शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
2
'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
3
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
4
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
5
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
6
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
7
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
8
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
9
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
10
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
11
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
12
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
13
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
14
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
15
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
16
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
17
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
18
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
19
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
20
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा

विधानसभेला राज्यस्थान, मध्यप्रदेशच्या पुनरावृत्तीचं आघाडीचं लक्ष्य !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2019 17:06 IST

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पक्षाची सुत्रे पुन्हा एकदा हाती घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीसोबत वेगाने समन्वय होण्यास मदतच होणार आहे. तर राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार देखील या निवडणुकीत आपला अनुभव पणाला लावण्याची शक्यता आहे.

मुंबई - नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत देशातील जनतेने भारतीय जनता पक्षाच्या झोळीत भरभरून मते टाकली. त्यामुळे भाजपने सत्तास्थापनेसाठी आवश्यक असलेला बहुमताचा आकडा पार केला. तर भाजप प्रणीत एनडीएने साडेतीनशेचा आकडा गाठला. लोकसभा निवडणुकीत हे यश पाहता, तीन महिन्यांनी राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही याचीच पुनरावृत्ती होईल, असा अंदाज सत्ताधारी भाजप-शिवसेनेसह राजकीय विश्लेषकांना आहे. परंतु, मतदार केंद्रात एक आणि राज्यात दुसरं सरकार निवडत असल्याचे मागील निवडणुकांवरून समोर आले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी ही एक सकारात्मक बाब आहे. तर भाजप-शिवसेनेची चिंता वाढविणारी आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या. या तीनही राज्यात भाजपचे सरकार होते. मात्र या तीनही राज्यांत काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत सत्ता स्थापन केली. केंद्रात जरी नरेंद्र मोदींना निवडून दिले तरी राज्यात वेगळा पर्याय निवडू असा सूचक इशारा मतदारांनी भाजपला दिला आहे. त्यामुळे तीन महिन्यांनी राज्यात होणारी विधानसभा निवडणूक भाजप-शिवसेनेसाठी वाटते तितकी सोपी नक्कीच नाही.

सध्या राज्यातील वातावरण भाजप-शिवसेनेसाठी अनुकूल दिसत आहे. लोकसभा निवडणुकीत अनेक विधानसभा मतदार संघात सत्ताधारी भाजपला आघाडी मिळाली आहे. ही बाब सुखावणारी आहे. राज्यात आपण भाजप-शिवसेना युतीला रोखू हे आघाडीला शक्य वाटत नाही, ही वस्तुस्थिती आहे. परंतु, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पक्षाची सुत्रे पुन्हा एकदा हाती घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीसोबत वेगाने समन्वय होण्यास मदतच होणार आहे. तर राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार देखील या निवडणुकीत आपला अनुभव पणाला लावण्याची शक्यता आहे. तसं नियोजन देखील आघाडीत सुरू असल्याचे समजते.

विधानसभेत एका पक्षाला पूर्ण बहुमत देणारे मतदार लोकसभा निवडणुकीत दुसऱ्या पक्षाला निवडतात याचा अनुभव काँग्रेसला आला आहे. तर भाजपलाही हा अनुभव आहे. एकूणच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला राज्यातील नेतेमंडळीकडून एकदिलाने काम करून घ्यावे लागणार आहे. तसेच घटक पक्षांना सोबत घेण्यासाठी उभय पक्षांना थोडी मवाळ भूमिका घ्यावी लागणार आहे. या उपाययोजना करून महाराष्ट्रातही विधानसभेला मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगडची पुनरावृत्ती करण्याचा आघाडीचा मानस आहे.