शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून काँग्रेस नेते द्विधा मन:स्थितीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2019 06:34 IST

शिवसेनेला पाठिंबा नाही असे जाहीर केल्यास प्रस्ताव बारगळेल व भाजपसोबत शिवसेना जाईल.

अतुल कुलकर्णी 

मुंबई : राष्ट्रवादी व शिवसेनेने सरकार स्थापन करावे आणि काँग्रेसने त्यास बाहेरुन पाठिंबा द्यावा, या प्रस्तावाशी काँग्रेसचे दिल्लीतील नेते तयार नाहीत. त्याचा राष्ट्रवादी-शिवसेना-भाजपला होईल, काँग्रेसला मात्र बळ मिळणार नाही, असे दिल्लीतील नेत्यांचे मत असल्याचे समजते. उत्तर प्रदेशात याआधी काँग्रेसने समाजवादी पक्ष आणि मायावतीच्या बसपा या दोन पक्षांना बाहेरुन पाठिंंबा दिला होता. त्यावेळी काँग्रेसचा जनाधार कमी झाला आणि हे दोन पक्ष वाढले. त्याची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होऊ नये असे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. राष्टÑवादी-शिवसेनेचे सरकार आल्यास अनेक काँग्रेसचे नेते राष्ट्रवादीकडे वळतील व काँग्रेस दुबळी होईल. शिवाय, हे सरकार किती काळ टिकेल याचीही खात्री नाही. त्यामुळे काँग्रेसने सावध भूमिका घेतली आहे.

शिवसेनेला पाठिंबा नाही असे जाहीर केल्यास प्रस्ताव बारगळेल व भाजपसोबत शिवसेना जाईल, असे या नेत्यांना वाटते. त्यामुळे जेवढे ताणता येईल तेवढे ताणून धरायचे अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे. आमच्या पक्षात बंडखोरी होणार नाही. एखादा आमदार काँग्रेस, राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये गेला तर त्याच्या विरोधात एकास एक उमेदवार उभा केला जाईल आणि त्याला पाडू, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, शरद पवार दिल्लीतून येणार आहेत. त्यांची आणि सोनिया गांधी यांची भेट झाली आहे. त्या भेटीची माहिती ते आम्हाला देतील, त्यानंतर चर्चा होईल आणि मग निर्णय घेण्यात येईल. आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिला आहे. शिवसेनेने प्रस्ताव दिलेला नाही, त्यांचा काही निरोप आला तर तो बैठकीत ठेवला जाईल आणि त्यावर चर्चा करू, असेही पाटील म्हणाले.शिवसेनेला पाठिंबा द्या; युवा नेत्यांचे मतभाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना अथवा राष्टÑवादीकडून सरकार बनविण्यासाठी प्रस्ताव आलाच तर तो मान्य करावा, असे काँग्रेसचे आ. सतेज पाटील यांचे मत आहे. विश्वजीत कदम, अमित देशमुख यांची देखील हीच भूमिका आहे, असा दावाही त्यांनी केला.

टॅग्स :congressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधीMaharashtraमहाराष्ट्रShiv Senaशिवसेना