शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

“मराठा समाजाला आरक्षण दिले होते, पण सरकार पडले अन् ते टिकू शकले नाही”: पृथ्वीराज चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2023 15:08 IST

Prithviraj Chavan On Maratha Reservation: २०१४ मध्ये ज्या फॉर्मुल्याने आरक्षण दिले त्याच फॉर्मुल्याने मराठा समाजाला आरक्षण मिळू शकेल, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.

Prithviraj Chavan On Maratha Reservation: मराठा आरक्षणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला असून, सरकारला २४ डिसेंबरपर्यंतचे अल्टिमेटम देण्यात आले आहे. ओबीसींमधून आरक्षण देण्याला जोरदार विरोध होत असून, मोठ्या प्रमाणात आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. यातच आता आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिले होते. मात्र, सरकार पडले आणि पुढे आरक्षण टिकू शकले नाही, असा मोठा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. 

मी जुलै २०१४ मध्ये मराठा समाजाला १४ टक्के आरक्षण दिले होते. मात्र, त्यानंतर आलेल्या नव्या सरकारला हे आरक्षण टिकवता आले नाही. मी ज्या फॉर्मुल्याने मराठा आरक्षण दिले त्याच फॉर्मुल्याने मराठा समाजाला आरक्षण मिळू शकेल. आरक्षणाच्या मुद्द्यावर होत असलेल्या राजकारणाबाबत मला कोणी काय आरोप केला याविषयी बोलायचे नाही. परंतु, स्वातंत्र्यानंतर आरक्षणाविषयी पहिल्यांदा मी प्रश्न हाती घेतला होता. कायद्याच्या चौकटीत बसून आरक्षणाचा प्रश्न हाताळला, अशी प्रतिक्रिया पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मराठा आरक्षणाबाबत निव्वळ फसवणूक

आम्ही न्यायालयाची सब कमिटी नेमली होती. मराठा समाजाला क्रिमिलियरची अट टाकून २०१४ मध्ये १६ टक्के आरक्षण दिले. मुस्लिमांच्या मागासलेल्या लोकांना अशा ५० जाती शोधून ५ टक्के आरक्षण त्याकाळी दिले होते. आमचे सरकार पाडण्यात आले आणि हे आरक्षण टिकू शकल नाही, असा दावा करत, देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाबाबत १६ टक्केच्या ऐवजी १२ टक्के आरक्षण द्यायचा प्रयत्न केला. मात्र ती निव्वळ फसवणूक होती. आरक्षणाच्या मुद्द्यावरून सामाजिक वातावरण दूषित होऊ नये यासाठी सरकारने काळजी घ्यायची गरज आहे, या शब्दांत पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य केले. 

दरम्यान, यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृत राजकारण करून राज्याच्या समाजकारणाची राजकारणाची घडी बसवली होती. त्याचा अभ्यास इतर राज्यांकडून केला जायचा. मात्र दुर्दैवाने हे चित्र आता राहिले नाही. नेत्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीवर येऊन एकदा आत्मक्लेश करू नये. तर रोज सकाळ-सायंकाळ येऊन आत्मक्लेश करावा, असा खोचक टोला चव्हाण यांनी लगावला. धनगर समाजाला १५ दिवसांत आरक्षण देतो, असे फडणवीस म्हणाले होते. त्यावर आता तेच बोलतील, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाण