शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

"उपर वाले की लाठी चलती है तो आवाज नहीं निकलती," कर्नाटक निकालावर अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2023 14:40 IST

डबल इंजिन सपशेल रुळावरून घसरलंय हे स्पष्ट झाल्याचं चव्हाण यांचं वक्तव्य.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. काँग्रेसनं बहुमताचा जादुई आकडादेखील गाठला आहे. दुसरीकडे भाजपचा दक्षिणेचा बालेकिल्ला ढासळला आहे. यानंतर महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया डबल इंजिन रुळावरून घसरल्याचं म्हटलं.

“या विजयामध्ये मल्लिकार्जून खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी, डीके शिवकुमार, सिद्धरामय्या यांनी खूप परिश्रम घेतले. काँग्रेसच्या सर्व नेतृत्वानं यात आपल्याला झोकून दिलं आणि या विजयात सर्वांचा सिंहाचा वाटा आहे. महाराष्ट्रातीलही अनेक सहकारी तिकडे जाऊन आले आहेत. या मतदानात काँग्रेसच्या मतांचा टक्काही वाढला आहे. काँग्रेसच्या जागा भाजपेक्षा दुपटीनं अधिक दिसतायत. काँग्रेसचा मताचा टक्के ४३ टक्क्यांवर गेलाय. भाजपचा मताची टक्केवारी तितकीच राहिलीये. अनेक स्तरातून काँग्रेसला पाठिंबा मिळालाय हे उघड आहे,” असे अशोक चव्हाण म्हणाले.

“भाजपनं अनेक ठिकाणी ध्रुवीकरण, तृष्टीकरण करून राजकारण कसं करता येईल हे पाहिलं. जेव्हा विकासाच्या मुद्द्यावर मागे पडल्याचं त्यांना दिसलं, तेव्हा शेवटचं हत्यार म्हणून देवधर्म आणण्याचा विषय झाला. देवधर्म हे व्यक्तीगत आस्थेचे विषय आहेत. राजकारणाचे विषय ते होऊ शकत नाही हे कर्नाटकाच्या लोकांनी दाखवून दिलंय,” असंही त्यांनी स्पष्ट केलं. काँग्रेसच्या ज्या लोककल्याणकारी योजना जाहिरनाम्यात देण्यात आल्यात त्या योजनांनाही लोकांनी प्रतिसाद दिल्याचं ते म्हणाले.

डबल इंजिन रुळावरून घसरलं

“रोजगार, सुरक्षा, महागाई, शांतता असे अनेक लोकांसमोर प्रश्न होते. भाजप यावर काही बोलू शकले नाही. डबल इंजिन सपशेल रुळावरून घसरलंय हे स्पष्ट झालंय. उपरवाले की लाठी जब चलती है तो आवाज नहीं निकलती, अशी स्थिती झाली. एक्झिट पोलमध्ये जी आकडेवारी दिली त्यापेक्षाही अधिक जागा मिळेल असं वाटतं. वातावरण बदलतंय आगामी काळातही निवडणुकांत बदलांचा परिणाम दिसेल,” असंही अशोक चव्हाण यांनी नमूद केलं.

टॅग्स :Karnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकAshok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेस