शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
4
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक, टाटा-रिलायन्ससह 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांना दिलासा! तुमच्या पोर्टफोलिओचं काय झालं?
5
आमिर खानने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्याने सुरू केलं 'जनता का थिएटर'
6
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
7
शैलेश जेजुरीकर बनले 'या' अमेरिकन कंपनीचे CEO! मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G लाही मिळणार 'भारतीय' नेतृत्व!
8
Tripti Dimri : "मी ३० वर्षांपासून गप्प...", तृप्ती डिमरीने खूप काही केलंय सहन, का नाही उठवला आवाज?
9
Russia Ukraine War: "हल्ले थांबवा अन्यथा..."; रशिया-युक्रेन युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्पकडून पुतिन यांना इशारा!
10
BCCI च्या ऑफिसमध्ये चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या IPL जर्सी चोरुन हरयाणात विकल्या
11
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
12
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
13
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
14
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
15
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
16
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
17
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
18
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
19
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
20
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं

आता 'त्या' जागेवर काँग्रेसचा नेम; राष्ट्रवादीच्या दुसऱ्या उमेदवाराचा गेम?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 10:39 IST

आता 'त्या' जागेवर काँग्रेसचा नेम; राष्ट्रवादीच्या दुसऱ्या उमेदवाराचा गेम?

ठळक मुद्देकाँग्रेसला हव्या राज्यसभेच्या दोन जागा; राष्ट्रवादीसोबत वाद होण्याची चिन्हंराष्ट्रवादीच्या फौजिया खान यांच्या जागेवर काँग्रेसचा दावामहत्त्वाची खाती दिली नाहीत, तर किमान खासदारकी द्या; काँग्रेसची मागणी

मुंबई: राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादीतर्फे पक्षाध्यक्ष शरद पवार आणि माजी राज्यमंत्री फौजिया खान यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली असताना आता काँग्रेसनं खान यांच्या जागेवर दावा सांगितला आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्रिपद, महत्त्वाची खाती न मिळाल्यानं राज्यसभेची अतिरिक्त जागा मिळावी, अशी काँग्रेसची आग्रही मागणी आहे. राज्यातल्या राज्यसभेच्या सात जागांसाठी २६ मार्चला निवडणूक होत आहे. महाविकास आघाडीकडे असलेलं संख्याबळ पाहता त्यांचे ४ उमेदवार सहज निवडून जाऊ शकतात. राष्ट्रवादीनं राज्यसभेच्या निवडणुकीसाठी शरद पवार आणि फौजिया खान यांना उमेदवारी दिल्यानं शिवसेना, काँग्रेसच्या वाट्याला प्रत्येकी एक जागा आली. मात्र आता काँग्रेसनं खान यांच्या जागेवर दावा सांगितला आहे. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये दुय्यम मंत्रिपदं मिळाल्यानं किमान राज्यसभेत अतिरिक्त जागा देण्यात यावी, असा काँग्रेसचा आग्रह आहे.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि माजिद मेमन यांच्या राज्यसभेचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे पुन्हा राज्यसभेच्या दोन जागा मिळाव्यात यासाठी राष्ट्रवादी प्रयत्नशील आहे. त्यामुळेच शरद पवार आणि फौजिया खान यांना पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली. मात्र आता काँग्रेसनं खान यांच्या जागेवर दावा केला आहे. या जागेवरुन सतीश चर्तुर्वेदींना राज्यसभेत पाठवण्यासाठी काँग्रेस आग्रही आहे. काय आहे राज्यसभेच्या मतांचं गणित?राज्यसभेवर जाण्यासाठी उमेदवाराला ३८ आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. सध्या विधानसभेत शिवसेनेचे ५६, राष्ट्रवादीचे ५४, तर काँग्रेसचे ४४ आमदार आहेत. ही संख्या लक्षात घेता प्रत्येक पक्षाचा एक उमेदवार सहज निवडून येऊ शकतो. याशिवाय अतिरिक्त मतांमुळे आणखी एक उमेदवारदेखील विजयी होईल. त्यामुळेच राष्ट्रवादीनं दोन उमेदवार दिले होते. शिवसेना, काँग्रेसची अतिरिक्त मतं राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मिळतील, असं गणित यामागे होतं. मात्र काँग्रेसनं अधिकची जागा मागितल्यानं राष्ट्रवादीचं गणित फिस्कटण्याची चिन्हं आहेत. 

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना