शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

“मराठा समाजाला आरक्षण दिले होते, पण सरकार पडले अन् ते टिकू शकले नाही”: पृथ्वीराज चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2023 15:08 IST

Prithviraj Chavan On Maratha Reservation: २०१४ मध्ये ज्या फॉर्मुल्याने आरक्षण दिले त्याच फॉर्मुल्याने मराठा समाजाला आरक्षण मिळू शकेल, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.

Prithviraj Chavan On Maratha Reservation: मराठा आरक्षणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला असून, सरकारला २४ डिसेंबरपर्यंतचे अल्टिमेटम देण्यात आले आहे. ओबीसींमधून आरक्षण देण्याला जोरदार विरोध होत असून, मोठ्या प्रमाणात आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. यातच आता आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिले होते. मात्र, सरकार पडले आणि पुढे आरक्षण टिकू शकले नाही, असा मोठा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. 

मी जुलै २०१४ मध्ये मराठा समाजाला १४ टक्के आरक्षण दिले होते. मात्र, त्यानंतर आलेल्या नव्या सरकारला हे आरक्षण टिकवता आले नाही. मी ज्या फॉर्मुल्याने मराठा आरक्षण दिले त्याच फॉर्मुल्याने मराठा समाजाला आरक्षण मिळू शकेल. आरक्षणाच्या मुद्द्यावर होत असलेल्या राजकारणाबाबत मला कोणी काय आरोप केला याविषयी बोलायचे नाही. परंतु, स्वातंत्र्यानंतर आरक्षणाविषयी पहिल्यांदा मी प्रश्न हाती घेतला होता. कायद्याच्या चौकटीत बसून आरक्षणाचा प्रश्न हाताळला, अशी प्रतिक्रिया पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मराठा आरक्षणाबाबत निव्वळ फसवणूक

आम्ही न्यायालयाची सब कमिटी नेमली होती. मराठा समाजाला क्रिमिलियरची अट टाकून २०१४ मध्ये १६ टक्के आरक्षण दिले. मुस्लिमांच्या मागासलेल्या लोकांना अशा ५० जाती शोधून ५ टक्के आरक्षण त्याकाळी दिले होते. आमचे सरकार पाडण्यात आले आणि हे आरक्षण टिकू शकल नाही, असा दावा करत, देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाबाबत १६ टक्केच्या ऐवजी १२ टक्के आरक्षण द्यायचा प्रयत्न केला. मात्र ती निव्वळ फसवणूक होती. आरक्षणाच्या मुद्द्यावरून सामाजिक वातावरण दूषित होऊ नये यासाठी सरकारने काळजी घ्यायची गरज आहे, या शब्दांत पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य केले. 

दरम्यान, यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृत राजकारण करून राज्याच्या समाजकारणाची राजकारणाची घडी बसवली होती. त्याचा अभ्यास इतर राज्यांकडून केला जायचा. मात्र दुर्दैवाने हे चित्र आता राहिले नाही. नेत्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीवर येऊन एकदा आत्मक्लेश करू नये. तर रोज सकाळ-सायंकाळ येऊन आत्मक्लेश करावा, असा खोचक टोला चव्हाण यांनी लगावला. धनगर समाजाला १५ दिवसांत आरक्षण देतो, असे फडणवीस म्हणाले होते. त्यावर आता तेच बोलतील, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाण