शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 16:31 IST

Balasaheb Thorat News: आरक्षण मिळाल्याच्या थाटात आंदोलकांनी गुलाल उधळला असला, तरी यातून हा प्रश्न अजिबात सुटणार नाही, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

Balasaheb Thorat News: आरक्षण मिळाल्याच्या थाटात आंदोलकांनी गुलाल उधळला असला, तरी यातून हा प्रश्न सुटणार नाही. यामध्ये नवे काहीही नसताना आंदोलकांनी हा निर्णय स्वीकारणे, त्यावर जल्लोष करणे कळत नाही. खरे तर, मराठा आरक्षणासाठी सरकारने काढलेल्या या शासननिर्णयात आपणास नवे काही दिसलेले नाही. यापूर्वी आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाचा शासन निर्णय आम्ही घेतला होता. पण, तो पुढे टिकला नाही. त्यामुळे गॅझेटवर आधारित आरक्षण याबाबत आपणास काळजी वाटते, असे मत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मांडले आहे. 

मंत्रिमंडळ मराठाविषयक उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांनी मनोज जरांगे यांची आंदोलनस्थळी भेट घेत हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय जाहीर करत त्याबाबतचा शासन निर्णयही जारी केला. याबाबत पत्रकारांशी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, यापूर्वी नवी मुंबईत गुलाल उधळला होता, त्याचे काय झाले? आता, मुंबईत गुलाल उधळून पुढे काय होणार, हा प्रश्न शिल्लकच आहे. 

...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही

मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गातून (ओबीसी) आरक्षण देण्याऐवजी राज्यातील आरक्षणाची टक्केवारी वाढवत या समाजाला कायमस्वरूपी टिकणारे स्वतंत्र आरक्षण देणेच योग्य असून, त्या शिवाय हा प्रश्न सुटणार नाही. महाराष्ट्रातील आरक्षणाची टक्केवारी वाढवल्याखेरीज मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही आणि हा प्रश्न सुटणार नाही, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

दरम्यान, एवढ्या मोठ्या संख्येने आंदोलक जमा केले. त्यांनी मुंबईत सलग आंदोलन केले. यानंतर मूळ मागण्यांचा विसर पडल्यासारखे भलत्याच निर्णयावर आरक्षण मिळाल्याचा सर्वत्र जल्लोष सुरू आहे. हैदराबाद गॅझेटिअर लागू करण्याचा निर्णय जाहीर केला. आरक्षण मिळाल्याच्या थाटात आंदोलकांनी गुलाल उधळला असला, तरी यातून हा प्रश्न अजिबात सुटणार नाही. यामध्ये नवे काहीही नसताना आंदोलकांच्या नेत्यांनी हा निर्णय स्वीकारणे, त्यावर जल्लोष करणे कळण्याच्या पलीकडचे आहे, असे थोरात यांनी म्हटले आहे. 

 

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातcongressकाँग्रेसMaratha Reservationमराठा आरक्षण