल्याची माहिती मिळाली आहे.  

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीcongressकाँग्रेस