शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

“उद्धव ठाकरे दिलदार, असा मुख्यमंत्री होणे नाही”; अशोक चव्हाणांनी केले तोंडभरून कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2023 11:41 IST

Maharashtra Politics: तुम्ही मुख्यमंत्री म्हणून कायम राहिले पाहिजे, असे शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंना सांगितले होते, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

Maharashtra Politics: महाविकास आघाडी आणि शिंदे गट तसेच भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. एकीकडे महाविकास आघाडीत अंतर्गत धुसपूस सुरू असताना दुसरीकडे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे एका जाहीर सभेत तोंडभरून कौतुक केले आहे. उद्धव ठाकरे दिलदार आहेत. असा मुख्यमंत्री होणे नाही, असे कौतुकोद्गार अशोक चव्हाण यांनी काढले. 

एकनाथ शिंदे यांनी बंड केले आणि ४० आमदारांना सोबत घेत भाजपशी युती केली. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पदावरून पाय उतार व्हायला लागले होते. राज्यात शिंदे भाजप सरकार स्थापन झाले. अशोक चव्हाण यांनी एका कार्यक्रमात बोलताना, मविआ सरकार कोसळत होते त्यावेळीचा एक किस्सा सांगितला. ज्यावेळेस सरकार कोसळत होते, त्यावेळी काही लोकांनी उल्लेख केला की काँग्रेस-राष्ट्रवादीमुळे आम्ही शिवसेना सोडून चाललो आहे, त्यानंतर उद्धवजी राजीनामा देण्यासाठी जात होते त्यावेळी मी त्यांना सांगितले आमची भूमिका स्पष्ट आहे. जर आमच्यामुळे तुम्हाला त्रास होत असेल तर काँग्रेस पक्ष तुम्हाला बाहेरून पाठिंबा देईल, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले. 

उद्धव ठाकरेंसारखा मुख्यमंत्री होणे नाही

तुम्ही मुख्यमंत्री म्हणून कायम राहिले पाहिजे, तुम्ही तुमचा कार्यकाळ पाच वर्ष पुर्ण केला पाहिजे, असे उद्धव ठाकरेंना सांगितल्याचे अशोक चव्हाण म्हणाले. तसेच मी अनेक मुख्यमंत्र्यांसोबत काम केले मी देखील मुख्यमंत्री राहिलो पण असा उद्धव ठाकरेंसारखा मुख्यमंत्री होणे नाही असे जाहीरपणे सांगतो, असे म्हणत चव्हाणांनी उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले.

दरम्यान, महाविकास आघाडी मजबूत ठेवण्यासाठी तीनही पक्ष एकत्र सभा घेत आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जात वज्रमूठ सभा घेत आहेत. पुढील काळात देखील मोठ्या जाहीर सभांचे नियोजन चालू आहे. दरम्यान १ मे रोजी मविआ मुंबईत वज्रमूठ सभा घेणार आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणUddhav Thackerayउद्धव ठाकरे