शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

“मराठा समाजाला आरक्षण दिले होते, पण सरकार पडले अन् ते टिकू शकले नाही”: पृथ्वीराज चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2023 15:08 IST

Prithviraj Chavan On Maratha Reservation: २०१४ मध्ये ज्या फॉर्मुल्याने आरक्षण दिले त्याच फॉर्मुल्याने मराठा समाजाला आरक्षण मिळू शकेल, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.

Prithviraj Chavan On Maratha Reservation: मराठा आरक्षणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला असून, सरकारला २४ डिसेंबरपर्यंतचे अल्टिमेटम देण्यात आले आहे. ओबीसींमधून आरक्षण देण्याला जोरदार विरोध होत असून, मोठ्या प्रमाणात आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. यातच आता आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिले होते. मात्र, सरकार पडले आणि पुढे आरक्षण टिकू शकले नाही, असा मोठा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. 

मी जुलै २०१४ मध्ये मराठा समाजाला १४ टक्के आरक्षण दिले होते. मात्र, त्यानंतर आलेल्या नव्या सरकारला हे आरक्षण टिकवता आले नाही. मी ज्या फॉर्मुल्याने मराठा आरक्षण दिले त्याच फॉर्मुल्याने मराठा समाजाला आरक्षण मिळू शकेल. आरक्षणाच्या मुद्द्यावर होत असलेल्या राजकारणाबाबत मला कोणी काय आरोप केला याविषयी बोलायचे नाही. परंतु, स्वातंत्र्यानंतर आरक्षणाविषयी पहिल्यांदा मी प्रश्न हाती घेतला होता. कायद्याच्या चौकटीत बसून आरक्षणाचा प्रश्न हाताळला, अशी प्रतिक्रिया पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मराठा आरक्षणाबाबत निव्वळ फसवणूक

आम्ही न्यायालयाची सब कमिटी नेमली होती. मराठा समाजाला क्रिमिलियरची अट टाकून २०१४ मध्ये १६ टक्के आरक्षण दिले. मुस्लिमांच्या मागासलेल्या लोकांना अशा ५० जाती शोधून ५ टक्के आरक्षण त्याकाळी दिले होते. आमचे सरकार पाडण्यात आले आणि हे आरक्षण टिकू शकल नाही, असा दावा करत, देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाबाबत १६ टक्केच्या ऐवजी १२ टक्के आरक्षण द्यायचा प्रयत्न केला. मात्र ती निव्वळ फसवणूक होती. आरक्षणाच्या मुद्द्यावरून सामाजिक वातावरण दूषित होऊ नये यासाठी सरकारने काळजी घ्यायची गरज आहे, या शब्दांत पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य केले. 

दरम्यान, यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृत राजकारण करून राज्याच्या समाजकारणाची राजकारणाची घडी बसवली होती. त्याचा अभ्यास इतर राज्यांकडून केला जायचा. मात्र दुर्दैवाने हे चित्र आता राहिले नाही. नेत्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीवर येऊन एकदा आत्मक्लेश करू नये. तर रोज सकाळ-सायंकाळ येऊन आत्मक्लेश करावा, असा खोचक टोला चव्हाण यांनी लगावला. धनगर समाजाला १५ दिवसांत आरक्षण देतो, असे फडणवीस म्हणाले होते. त्यावर आता तेच बोलतील, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाण