शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

"२७ वर्षे काही करु शकला नाही, मृत्यूनंतर काय..."; औरंगजेबाच्या कबरीवरुन वडेट्टीवारांनी सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 08:09 IST

औरंगजेबाची कबर हटवण्याच्या विहिंपच्या मागणीवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली.

Vijay Wadettiwar on Aurangzeb Tomb: छावा चित्रपटानंतर औरंगजेबाच्या नावावरून महाराष्ट्रात सुरू झालेला वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये. हिंदुत्ववादी संघटनांकडून आता थेट औरंगजेबाची कबर पाडण्यापर्यंत मागणी करण्यात आलीय. महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावर भाष्य केलं होतं. त्यानंतर आता छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाच्या कबरीजवळ सुरक्षा वाढवण्यात आली आहे. औरंगजेबाची कबर हटवण्यात यावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने राज्य सरकारकडे केली आहे. यावरुन आता विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित 'छावा' हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर हिंदू संघटनांनी औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी केली आहे. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने औरंगजेबाची कबर हटवण्यास सांगितले आहे. तसे न झाल्यास बाबरीसारखी कारसेवा करण्याचा इशारा देण्यात आला आहे. औरंगजेबाची कबर हटवण्याच्या विहिंप आणि बजरंग दलाच्या मागणीबद्दल काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली.

"त्यांच्याकडे आणखी काही काम उरलेलं नाही. फक्त हिंदुत्वाच्या नावावर राजकारण केलं जात आहे. औरंगजेबाची कबर खोदण्याच्या आधी तुम्ही जी पापं केली आहेत त्याकडे पाहा. ४०० वर्षापूर्वीच्या कबरीवर राजकारण करणं आणि इतिहास मोडून तोडून सांगणे, सणांमध्ये एकमेकांमध्ये भांडणे लावून देणे यासारख्या गोष्टी आता सामान्य झाल्या आहेत. या लोकांना महाराष्ट्रातल्या जनतेला शांततेने जगू द्यायचं नाही. राज्य नेहमीच अस्थिर ठेवण्याचे काम केलं जात आहे. औरंगजेब २७ वर्षे इथे होता तेव्हा तो महाराष्ट्राचे काहीही बिघडवू शकला नाही. आता त्याच्या मृत्यूनंतर त्याची कबर खोदून तुम्हाला काय मिळणार आहे," असं विजय वडेट्टीवार म्हणाले. 

दरम्यान, औरंगजेबाची कबर पाडण्यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हालाही तेच वाटतं असं म्हटलं होतं. "आम्हालाही प्रत्येकाला असंच वाटतं. फक्त काही गोष्टी कायद्याने कराव्या लागतात. कारण ती कबर संरक्षित आहे. काँग्रेसच्या काळात त्या कबरीला एएसआयचं संरक्षण मिळालेलं आहे”, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारAurangzeb Tombऔरंगजेबाची कबरchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर