शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
3
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
4
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
5
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
6
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
7
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
8
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
10
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
11
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
12
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
13
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
14
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
15
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
16
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
17
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
18
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
19
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
20
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली

“मराठा समाजाला आरक्षण दिले होते, पण सरकार पडले अन् ते टिकू शकले नाही”: पृथ्वीराज चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2023 15:08 IST

Prithviraj Chavan On Maratha Reservation: २०१४ मध्ये ज्या फॉर्मुल्याने आरक्षण दिले त्याच फॉर्मुल्याने मराठा समाजाला आरक्षण मिळू शकेल, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.

Prithviraj Chavan On Maratha Reservation: मराठा आरक्षणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला असून, सरकारला २४ डिसेंबरपर्यंतचे अल्टिमेटम देण्यात आले आहे. ओबीसींमधून आरक्षण देण्याला जोरदार विरोध होत असून, मोठ्या प्रमाणात आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. यातच आता आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिले होते. मात्र, सरकार पडले आणि पुढे आरक्षण टिकू शकले नाही, असा मोठा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. 

मी जुलै २०१४ मध्ये मराठा समाजाला १४ टक्के आरक्षण दिले होते. मात्र, त्यानंतर आलेल्या नव्या सरकारला हे आरक्षण टिकवता आले नाही. मी ज्या फॉर्मुल्याने मराठा आरक्षण दिले त्याच फॉर्मुल्याने मराठा समाजाला आरक्षण मिळू शकेल. आरक्षणाच्या मुद्द्यावर होत असलेल्या राजकारणाबाबत मला कोणी काय आरोप केला याविषयी बोलायचे नाही. परंतु, स्वातंत्र्यानंतर आरक्षणाविषयी पहिल्यांदा मी प्रश्न हाती घेतला होता. कायद्याच्या चौकटीत बसून आरक्षणाचा प्रश्न हाताळला, अशी प्रतिक्रिया पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मराठा आरक्षणाबाबत निव्वळ फसवणूक

आम्ही न्यायालयाची सब कमिटी नेमली होती. मराठा समाजाला क्रिमिलियरची अट टाकून २०१४ मध्ये १६ टक्के आरक्षण दिले. मुस्लिमांच्या मागासलेल्या लोकांना अशा ५० जाती शोधून ५ टक्के आरक्षण त्याकाळी दिले होते. आमचे सरकार पाडण्यात आले आणि हे आरक्षण टिकू शकल नाही, असा दावा करत, देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाबाबत १६ टक्केच्या ऐवजी १२ टक्के आरक्षण द्यायचा प्रयत्न केला. मात्र ती निव्वळ फसवणूक होती. आरक्षणाच्या मुद्द्यावरून सामाजिक वातावरण दूषित होऊ नये यासाठी सरकारने काळजी घ्यायची गरज आहे, या शब्दांत पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य केले. 

दरम्यान, यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृत राजकारण करून राज्याच्या समाजकारणाची राजकारणाची घडी बसवली होती. त्याचा अभ्यास इतर राज्यांकडून केला जायचा. मात्र दुर्दैवाने हे चित्र आता राहिले नाही. नेत्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीवर येऊन एकदा आत्मक्लेश करू नये. तर रोज सकाळ-सायंकाळ येऊन आत्मक्लेश करावा, असा खोचक टोला चव्हाण यांनी लगावला. धनगर समाजाला १५ दिवसांत आरक्षण देतो, असे फडणवीस म्हणाले होते. त्यावर आता तेच बोलतील, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाण