शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

विधानसभेला राज्यस्थान, मध्यप्रदेशच्या पुनरावृत्तीचं आघाडीचं लक्ष्य !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2019 17:06 IST

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पक्षाची सुत्रे पुन्हा एकदा हाती घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीसोबत वेगाने समन्वय होण्यास मदतच होणार आहे. तर राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार देखील या निवडणुकीत आपला अनुभव पणाला लावण्याची शक्यता आहे.

मुंबई - नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत देशातील जनतेने भारतीय जनता पक्षाच्या झोळीत भरभरून मते टाकली. त्यामुळे भाजपने सत्तास्थापनेसाठी आवश्यक असलेला बहुमताचा आकडा पार केला. तर भाजप प्रणीत एनडीएने साडेतीनशेचा आकडा गाठला. लोकसभा निवडणुकीत हे यश पाहता, तीन महिन्यांनी राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही याचीच पुनरावृत्ती होईल, असा अंदाज सत्ताधारी भाजप-शिवसेनेसह राजकीय विश्लेषकांना आहे. परंतु, मतदार केंद्रात एक आणि राज्यात दुसरं सरकार निवडत असल्याचे मागील निवडणुकांवरून समोर आले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी ही एक सकारात्मक बाब आहे. तर भाजप-शिवसेनेची चिंता वाढविणारी आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या. या तीनही राज्यात भाजपचे सरकार होते. मात्र या तीनही राज्यांत काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत सत्ता स्थापन केली. केंद्रात जरी नरेंद्र मोदींना निवडून दिले तरी राज्यात वेगळा पर्याय निवडू असा सूचक इशारा मतदारांनी भाजपला दिला आहे. त्यामुळे तीन महिन्यांनी राज्यात होणारी विधानसभा निवडणूक भाजप-शिवसेनेसाठी वाटते तितकी सोपी नक्कीच नाही.

सध्या राज्यातील वातावरण भाजप-शिवसेनेसाठी अनुकूल दिसत आहे. लोकसभा निवडणुकीत अनेक विधानसभा मतदार संघात सत्ताधारी भाजपला आघाडी मिळाली आहे. ही बाब सुखावणारी आहे. राज्यात आपण भाजप-शिवसेना युतीला रोखू हे आघाडीला शक्य वाटत नाही, ही वस्तुस्थिती आहे. परंतु, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पक्षाची सुत्रे पुन्हा एकदा हाती घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीसोबत वेगाने समन्वय होण्यास मदतच होणार आहे. तर राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार देखील या निवडणुकीत आपला अनुभव पणाला लावण्याची शक्यता आहे. तसं नियोजन देखील आघाडीत सुरू असल्याचे समजते.

विधानसभेत एका पक्षाला पूर्ण बहुमत देणारे मतदार लोकसभा निवडणुकीत दुसऱ्या पक्षाला निवडतात याचा अनुभव काँग्रेसला आला आहे. तर भाजपलाही हा अनुभव आहे. एकूणच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला राज्यातील नेतेमंडळीकडून एकदिलाने काम करून घ्यावे लागणार आहे. तसेच घटक पक्षांना सोबत घेण्यासाठी उभय पक्षांना थोडी मवाळ भूमिका घ्यावी लागणार आहे. या उपाययोजना करून महाराष्ट्रातही विधानसभेला मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगडची पुनरावृत्ती करण्याचा आघाडीचा मानस आहे.