शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

आतापर्यंत गद्दारी केलेल्यांना शिवसैनिकांनी धडा शिकवलाय, भाई जगताप यांचं रोखठोक मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2022 14:37 IST

राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट बनवत राज्यात राजकीय भूकंप आणला आहे.

राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट बनवत राज्यात राजकीय भूकंप आणला आहे. त्यामुळे शिवसेना मोठ्या संकटात सापडली असून शिंदे यांच्या बंडाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. बालाजीनगर येथील आमदार तानाजी सावंत यांच्या मे. भैरवनाथ शुगर वर्क लिमिटेड संस्थेच्या कार्यालयाची तोडफोड करत शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी आतापर्यंत गद्दारी केलेल्यांना शिवसैनिकांनी धडा शिकवला आहे असं मत व्यक्त केलं.

दरम्यान, या सर्वांत आपल्या कुटुंबीयांची सुरक्षा महत्त्वाची आहे असंही एकनाथ शिंदे म्हणाले होते. यावर त्यांना प्रश्न विचारण्यात आला. टीव्ही ९ मराठीशी साधलेल्या संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं. “कोणत्याही कुटुंबाला त्रास होऊ नये हे सर्वांचं कर्तव्य आहे. शिवसैनिक हा रिअॅक्टिव्ह आहे. आतापर्यंत शिवसेनेशी गद्दारी केलेल्या लोकांना शिवसैनिकांनी धडा शिकवला आहे. ही वस्तुस्थिती. काय घडावं तो ज्याच्या त्याचा प्रश्न. पण कुटुंबीयांपर्यंत हे जाता कामा नये. कुटुंबीयांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारला घ्यावीच लागेल,” असं भाई जगताप म्हणाले.

“महाविकास आघाडी होण्याचं कारण काँग्रेसच होतं. काँग्रेसनं सर्व गोष्टींचा विचार करून, महाराष्ट्राची परवड, मुंबईची पिछेहाट, फडणवीसांनी जे महाराष्ट्राचं वाटोळं केलं, त्याला छेद देण्यासाठी काँग्रेसनं भूमिका मांडली. आम्हाला सत्तेची हाव नाही. जे महाराष्ट्राचं वाटोळं करतायत त्यांना थांबवायला हवं ही भूमिका आजही आहे आणि पुढेही राहिल. आमचे ४४ आमदार ठाम आहेत आणि आम्ही उद्धव ठाकरेंच्या पाठिशी ठाम आहोत,” असंही ते म्हणाले. जी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यावरुन सरकार अस्थिर झाल्याचं दिसत आहे. परंतु असं अनेकदा झालंय. काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असताना असा प्रकार झाला होता. त्यावर मात केली गेल्याचंही असंही ते म्हणाले. महाराष्ट्राची इभ्रत घालून सरकार चालवू नका ही सर्वांनाच विनंती असल्याचंही त्यांनी सांगितलं.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रShiv Senaशिवसेनाbhai jagtapअशोक जगतापEknath Shindeएकनाथ शिंदे