शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

मंत्र्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळेच मराठा आरक्षणाबाबत समाजात संभ्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2018 18:46 IST

मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकारमधील मंत्रीच वेगवेगळी वक्तव्ये करून संभ्रम निर्माण करीत आहेत, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.

मुंबई -  मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकारमधील मंत्रीच वेगवेगळी वक्तव्ये करून संभ्रम निर्माण करीत आहेत. आरक्षण देण्याची सरकारची भूमिका स्पष्ट असेल तर मागासवर्गीय आयोगाचा अहवाल तातडीने सभागृहात मांडण्यात सरकारला काय अडचण आहे? असा सवाल करून विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा, मुस्लीम, धनगर आणि लिंगायत आरक्षणाबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून मराठा आरक्षण आणि राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सरकारने निर्णय जाहीर करावा, अशी मागणी लावून धरली. यावेळी त्यांनी आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारच्या वेळकाढू व दुटप्पी भूमिकेचा पंचनामा केला. मराठा आरक्षणाबाबत सरकारची भूमिका स्पष्ट नाही. आरक्षण देण्याची सरकारची तयारी असेल तर मग मागासवर्गीय आयोगाचा अहवाल सभागृहात का मांडत नाही? असा प्रश्न उपस्थित करून सरकारच्या भूमिकेमुळे राज्यात संभ्रमाचे वातावरण निर्माण होत असल्याकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

त्यानंतर पत्रकारांकडे प्रतिक्रिया व्यक्त करताना विखे पाटील म्हणाले की, मागासवर्गीय आयोगाने केलेल्या शिफारसी मुख्यमंत्र्यांनी स्वतः पत्रकार परिषदेमध्ये वाचून दाखवल्या. अहवाल शासनाला सादर झालेला असताना तो सभागृहात का मांडला जात नाही? धनगर समाजाच्या आरक्षणाबाबतचा ‘टीस’चा अहवाल देखील सरकारला प्राप्त झाला आहे. त्या अहवालाबाबत सरकार बोलायला तयार नाही. एवढेच नव्हे तर धनगर आरक्षणाबाबत तर सरकारने थेट ‘यु-टर्न’ घेतला आहे. न्यायालयाने वैध ठरवले असतानाही मुस्लीम समाजाच्या आरक्षणाबाबत सरकार कोणताही निर्णय घ्यायला तयार नाही. एकिकडे मराठा आरक्षण कायद्याच्या चौकटीत असल्याचा दावा सरकार करते. तर दुसरीकडे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील पंढरपूरच्या विठ्ठलाला साकडे घालून हे आरक्षण न्यायालयात टिकावे म्हणून साकडे घालतात. ही भूमिका शंका निर्माण करणारी असून, सरकार त्यावर भूमिका स्पष्ट करीत नसल्याचे विरोधी पक्षनेत्यांनी सांगितले. 

दुष्काळाबाबतही सरकार उदासीन असल्याचा आरोप त्यांनी केला. राज्यात दुष्काळाची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. दुष्काळी तालुके जाहीर करून सरकारने केवळ सोपस्कार पूर्ण केले आहेत. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी कोणत्याही भरीव उपाययोजनांचे निर्णय सरकारने अद्याप जाहीर केले नाही. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हेक्टरी 50 हजार रुपये तर ऊस, केळी आणि फळबाग उत्पादकांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत सरकारने तातडीने जाहीर करावी, अशी जोरदार मागणी त्यांनी केली. सरकारने चर्चा करण्यात वेळ न घालवता दुष्काळी तालुक्यांकरीता दिलासा देणारे निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी सुरू करावी, अशी सूचनाही विखे पाटील यांनी केली. 

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण