शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

सांगलीच्या उमेदवारीवरून संभ्रम; तीन नावांच्या शिफारसीने गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 05:22 IST

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा उमेदवार कोण, सर्वांना उत्सुकता

सांगली : राज्यातील अन्य जागांपेक्षा सांगली लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून कॉँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये कमालीचा संभ्रम दिसत आहे. जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांचे निधन झाल्यानंतर दुसऱ्या फळीतील नेत्यांमध्ये समन्वयाचा अभाव व आपसात मतभेद असल्याने उमेदवारीबाबत निर्णय कसा घ्यायचा, असा प्रश्न पडला आहे. जिल्ह्यातून तीन नावांची शिफारस झाल्याने गोंधळ अधिक वाढला आहे.सांगली लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक म्हणून माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील आणि शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील या दोघांच्या नावांची शिफारस प्रदेश पार्लमेंटरी बोर्डाकडे करण्यात आली आहे. असे असताना निवडणूक लढविण्यास इच्छुक नसलेले आ. विश्वजित कदम यांच्यासह अन्य काही नावे दिल्लीला पाठविण्यात येणार असल्याचे समजते. विश्वजीत कदम यांनी स्पष्टपणे लोकसभा निवडणूक लढविण्यास नकार दिल्यानंतरही त्यांना लढविण्याबाबत आग्रह धरला जात आहे.माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाचीही मध्यंतरी चर्चा सुरू होती, मात्र त्यांनीही चर्चेला नकार देत पूर्णविराम दिल्याने दोन इच्छुकांशिवाय कोणताही पर्याय पार्लमेंटरी बोर्डासमोर नाही. तरीसुद्धा संबंधित नावांचे पर्याय सुचविले जात आहेत. प्रत्येक जागेसाठी सक्षम उमेदवार निवडून ताकद लावण्याची तयारी कॉँग्रेसमार्फत करण्यात येत आहे. तरीही सांगली लोकसभेच्या उमेदवारीवरून सर्वाधिक संभ्रम पार्लमेंटरी बोर्डासमोर दिसत आहे.

टॅग्स :Sangliसांगलीcongressकाँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९