शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
2
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
3
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
4
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
5
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
7
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
8
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
9
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
10
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
11
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
12
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
13
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
14
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
15
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
16
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
17
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
18
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
19
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
20
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?

आतापर्यंत गद्दारी केलेल्यांना शिवसैनिकांनी धडा शिकवलाय, भाई जगताप यांचं रोखठोक मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2022 14:37 IST

राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट बनवत राज्यात राजकीय भूकंप आणला आहे.

राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट बनवत राज्यात राजकीय भूकंप आणला आहे. त्यामुळे शिवसेना मोठ्या संकटात सापडली असून शिंदे यांच्या बंडाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. बालाजीनगर येथील आमदार तानाजी सावंत यांच्या मे. भैरवनाथ शुगर वर्क लिमिटेड संस्थेच्या कार्यालयाची तोडफोड करत शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी आतापर्यंत गद्दारी केलेल्यांना शिवसैनिकांनी धडा शिकवला आहे असं मत व्यक्त केलं.

दरम्यान, या सर्वांत आपल्या कुटुंबीयांची सुरक्षा महत्त्वाची आहे असंही एकनाथ शिंदे म्हणाले होते. यावर त्यांना प्रश्न विचारण्यात आला. टीव्ही ९ मराठीशी साधलेल्या संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं. “कोणत्याही कुटुंबाला त्रास होऊ नये हे सर्वांचं कर्तव्य आहे. शिवसैनिक हा रिअॅक्टिव्ह आहे. आतापर्यंत शिवसेनेशी गद्दारी केलेल्या लोकांना शिवसैनिकांनी धडा शिकवला आहे. ही वस्तुस्थिती. काय घडावं तो ज्याच्या त्याचा प्रश्न. पण कुटुंबीयांपर्यंत हे जाता कामा नये. कुटुंबीयांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारला घ्यावीच लागेल,” असं भाई जगताप म्हणाले.

“महाविकास आघाडी होण्याचं कारण काँग्रेसच होतं. काँग्रेसनं सर्व गोष्टींचा विचार करून, महाराष्ट्राची परवड, मुंबईची पिछेहाट, फडणवीसांनी जे महाराष्ट्राचं वाटोळं केलं, त्याला छेद देण्यासाठी काँग्रेसनं भूमिका मांडली. आम्हाला सत्तेची हाव नाही. जे महाराष्ट्राचं वाटोळं करतायत त्यांना थांबवायला हवं ही भूमिका आजही आहे आणि पुढेही राहिल. आमचे ४४ आमदार ठाम आहेत आणि आम्ही उद्धव ठाकरेंच्या पाठिशी ठाम आहोत,” असंही ते म्हणाले. जी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यावरुन सरकार अस्थिर झाल्याचं दिसत आहे. परंतु असं अनेकदा झालंय. काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असताना असा प्रकार झाला होता. त्यावर मात केली गेल्याचंही असंही ते म्हणाले. महाराष्ट्राची इभ्रत घालून सरकार चालवू नका ही सर्वांनाच विनंती असल्याचंही त्यांनी सांगितलं.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रShiv Senaशिवसेनाbhai jagtapअशोक जगतापEknath Shindeएकनाथ शिंदे