शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

मंत्र्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळेच मराठा आरक्षणाबाबत समाजात संभ्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2018 18:46 IST

मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकारमधील मंत्रीच वेगवेगळी वक्तव्ये करून संभ्रम निर्माण करीत आहेत, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.

मुंबई -  मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकारमधील मंत्रीच वेगवेगळी वक्तव्ये करून संभ्रम निर्माण करीत आहेत. आरक्षण देण्याची सरकारची भूमिका स्पष्ट असेल तर मागासवर्गीय आयोगाचा अहवाल तातडीने सभागृहात मांडण्यात सरकारला काय अडचण आहे? असा सवाल करून विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा, मुस्लीम, धनगर आणि लिंगायत आरक्षणाबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून मराठा आरक्षण आणि राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सरकारने निर्णय जाहीर करावा, अशी मागणी लावून धरली. यावेळी त्यांनी आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारच्या वेळकाढू व दुटप्पी भूमिकेचा पंचनामा केला. मराठा आरक्षणाबाबत सरकारची भूमिका स्पष्ट नाही. आरक्षण देण्याची सरकारची तयारी असेल तर मग मागासवर्गीय आयोगाचा अहवाल सभागृहात का मांडत नाही? असा प्रश्न उपस्थित करून सरकारच्या भूमिकेमुळे राज्यात संभ्रमाचे वातावरण निर्माण होत असल्याकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

त्यानंतर पत्रकारांकडे प्रतिक्रिया व्यक्त करताना विखे पाटील म्हणाले की, मागासवर्गीय आयोगाने केलेल्या शिफारसी मुख्यमंत्र्यांनी स्वतः पत्रकार परिषदेमध्ये वाचून दाखवल्या. अहवाल शासनाला सादर झालेला असताना तो सभागृहात का मांडला जात नाही? धनगर समाजाच्या आरक्षणाबाबतचा ‘टीस’चा अहवाल देखील सरकारला प्राप्त झाला आहे. त्या अहवालाबाबत सरकार बोलायला तयार नाही. एवढेच नव्हे तर धनगर आरक्षणाबाबत तर सरकारने थेट ‘यु-टर्न’ घेतला आहे. न्यायालयाने वैध ठरवले असतानाही मुस्लीम समाजाच्या आरक्षणाबाबत सरकार कोणताही निर्णय घ्यायला तयार नाही. एकिकडे मराठा आरक्षण कायद्याच्या चौकटीत असल्याचा दावा सरकार करते. तर दुसरीकडे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील पंढरपूरच्या विठ्ठलाला साकडे घालून हे आरक्षण न्यायालयात टिकावे म्हणून साकडे घालतात. ही भूमिका शंका निर्माण करणारी असून, सरकार त्यावर भूमिका स्पष्ट करीत नसल्याचे विरोधी पक्षनेत्यांनी सांगितले. 

दुष्काळाबाबतही सरकार उदासीन असल्याचा आरोप त्यांनी केला. राज्यात दुष्काळाची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. दुष्काळी तालुके जाहीर करून सरकारने केवळ सोपस्कार पूर्ण केले आहेत. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी कोणत्याही भरीव उपाययोजनांचे निर्णय सरकारने अद्याप जाहीर केले नाही. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हेक्टरी 50 हजार रुपये तर ऊस, केळी आणि फळबाग उत्पादकांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत सरकारने तातडीने जाहीर करावी, अशी जोरदार मागणी त्यांनी केली. सरकारने चर्चा करण्यात वेळ न घालवता दुष्काळी तालुक्यांकरीता दिलासा देणारे निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी सुरू करावी, अशी सूचनाही विखे पाटील यांनी केली. 

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण