शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

Maha Vikas Aghadi: ‘मविआ’तील घटक पक्षात धुसफूस; काँग्रेस आमदारांना हवीय सोनिया गांधींची भेट, तक्रार करणार थेट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 14:36 IST

Maha Vikas Aghadi: शिवसेना आमदारांची खदखद समोर आल्यानंतर आता काँग्रेसमधील २५ आमदार नाराज असल्याचे सांगितले जात आहे.

मुंबई: महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi) बेबनाव, नाराजी आता मोठ्या प्रमाणात चव्हाट्यावर येत आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात राष्ट्रवादी काँग्रेसला अधिकच्या निधीवाटपानंतर शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांमधील नाराजी आता उघडपणे समोर येऊ लागली आहे. शिवसेना नेते तानाजी सावंत यांनी एका सभेला संबोधित करताना शिवसेनेला दुय्यम वागणूक मिळत असल्याची खदखद बोलून दाखवली होती. शिवसेनेनंतर आता काँग्रेस आमदार आपल्याच मंत्र्यांवर नाराज असल्याचे सांगितले जात आहे. नाराज असलेल्यांची संख्या २५ च्या जवळपास असून, काँग्रेस प्रमुख सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या भेटीची वेळ मागितली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. 

राज्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सत्तेची फळे चाखता येत आहेत. पण शिवसेनेलाच लाचारासारखी वागणूक मिळत आहे. गेल्या अडीच वर्षात केवळ अपमानच होत असेल, तर साहेब विचार करायला हवा, अशी खदखद शिवसेना आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांनी अलीकडेच व्यक्त केली. यानंतर आता शिवसेना सत्तेचा मोह सोडून महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का, याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. तानाजी सावंत यांनी बोलून दाखवलेल्या नाराजीला अवघे काही दिवस उलटले असताना आता काँग्रेसमध्येही धुसपूस असल्याचे समोर आले आहे. 

नाराज आमदार सोनिया गांधींची घेणार भेट

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेनंतर आता काँग्रेस पक्षामधून नाराजीचा सूर उमटू लागला आहे. काँग्रेसचे काही आमदार नाराज असल्याचे बोललं जात असून यासंदर्भात थेट सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचीच भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे सांगितले जात आहे. यासाठी सोनिया गांधी यांच्याकडे भेटीची वेळही मागितली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसचे मंत्री असूनही त्यांच्याकडून कामे लवकर होत नसल्याबाबत आमदारांमध्ये नाराजी असल्याची माहिती समोर आली आहे. पुढील महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात ही आमदार मंडळी दिल्लीला एका प्रशिक्षणासाठी जाणार असून तेव्हाच सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेणार असल्याचे म्हटले जात आहे. 

दरम्यान, सत्ता स्थापन झाल्यानंतर काही महिन्यांतच बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांमध्ये बोलताना ही नाराजी बोलून दाखवली होती. यानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आतातरी महाविकास आघाडीचा किमान समान कार्यक्रम राबवावा, अशी मागणी केल्याची माहिती मिळाली आहे. यासंदर्भात नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिल्याची माहिती मिळाली आहे.  

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीcongressकाँग्रेस