शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

“आधी उद्धव ठाकरे-सोनिया गांधींची भेट, मगच निश्चितच राहुल गांधी मातोश्री गाठतील”

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2023 16:48 IST

Rahul Gandhi to Meet Uddhav Thackeray: राहुल गांधींच्या मुंबई दौऱ्यापूर्वी उद्धव ठाकरेंची दिल्लीवारी होणार असल्याचे सांगितले जात आहे.

Rahul Gandhi to Meet Uddhav Thackeray: गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. लवकरच राहुल गांधी मुंबईत दौऱ्यावर येतील आणि मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतील, असे सांगितले जात होते. मात्र, आधी उद्धव ठाकरे दिल्लीवारी करत सोनिया गांधी तसेच काँग्रेस नेत्यांची भेट घेतील. मगच राहुल गांधी मुंबईत मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना भेटतील, असे सांगितले जात आहे. 

गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेस आणि ठाकरे गटात सावरकर मुद्द्यांवरून वाद होता. मालेगावच्या सभेत उद्धव ठाकरेंनी जाहीरपणे राहुल गांधींना इशारा दिला. त्यानंतर काँग्रेसनेही सामंजस्याची भूमिका घेत सावरकर मुद्दा घेणार नसल्याचे सांगितले. यासंदर्भात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी यांची भेटही घेतली होती. तर शरद पवार यांनीही याबाबत स्पष्ट शब्दांत भाष्य केले होते. त्यानंतर काँग्रेसचे महासचिव के. सी वेणुगोपाळ यांच्यासह राज्यातील नेत्यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली.

मगच निश्चितच राहुल गांधी मातोश्री गाठतील

उद्धव ठाकरे यांनी आधी दिल्ली गाठावी. त्यानंतरच राहुल गांधी मुंबईत येतील, असे काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणूगोपाल यांनी स्पष्ट केल्याची माहिती देण्यात आली आहे. गेल्या १० दिवसांपासून काँग्रेसचे नेते राहुल गांधी उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी ‘मातोश्री'वर येणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाल्याचे म्हटले जात आहे. वेणूगोपाल यांना राहुल गांधी यांच्या मातोश्री भेटीबाबत विचारले असता, त्यांनी इतक्यात ही भेट होण्याची शक्यताच नसल्याचे सूचित केले. आम्ही उद्धव ठाकरे यांना दिल्लीत पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या भेटीसाठी यावे. तसे निमंत्रण आम्ही त्यांना दिले आहे. त्यांची दिल्लीवारी झाल्यावर राहुल गांधी निश्चितच मुंबई गाठतील, अशा आशयाचे विधानही वेणूगोपाल यांनी केले.

दरम्यान, देशात 'मी'करणाच्या विरोधात एक समीकरण बनतंय. म्हणून सर्व पक्ष एकत्र प्रत्येक पक्षाचे स्वतः ची विचारधारा आहेच. त्यालाच लोकशाही म्हणतात म्हणून आम्ही एकत्र आलोय. निवडणुका समोरच उभ्या आहेत. लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहे. भाजपचे अध्यक्ष नड्डा बोललेले फक्त भाजप राहील इतर सगळे पक्ष संपतील. शिवसेना संपवावी यासाठी भाजपचे प्रयत्न आहेत. भाजपला सत्तेचा हव्यास सत्ताभक्षक झाले आहेत. लोकशाही वाचवण्यासाठी शिवसेना संपूर्ण ताकदीने उतरली आहे. विरोधी पक्षांची चर्चा होतच असते. आम्ही मैत्री करतो तर पूर्ण मनापासून निभवतो एक नाते निर्माण होतो. भाजपासोबत २५-३० वर्ष होतो पण होतो पण त्यांना किंमत नव्हती पण ठिक आहे त्यांना मित्र आणि शत्रू समजले नाहीत. लोकांच्या मनात प्रश्न आहेत ते आपल्याला साथ देतील. आमच्या भेटीगाठी सुरु राहतील, या शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीUddhav Thackerayउद्धव ठाकरे